एक्स्प्लोर

रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेना लढणार, नारायण राणेंना जागा सोडण्यास शिंदेंच्या शिवसेनेचा नकार?

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. आता ही जागा शिवसेनाच लढणार असे वक्तव्य उदय सामंतांनी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Uday Samant : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) नारायण राणेंना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनाच लढणार असे वक्तव्य केल्याने नारायण राणेंना जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार आहे का? अशी चर्चा होत आहे. 

उदय सामंत म्हणाले की, सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करतात. ते म्हणाले की, लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. त्यामुळे आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. जागांची चर्चा आमचे तीन नेते मिळून करतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेने लढली आहे. त्यामुळे ती जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेने जागा लढवावी, अशी माझी इच्छा आहे. पण निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

शिवसेनेने जिथे जागा लढल्या तिथे दावा

ते पुढे म्हणाले की, प्रमोद सावंत काल आमच्या जिल्ह्यात होते. शिवसेनेने जिथे जागा लढल्या तिथे शिवसेनेचा दावा आहे. ते त्यांचे दुःख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडतील आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे मांडू. नाशिकचे ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला याबाबत उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की,  मला याबाबत फार काही माहिती नाही. 

जागा कुणी लढवाव्या हा निर्णय तिन्ही नेते घेतील

पश्चिम महाराष्ट्र जागा वाटपाबाबत उदय सामंत म्हणाले की, जागा कुणी लढवाव्या हा निर्णय तिन्ही नेते घेतील. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत उदय सामंत म्हणाले की, ही प्रशासकीय बाब आहे. बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांना असतात. त्यामुळे मी बोलणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

जे आमचे विरोधक आहेत त्यांनी असेच काम करावे

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट केलंय, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. यावर उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, नाना पटोले अजून काय वक्तव्य करणार, जे आमचे विरोधक आहेत त्यांनी असेच काम करावे, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आणखी एका जागेवर भाजपचा दावा, राणेंपाठोपाठ दुसरा केंद्रीय मंत्री इच्छुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget