एक्स्प्लोर

Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन

Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणूस आपल्याला मतदान करेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा असल्याने 15 तारखेला निवडणुका घ्यायच्या ठरल्या.

Raj Thackeray on BMC Election 2026: मुंबईचा विकास होईल. पण मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहण्याची गरज आहे. मुंबईचं वर्णन 'स्टेट विदिन स्टेट' असे केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई ही मराठी माणसाच्या (Marathi Manus) हातात आहे. पण भविष्यात हे चित्र पूर्णपणे बदलून टाकण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. ते शुक्रवारी एबीपीच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी भविष्यात संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा कसा बदलला जाऊ शकतो, याची सविस्तर मांडणी केली. (Mumbai Mahanagarpaliaka Election 2026)

मला 2024 ते 2025 यादरम्यान एक व्यक्ती भेटली होती. त्या व्यक्तीने मला मुंबईत आगामी काळात होऊ घातलेल्या गोष्टी आणि आराखडा ऐकून मी हबकून गेलो. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना इतका उशीर त्यासाठीच झाला. कारण राज्य सरकारला काही गोष्टी या प्रशासकामार्फत करुन घ्यायच्या होत्या. निवडणूक होऊन दुसऱ्या पक्षाचे सरकार आल्यावर त्रास नको म्हणून या सर्व गोष्टी आधीच करायच्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकारचा सर्व फोकस हा एमएमआरए रिजनवर आहे.  याचं छोटसं उदाहरण मी सांगतो. वाढवण बंदर झालं, ती गरज होती, हे मी समजू शकतो. पण आता वाढवण बंदराच्या बाजूला एअरपोर्टही होत आहे. वाढवण विमानतळ कशासाठी बांधले जात आहे तर इथून मुंबईचा कार्गोचा सगळा भाग तिकडे शिफ्ट केला जाईल. यानंतर नवी मुंबई विमानतळ उभारण्यात आले आहे तिकडे सध्या मुंबईतून होत असलेली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक शिफ्ट केली जाईल. सध्या मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींच्या ताब्यात आहे. वाढवण आणि नवी मुंबई विमानतळामुळे या विमानतळाची गरज संपुष्टात येईल. तसे झाली की धारावी आणि कलिना परिसराला लागून असलेला मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींना विकला जाईल. आपण हा सगळा परिसर गुगल मॅपवर पाहिल्यावर लक्षात येईल की, या भागात शिवाजी पार्कसारखी 50 ते 60 मैदान बसू शकतात. तोच प्लॉट राज्य सरकार विकायला काढणार आहे. मला 100 टक्के वाटते, सध्याच्या मुंबई विमानतळाच्या जागेची विक्री होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 

बुलेट ट्रेनलाही माझा विरोध होता. बुलेट ट्रेन ही मुंबई, ठाणे आणि पालघर या मार्गाने जाणार आहे. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मुंबईत भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईचा डीएनए गुजरातला मिळतो, असे विधान केले होते. या सगळ्याच्या खोलात गेल्यावर आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची पाळंमुळं दिसतील. तेव्हाही मुंबईतील व्यापाऱ्यांचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता, हे राज ठाकरे यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 

Mumbai news: देवेंद्र फडणवीस हा बसवलेला माणूस, सांगेल त्या कागदावर सह्या कराव्या लागात: राज ठाकरे

मुंबई फक्त ठाकरेंच्या हातातच सुरक्षित का आहे, इतर पक्षांच्या हातात का नाही, असा प्रश्न यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, होय मुंबई फक्त ठाकरेंच्या हातातच सुरक्षित आहे. मुंबई ही केंद्रशासित करण्याचा डाव 100 टक्के आहे. देवेंद्र  फडणवीस किंवा त्यांचे सहकारी असणारे जे महाराष्ट्रातील नेते आहेत, ही बसवलेली माणसं आहेत, बसलेली नाहीत. ठाकरेंच्या वरती कोणी नाही.  त्यांना जे वरुन सांगितलं जाणार, ज्या कागदावर सह्या करायला सांगितल्या जाणार, तिकडे ते सह्या करणार. याचं उदाहरण म्हणजे देवनारचे डंपिंग ग्राऊंड अदानींना देण्यात आले. यांनी फक्त कागदावर सह्या केल्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

भविष्यात मुंबई महानगर प्रदेशात यांना ज्या गोष्टी करायच्या आहे, त्या महानगरपालिकांच्या परवानगीशिवाय करता येणार नाहीत. महानगरपालिका त्याला अटकाव करु शकतात. टाटा आणि बिर्लांनी अख्ख्या आयुष्यात जितकी संपत्ती कमावली नाही तेवढी संपत्ती अदानींनी फक्त टीडीआरमधून कमावली. धारावीच्या टीडीआरमधून अदानींना 4 लाख कोटींचा नफा होणार आहे. याशिवाय, मुंबई कोणी काय करायचे, या टीडीआरचे अधिकारही अदानींच्या हातात गेले आहेत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. 

आणखी वाचा

राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Sonam Wangchuk Ended Hunger Strike: मोठी बातमी: 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
मोठी बातमी: 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget