एक्स्प्लोर

शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी 'शेतकरी संवेदना' अभियान; भरारी फाउंडेशनचा उपक्रम

आता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भरारी फाउंडेशन या सामाजिक संस्थने पुढाकार घेतला असून त्यासाठीच्या ‘शेतकरी संवेदना' अभियानाचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका का सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला तालुका आहे. जिथं आता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भरारी फाउंडेशन या सामाजिक संस्थने पुढाकार घेतला असून त्यासाठीच्या ‘शेतकरी संवेदना' अभियानाचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भरारी फाऊंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यात ‘शेतकरी संवेदना अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात पारोळा तालुक्यातील ११४ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अभियानाचा औपचारिक उद्घाटन सोहळा पारोळा तालुक्यात आयो्जित करण्यात आला होता.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पारोळा प्रांतधिकारी, तहसीलदार, बी.डी.ओ., तालुका कृषी अधिकारी, कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा ग्रामीण यंत्रणा अधिकारी, स्वयंम रोजगार हमी योजना अधिकारी, शिक्षण अधिकारी व आरोग्य अधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहिले. या अभियानासाठी मदत करणारे नामवंत उद्योजक के. के. कॅन्सचे रजनीकांत कोठारी, कृषी सम्राटचे बाळासाहेब सुर्यवंशी, स्पार्क इरिगेशनचे रवी लढ्ढा, सुरेश कलेक्शनचे मुकेश हसवानी, नवरंग चहाचे अमर कुकरेजा नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील यांच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात येत आहे.

‘शेतकरी संवेदना अभियान’ कशासाठी?

मागील काही वर्षात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. शेतकऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या परिवारावर मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाने काय करावे? हा प्रश्न असतो. म्हणून भरारी फाउंडेशनने ‘शेतकरी संवेदना अभियान’ हे अभियान सुरू केलं आहे. यासाठी प्रत्येक गावात शेतकरी मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शेतीसोबत जोडधंदा उभारण्यासाठी आर्थिक मदत कशा पद्धतीने उपलब्ध होते, जोड व्यवसाय उभारण्यासाठी यंत्र आणि साधनं कशी मिळू शकतील, महिलांना बचत गटांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या शासनाच्या योजना, बी-बियाणे, खते, विहीर, बोरवेल, पाईपलाईन टाकण्यासाठी सहकार्य, मुला-मुलींचे लग्नकार्य , शिक्षणा सह संवादाच्या माध्यमातून व्यसना धीनता टाळणे, मानसिक आरोग्य जपणे, शेती पूरक उद्योग उभारणी करणे या विषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

Video | समुहनृत्यात सहभागी होत ममता बॅनर्जीही थिरकतात तेव्हा....

मेळाव्यासाठी तालुक्यातील 114 गावातील आत्महत्याग्रस्त परिवारातील शेतकरी कुटुंबियांसह अनेक प्रगतीशील शेतकरी या संवेदना मेळाव्याला उपस्थित होते. शेतकरी आत्महत्या टाळणे हे भरारी फाउंडेशनचं उद्दिष्ट असून त्यासाठी शेतकरी संवाद वाढवण्याचा आणि त्या माध्यमातून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पहिल्यांदा मानसोपचार तज्ञ कडून उपस्थित शेतकरी आणि त्यांच्या परिवाराला मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित शेतकरी परिवाराला मनोविकार ग्रस्त व्यक्तीची लक्षणं सांगितली. यामध्ये एकटे राहणे, चिडचिड करणे, निराशा दाखवणे, जगण्याची ईच्छा नसल्याचे बोलून दाखवणे, कामात लक्ष नसणे, निद्रानाश अशा प्रकारची प्राथमिक लक्षणे ही मनोविकाराची असतात असं सांगितलं. अशा व्यक्ती जास्त करून आत्महत्येकडे प्रवृत्त होत असल्याने अशी लक्षणे दिसल्यावर कुटुंबीयांनी या व्यक्ती कडे जास्त लक्ष दिले पाहिजे आणि अशा व्यक्तींना मानसिक आधार देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला पाहीजे, त्यांच्या उपयोगीते बाबत त्यांना सांगून त्यांचा जगण्याचा विचाराला बळ दिले पाहिजे,ज्या गोष्टीने अशा व्यक्ती चे मानसिक संतुलन बिघडत असेल ते टाळले पाहिजे,मनोविकाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार केल्यास मनोविकार हा आजार बरा होऊ शकतो आणि आत्महत्ये सारखी घटना आपण टाळू शकतो अस मानसोपचार तज्ज्ञांनी म्हटलं आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Ajit Pawar Plane Crash: व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : इंधन तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृह बंद होणार?
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget