एक्स्प्लोर

खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक दिल्लीत बसले आहेत : संजय राऊत

सामना अग्रलेखावरून प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ''मला वाटत नाही की, नाराजी नाट्य फार आहे. सामनाचा एक स्वभाव आहे. एखादी गोष्ट सांगताना आम्ही आमच्या पद्धतीने सांगतो. अधिक सोपी करून सांगतो. चांगली उदाहणंही देतो.'

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून जुनी खाट कुरकुरतेय? या मथळ्याखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. यावरून पुन्हा एकदा काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अग्रलेखावरून बोलताना, 'आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत आहे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्याकडे मांडू. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्र्यांचं समाधान होईल. त्यानंतर सामनाने पुन्हा एकदा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीमुळे आमच्याबद्दल चुकीचा संदेश जातोय," असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. दरम्यान, सामनातील अग्रलेखावरून संजय राऊत यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवरही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत बोलताना म्हणाले की, 'मला वाटत नाही की, नाराजी नाट्य फार आहे. सामनाचा एक स्वभाव आहे. एखादी गोष्ट सांगताना आम्ही आमच्या पद्धतीने सांगतो. अधिक सोपी करून सांगतो. चांगली उदाहणंही देतो. काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. राजकारणात मुरलेला पक्ष आहे. त्यांचे नेते नवे आहेत, तसेच अनेक नेते जुने जाणतेही आहेत. खाट जुनी असली की कुरकुरते जास्त. कारण त्यांना त्यांच्या परंपरेच्या, आपल्या नेतृत्त्वाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. मग ते बोलायला लागतात. तसचं महाराष्ट्रात जे प्रमुख नेते आहेत, बाळासाहेब थोरात अत्यंत सयंमी नेते आहेत ते, दुसरे अशोकराव चव्हाण, जे राज्याचे मुख्यमंत्री होते. यांनी त्यांची भूमिका वृत्तपत्राच्या माध्यमातून, मुलाखतीतून मांडली.'

काँग्रेस नेत्यांनी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सहभागी केलं जात नसल्याचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'सरकारच्या निर्णयात विश्वासात घेतलं जातं की, नाही यावर चर्चा होईलच. पण शेवटी निर्णय कॅबिनेटमध्ये घेतले जातात. माझ्या माहितीप्रमाणे सरकारला सहा महिने झाले, या दिवसांत खूप मोठा निर्णय सरकारने घेतलेला नाही. सरकारने पहिला निर्णय घेतला कर्जमाफीचा, त्यानंतर दुसऱ्या महिन्यापासूनच कोविडच्या संकटाशी लढतोय आपण, त्यात तुफान आलयं कोकणामध्ये. या दोन्ही संकटांशी लढताना निर्णय घेतले गेले, ते कॅबिनेटने घेतले, मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये संपूर्ण कॅबिनेटसहभागी असतं.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'दोनही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री त्यांना भेटतील, चर्चा होईल. थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि माझी चर्चा झाली, हे काँग्रेस नेते त्यांना भेटतील सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. सगळ्याचं संबंध प्रेमाचे आहेत. सरकारला काही गडबड नाही, तुम्ही ते डोक्यातून काढून टाका.'

पाहा व्हिडीओ : खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी सारखे मॅकेनिक बसलेत दिल्लीमध्ये : संजय राऊत

खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक बसले आहेत दिल्लीमध्ये : संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी पुढे बोलताना सरकार 5 वर्ष चालणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'जर कोणी राजभवनाच्या दारात बसले असतील यांचं काहीतरी वाजेल आणि मग आम्ही पहाटे आतमध्ये जाऊन शपथ घेऊ, तर असं काहीच होणार नाही. सरकार 5 वर्ष चालावं ही सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि शिवसेना यासर्वांची ठाम भूमिका आहे.' तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, 'खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक बसले आहेत दिल्लीमध्ये. मेन्टेन्स करायला, रिपेअर करायला. चांगले नेते आहेत ते.'

लढाई आकड्यांशी नाही, रोगाशी आहे : संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनेक आरोप केले आहेत. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या अनेक ठिकाणी दौरे करून माहिती घेत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना अनेक अधिकारी माहितीही देत असतील. या संदर्भात पालिका आयुक्त इकबाल चहल, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे जे आकडे आहेत, ते कोणीही लपवण्याचं कारण नाही.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'या सरकारचा स्वभाव चारित्र्य नाही लपवा छपवी करण्याचं. आम्ही लढण्यासाठी मैदानात उतरलो आहोत कोविड विरोधात. ही लढाई आकड्यांशी नाही, तर त्या रोगाशी आहे.

गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे : संजय राऊत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही चौकशी करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सागंतिलं आहे. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'बॉलिवूडमधील महत्त्वाचा अभिनेता जेव्हा आत्महत्या करतो. त्यासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. तेव्हा गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. कारण लोकांच्या मनातील शंका दूर करणं हे सरकारचं काम आहे.'

महत्त्वाच्या बातम्या : 

आम्ही भक्कमपणे आघाडीसोबत, आमच्या भेटीनंतर 'सामना'ने पुन्हा अग्रलेख लिहावा : बाळासाहेब थोरात

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget