एक्स्प्लोर

अर्थसंकल्पातील 10 ठळक मुद्दे

शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारनं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचं अजित पवार यांनी घोषीत केलं आहे.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला. यावेळी शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारनं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. तर वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावरही सरकारचा भर असल्याचं अजित पवार यांनी घोषीत केलं आहे. शेतकऱ्यांना दिलासा : शेतकरी कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. दोन लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. आरोग्य सेवा : राज्यात 75 नवीन डायलेसिस केंद्र स्थापन करणार आहे. तसेच 102 क्रमांकाच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून यावर्षी 500 नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी रुपये 87 कोटी उपलब्ध करून देणार आहे. यापैकी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आरोग्य सेवेकरीता रुपये पाच हजार कोटी व वैद्यकिय शिक्षणाकरिता रुपये 2 हजार 500 कोटी बाह्य सहाय्यित प्रकल्प कौशल्य विकास : राज्यातील सर्व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात वाढ करून आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रात रुपांतर करणार आहे. यासाठी खाजगी उद्योजकांकडून रुपये 12 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. शासनाकडून रुपये 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. आमदारांना अच्छे दिन : महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात सर्व आमदारांना 'अच्छे दिन'. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत 1 कोटींची वाढ. आता आमदारांना मतदारसंघातील विकासासाठी 2 कोटींऐवजी 3 कोटींचा निधी मिळणार. पेट्रोल-डिझेल महागणार : पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ, अतिरिक्त कर आकारण्याची अजित पवार यांची घोषणा मुंबईत मराठी भवन बांधणार : मराठी भाषेच्या प्रसारासाठी मुंबईत मराठी भवन बांधणार. तसंच वडाळ्यात मुंबईत वस्तू आणि सेवा कर केंद्र उभारणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यासाठी 148 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. Ajit Pawar PC | दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा आरोग्य विभासाठी पाच हजार कोटी आरोग्य विभागासाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारणआर. तसंच डॉक्टरांची संख्यादेखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी. नव्या रूग्णवाहिकांसाठी 25 कोटी रूपयांची तरतूद करणार. 20 नवी डायलिसिस सेंटर सुरू करणार. तसंच 996 प्रकारचे उपचार मोफत देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. क्रीडा संकुलासाटी 25 कोटींचा निधी जिल्हा क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. यापूर्वी 8 कोटींचा निधी देण्यात येत होता. बालेवाडीत आतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. कबड्डी. कुस्ती स्पर्धांना 75 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त खोखो व्हॉलिबॉल स्पर्धांनाही 75 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. बेरोजगारीच्या समस्येवर महाविकास आघाडी सरकारचा उतारा : बेरोजगारीच्या समस्येवर महाविकास आघाडी सरकारचा उतारा. नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजनेची घोषणा. शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहन मिळून पाच वर्षात 10 लाख सुशिक्षीत बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. संबंधित बातम्या : Maharashtra Budget | शेतकरी कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी, पेट्रोल-डिझेल 1 रुपयाने महागणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget