एक्स्प्लोर

गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा 4 ऑगस्टपासून सुरु : मंत्री विजय वडेट्टीवार

गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा (Gadchiroli, Chandrapur School Started) 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. या दोन जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन वगळता 4 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार आहेत, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मुंबई : राज्यभरात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं शाळा कधी सुरु होणार हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या समोर आहे. यातच एक महत्वाची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा  4 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. या दोन जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन वगळता 4 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले की, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात गरीब, आदिवासी मोठ्या संख्येने आहेत. 90 टक्के पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. त्यामुळं या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही.  त्यामुळे गरीब आदिवासी मुलांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले. शाळा सुरु करताना नियमावली देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता बाकी ठिकाणी शाळा सुरू होणार आहेत. शाळामध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल, त्यांना मास्क उपलब्ध करून दिले जातील, अंतरावर बसवले जाईल, शाळा सॅनिटाईझ केल्या जातील, असं ते म्हणाले. जिथे कंटेन्मेंट झोन आहे तिथे मात्र शाळा सुरू होणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.  पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून दूरदर्शनवर 'टिलीमिली' आनंददायी शिक्षण गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्के शाळा सुरू होतील, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के शाळा सुरू होतील, असं ते म्हणाले. दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या 4 ऑगस्ट रोजी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी  केंद्राला 1 हजार 65 कोटीचा प्रस्ताव निसर्ग चक्रीवादळसाठी राज्य सरकारने केंद्राला 1 हजार 65 कोटींच्या नुकसान भरपाई साठी प्रस्ताव पाठवला असल्याचे यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले. 18 जुलै रोजी राज्य सरकारने केंद्राला याबाबत पत्र पाठवले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. NDRF च्या निकषानुसार प्राथमिक मागणी केली आहे. विरोधकांचं आरोप करणं काम आहे.  त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते. फडणवीस यांना विनंती करायची आहे त्यांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी. त्यांनीही परिस्थिती पाहिली आहे, ते मदत करतील अशी अपेक्षा आहे, असं देखील वडेट्टीवार म्हणाले. संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, काहीही बोलण्याचा अधिकार आहे का? माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 17 March 2025Aurangzeb Kabar News | कुठे आंदोलन? कुणा-कुणाचा विरोध ?; औरंगजेबाच्या कबरवरुन राज्यात घमासन, संपूर्ण व्हिडीओABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 17 March 2025Harshwardhan Sapkal PC | मी काहीही चुकीचं म्हटलं नाही, त्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, काहीही बोलण्याचा अधिकार आहे का? माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा विधानभवनात दाखल, नेमकं काय घडलं?
Aurangzeb Tomb Controversy : औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का?
औरंगजेबच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचे कवच, वक्फ बोर्डाची जमीन अन् केंद्राची सुरक्षा! राज्य सरकारला कबर हटवणं शक्य आहे का?
Embed widget