एक्स्प्लोर

'राम मध्यस्थांच्या तावडीत', सामनामधून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात खदखद

आमच्याच भारतात राम वनवासात आहे आणि स्वतःच्याच 1500 चौरस फूट जागेसाठी प्रभू श्रीरामांना मध्यस्थांशी चर्चा करावी लागेल. देवांनाही कोर्टाची पायरी चढावी लागली. कायद्याच्या तावडीतून देवही सुटले नाहीत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न सामनामध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

मुंबई : रामजन्मभूमी जमीन वादावर सुप्रीम कोर्टाने मध्यस्थ नेमल्याबद्दल शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये परखड टीका करण्यात आली आहे. 'राम मध्यस्थांच्या तावडीत' या मथळ्याखाली संपादकीय लिहिलं आहे. काश्मीर हा ज्याप्रमाणे राष्ट्रीय अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, तसा राम मंदिरही तितकाच हिंदू अभिमानाचा विषय आहे. मात्र आमच्याच भारतात राम वनवासात आहे आणि स्वतःच्याच 1500 चौरस फूट जागेसाठी प्रभू श्रीरामांना मध्यस्थांशी चर्चा करावी लागेल. देवांनाही कोर्टाची पायरी चढावी लागली. कायद्याच्या तावडीतून देवही सुटले नाहीत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न सामनामध्ये उपस्थित करण्यात आला आहे. जिथे राजा हरिश्चंद्राला काशीच्या स्मशानघाटावर प्रेते जाळण्याची वेळ आली, त्यामुळे प्रभू श्रीरामांना कोर्टाचे फटके आणि फटकारे खावे लागत आहे, तिथे दोष तरी कोणाला द्यावा? राजकारणी आणि न्यायालयात गेल्या पंचवीस वर्षांपासून राम मंदिर निर्माणाचा जो 'फुटबॉल' झाला आहे. तो काय हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यांना शोभणारा नाही. भाजपवर अशी अप्रत्यक्षरित्या टीका करण्यात आली. दोन्ही बाजूच्या पक्षकारांना मध्यस्थामार्फत, तडजोड मान्य होती तर मग पंचवीस वर्षांपासून हा झगडा का सुरू ठेवला? त्यावरून शेकडो लोकांचे रक्त का सांडले? राममंदिर हा भावनेचा प्रश्न असल्यामुळेच शेकडो कारसेवकांनी त्यासाठी बलिदान दिले हे विसरता येणार नाही. अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न श्रद्धा आणि भावनेचाच आहे. भारतासह जगभरात रामाची शेकडो मंदिरे आहेत, पण अयोध्येत प्रत्यक्ष रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर का नाही हा खरा सवाल आहे आणि तो रास्तच आहे, असं या अग्रलेखात म्हटलं आहे. केंद्र सरकारने स्वत: पुढाकार घेत अध्यादेश काढून राम मंदिराची उभारणी सुरु करावी ही लोकभावना तीव्र आहे. आम्ही स्वत: अयोध्येत जावून लोकभावना बोलून दाखवली. आधी मंदिर, नंतर सरकार ही आमची घोषणा त्यामुळेच लोकप्रिय झाली, पण पुलवामा हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेले वातावरण, यामुळे आधी काश्मीर नंतर मंदिर अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली. आता काश्मीरचा प्रश्न सुटतोय की, लगेच राम मंदिर निर्माण कार्य सुरु होते, हे पाहायचे आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी जमीन वादावर तोडगा काढण्यासाठी काल सुप्रीम कोर्टाने माजी न्यायमूर्ती ईब्राहीम खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली. या समितीमध्ये न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्यासह अध्यात्मिक गुरु श्री.श्री. रविशंकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. मुस्लिम पक्षकार, निर्मोही आखाडा आणि हिंदू महासभेच्या एका गटाने मध्यस्थमार्फत तोडगा काढण्यात यावा, सुप्रीम कोर्टाच्या या सुचनेला सहमती दर्शवली होती. मात्र काही हिंदू संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर काल सुप्रीम कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली. सर्वोच्च न्यायालयानं घेतलेली भूमिका आश्चर्यकारक असल्याचं संघानं म्हटलं आहे. तर एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं होत. मात्र श्री.श्री रविशंकर हे निष्पक्षपणे भूमिका मांडतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्याऐवजी एखादा तटस्थ व्यक्ती नेमायला पाहिजे होता, असं त्यांनी सुचवलं होत. शिवाय निर्मोही आखाड्याचे महंत यांनी देखील रविशंकर यांच्या नावाला विरोध केला होता. आता शिवसेनेही आपल्या मुखपत्रातून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Voter List Revision : पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, 2002 सालच्या मतदार यादीशी नाव जुळवून पाहा; राज्य निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले?
पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, 2002 सालच्या मतदार यादीशी नाव जुळवून पाहा; राज्य निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Live Blog Updates: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live Blog Updates: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट? विधान परिषदेचा फॉर्म्युलाही ठरला!
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट?
Eknath Shinde on Sanjay Shirsat: 'महायुतीत फूट पडेल असं बोलू नका', संजय शिरसाटांच्या 'त्या' विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, फोन करून कडक शब्दांत दिली समज!
'महायुतीत फूट पडेल असं बोलू नका', संजय शिरसाटांच्या 'त्या' विधानानंतर एकनाथ शिंदे संतप्त, फोन करून कडक शब्दांत दिली समज!

व्हिडीओ

Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नाही तर भाजपमध्ये ये...' काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन पुन्हा काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर 'काॅकरोच'च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी
'नाही तर भाजपमध्ये ये...' काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन पुन्हा काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर 'काॅकरोच'च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी
Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट? विधान परिषदेचा फॉर्म्युलाही ठरला!
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 'या' 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट?
Vinesh Phogat: 'आई होणं गुन्हा नाही, कोणत्याच खेळाडूला सूडाच्या भावनेनं वागवलं जाऊ शकत नाही' विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक
'आई होणं गुन्हा नाही, कोणत्याच खेळाडूला सूडाच्या भावनेनं वागवलं जाऊ शकत नाही' विनेश फोगाट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची कुस्ती महासंघाला चपराक
LIC : एलआयसीनं लाभांश, बोनस शेअर जाहीर करताच गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी
LIC : एलआयसीनं लाभांश, बोनस शेअर जाहीर करताच गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद, एलआयसीच्या शेअरमध्ये तेजी
Cockroach Janta Party: 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
'धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या' NEET घोटाळ्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम, जास्तीत जास्त सह्यांचं आवाहन
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Embed widget