एक्स्प्लोर

मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना कोकणातील मुळगावी आणण्याबाबत विचार सुरू : उदय सामंत

रत्नागिरीत शिमग्याकरता आलेल्यांची संख्या ही 1 लाख 16 हजार आहे. ही लोकं लॉकडाऊननंतर रत्नागिरीमध्ये आलेली नाहीत. अशा लोकांची संख्या ही 900 ते 1000 च्या घरात असल्याचं देखील सामंत यांनी स्पष्ट केले.

मुंबई : मुंबईस्थित कोकणातील चाकरमान्यांना गावी आणण्याबाबतच्या मुद्यावरून सध्या कोकणात राजकारण देखील सुरू असल्याचं दिसून येतयं. दरम्यान, या प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. ही वेळ राजकारणाची नाही. योग्य वेळी आणि योग्य ती खबरदारी घेत चाकरमान्यांना त्यांच्या मुळगावी आणलं जाईल. त्याबाबत अद्याप चर्चा सुरू असून कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाय, रत्नागिरीत शिमग्याकरता आलेल्यांची संख्या ही 1 लाख 16 हजार आहे. ही लोकं लॉकडाऊननंतर रत्नागिरीमध्ये आलेली नाहीत. अशा लोकांची संख्या ही 900 ते 1000 च्या घरात असल्याचं देखील सामंत यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊननंतर सध्या मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये कोकणातील लाखो लोक अडकून पडले आहेत. कामानिमित्त लाखो लोक या शहरांमध्ये वास्तव्य करत आहेत.पण, आता मात्र त्यांना त्या ठिकाणी राहणे दिवसेंदिवस अवघड होताना दिसत आहे. भाड्याची खोली आणि कमी जागा असल्याने जास्त लोकांना एका ठिकाणी राहणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यामुळे आता आम्हाला आमच्या गावी परतू द्या अशी मागणी देखील सध्या जोर धरत आहे. या साऱ्या प्रकरणात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत जातीने लक्ष घालताना दिसत आहेत. कारण, चाकरमान्यांना कोकणातील मुळगावी आणण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

लाखोच्या संख्येनं येणाऱ्या लोकांना कुठे ठेवायचे? त्यांना कोणत्या वाहनांनी आणायचे? कोकण रेल्वे किंवा एसटी याकरता वापरता येऊ शकते का? गावी आल्यानंतर त्यांची आरोग्याच्या दृष्टीने कशी काळजी घेणार? याबाबत सध्या विचार सुरू आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी देखील बोलणार असून प्रशासनाशी देखील चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता कोकणवासियांना आपल्या मुळगावी आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोक हे लॉकडाऊननंतर आपल्या मुळगावी आले आहेत. शिवाय, अनेकजण शक्य असेल त्या मार्गाने, नवीन शक्कल लढवत आपल्या मुळगावी येण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

गावच्या लोकांची होत आहे घालमेल मायानगरी मुंबईमध्ये कुणाचा मुलगा, मुलगी, काका, काकी, किंवा नातेवाईक हा कामानिमित्त सध्या वास्तव्य करत आहे. एकंदरीत प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती ही मुंबईमध्ये स्थायिक आहे. स्व:ताचे घर नसेल तरी भाड्याच्या घरात नागरिक राहत आहेत. पण, कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि सारी परिस्थिती बदलली आहे. पगार होत नसल्यानं आर्थिक चणचण देखील निर्माण झाली आहे. भाडे द्यायचे तरी कसे? पोटाची भूक भागवायची तरी कशी? असा प्रश्न देखील त्यांना पडला आहे. त्यामुळे सारी परिस्थिती पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर गावच्या लोकांच्या जीवाची देखील घालमेल होत आहे. आमच्या नातेवाईकांनी परत आणा अशी मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, आता कोकणी माणसाला मुळगावी आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली होत असल्याचे ऐकल्यानंतर अनेकांनी समाधान देखील व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांना गावी पाठवण्याचा निर्णय चार दिवसात : भास्कर जाधव Coronavirus Effect | कोरोनामुळे राजश्री काजूची अवस्था बिकट; काजू ग्राहकापर्यंत न पोहोचता घरातच पडून
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget