एक्स्प्लोर

दंगल नियंत्रणात आली का? शुद्धीवर येताच पोलीस अधिकाऱ्याचा पहिला प्रश्न

शुक्रवारी रात्री औरंगाबादमध्ये जेव्हा दंगल सुरु त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी गोवर्धन कोळेकर स्वत: पुढे सरसावले. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत गोवर्धन कोळेकर यांच्या स्वरयंत्रावर दगड लागला.

औरंगाबाद : शहरात दंगल पेटल्यास राजकीय पुढाऱ्यांकडून नेहमीच पोलिसांवर टीका केली जाते. मात्र, औरंगाबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने जीवावर उदार होऊन दंगल नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्य बजावताना औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी रात्री औरंगाबादमध्ये जेव्हा दंगल सुरु त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी गोवर्धन कोळेकर स्वत: पुढे सरसावले. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत गोवर्धन कोळेकर यांच्या स्वरयंत्रावर दगड लागला. त्यावेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्या स्वरयंत्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. स्वरयंत्राला दगड लागल्यामुळे कोळेकरांना बोलता येत नव्हतं, डॉक्टरांनी त्यांना डायरी देऊन लिहायला सांगितलं, त्यावेळी त्यांनी कागदावर जे लिहिलं ते पाहून उपस्थित असलेले त्यांचे सहकारी, डॉक्टर आणि कुटुंबीयही स्तब्ध झाले. 'रात्रीची घटना शांत झाली का?' हे पहिले शब्द त्यांनी लिहिले. आपल्यासोबत जखमी झालेल्या परोपकारी यांची तब्येत कशी आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला. बाजूला मुलगा आणि बायको उभे होते. मात्र स्वतःचं दुःख कागदावर लिहिण्याऐवजी त्यांना शहराची चिंता होती. दंगल नियंत्रणात आली का? शुद्धीवर येताच पोलीस अधिकाऱ्याचा पहिला प्रश्न दंगल नियंत्रणात आली का? शुद्धीवर येताच पोलीस अधिकाऱ्याचा पहिला प्रश्न कोळेकर शुद्धीत आल्यानंतर त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा, पत्नी हे समोर होते. मात्र, त्यांची विचारपूस करण्याआधी कोळेकरांनी आपलं कर्तव्य मोठं मानलं. कोळेकरांनी आपल्या कर्तव्याप्रती दाखवलेली ही निष्ठा त्यांच्या कृतीला सलाम करायला प्रवृत्त करते. खरोखरच या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला एबीपी माझाचा ही सलाम. दंगल नियंत्रणात आली का? शुद्धीवर येताच पोलीस अधिकाऱ्याचा पहिला प्रश्न कोण आहेत गोवर्धन कोळेकर? गोवर्धन कोळेकर सध्या औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी आहेत. जीगरबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद जेव्हा औरंगाबादमध्ये उमटले, तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी कोळेकर स्वतः पुढे गेले होते. त्यावेळी झालेल्या दगडफेकीतही त्यांना एक दगड लागला होता. औरंगाबाद पेटण्यामागचं नेमकं कारण काय? औरंगाबाद का धुमसलं यामागे प्रत्येकाकडून वेगवेगळं कारण सांगितलं जात आहे. प्रत्येकाने वेगवेगळा दावा केला आहे. या दंगलीचं पहिलं कारण हे शहागंज भागातून समोर येतंय. सरदार वल्लभभाईंचा पुतळा आणि या ऐतिहासिक पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण त्यासाठी इथे असलेल्या पानाच्या टपऱ्या हलवण्याची आवश्यकता होती. तसे आदेशही निघाले आणि यावरुनच वादाला तोंड फुटलं आणि त्याला धार्मिक रंग मिळाला, असाही दावा आहे. शहागंज भागातल्या बाजारपेठेत काही हातगाडीवाले हे व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गाड्या लावतात. त्यामुळे दुकानदारांचा त्यांचावर रोष होता. दुकानदारांनी स्थानिक नगरसेवक लच्छू पहिलवान यांच्याकडे दादही मागितली होती. त्यानुसार लच्छू पहिलवान यांनी या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी पालिकेकडे केली. याच वादातून ही जाळपोळ झाल्याचा दावा केला जात आहे. महापालिकेच्या पाण्याच्या कनेक्शनवरुन मोतीकारंजा भागात दोन गटात हाणामारी झाली. त्याच हाणामारीने उग्र रुप धारण केलं आणि मग भडका उडाला, असाही काहींचा दावा आहे. चौथी थिअरी तर भयंकर आहे. काही दिवसांपूर्वी शहागंज भागात एका व्यक्तीने आंबे खरेदी केले. त्यातले अनेक आंबे खराब निघाले. तेच आंबे बदलून घेण्यासाठी तो विक्रेत्याकडे गेला. विक्रेत्याशी त्याची बाचाबाची झाली आणि त्याच फळांच्या गाड्या हटवण्याची मागणी सुरु झाली आणि त्यातूनच दंगल उसळली, असंही सांगितलं जातंय. आता त्यात आणखी एका थिअरीची भर घातली ती शिवसेनेने. औरंगाबादमधल्या एका दंगलग्रस्त भागात एका महिलेची छेड काढण्यात आली. त्यावरुन वादाला तोंड फुटलं आणि दोन समुदायाचे लोक एकमेकांवर धावून गेले, असा दावा करण्यात आला. दंगल झाल्यानंतर अफवा पसरवू नका असं खुद्द सरकार आणि पोलीस सांगतात. पण औरंगाबादमधल्या या जाळपोळीमागे वेगवेगळी कारणं सांगून हवा नेमकी कोण देतंय, हा मोठा प्रश्न आहे. संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान

औरंगाबाद का धुमसलं? जाळपोळीची कारणं काय?

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: सचिन अहिरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आदित्य ठाकरेंचं 2029 वरळी विधानसभेतलं आव्हान वाढलं? 
सचिन अहिरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आदित्य ठाकरेंचं 2029 वरळी विधानसभेतलं आव्हान वाढलं? 
Maharashtra Live blog updates: हार्बर रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायर तुटली, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Maharashtra Live blog updates: हार्बर रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायर तुटली, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Goa Travel Restrictions : पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
Maharashtra Live blog updates: हार्बर रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायर तुटली, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Maharashtra Live blog updates: हार्बर रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायर तुटली, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Goa Travel Restrictions : पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
सावकारी परवान्यासाठी घेतली 13 हजाराची लाच, सहाय्यक निबंधकासह तिघांना रंगेहात पकडलं, जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सावकारी परवान्यासाठी घेतली 13 हजाराची लाच, सहाय्यक निबंधकासह तिघांना रंगेहात पकडलं, जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
YouTube Record : रकुल प्रीतचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण यूट्युबवर सुसाट; 100 कोटी व्ह्यूज मिळवणारा जगातील पहिला चित्रपट
रकुल प्रीतचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण यूट्युबवर सुसाट; 100 कोटी व्ह्यूज मिळवणारा जगातील पहिला चित्रपट
धक्कादायक! अल्पवयीन मुलाने टेम्पो चालवून चार वाहनांना दिली धडक, पुण्यातील हडपसरमध्ये ऐन गर्दीच्या वेळी घडला प्रकार 
धक्कादायक! अल्पवयीन मुलाने टेम्पो चालवून चार वाहनांना दिली धडक, पुण्यातील हडपसरमध्ये ऐन गर्दीच्या वेळी घडला प्रकार 
Embed widget