![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mansukh Hiren Death Case | सचिन वाझेंच्या उपस्थितीत मनसुख हिरण यांची हत्या?
एटीएसच्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरीतील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
![Mansukh Hiren Death Case | सचिन वाझेंच्या उपस्थितीत मनसुख हिरण यांची हत्या? Sachin Vaze present at the time of Mansukh Hiren Death in antilia bomb scare Mansukh Hiren Death Case | सचिन वाझेंच्या उपस्थितीत मनसुख हिरण यांची हत्या?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/25/21279092873ca0c0f85d783b8086e4a3_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मनसुख हिरण हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे तिथे उपस्थित होते, असा संशय एटीएसनं एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटीएसच्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरीतील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
आपल्या चौकशी अहवलात एटीएसने लिहिले आहे की, मनसुख यांच्या हत्येनंतर रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी वाझे डोंगरी येथे गेले होते. त्या दिवशीच्या यांना कोणाचाही कॉल आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने टिप्सी बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये सचिन वाझे 11 वाजून 38 मिनिटांनी आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे.
मनसुख यांना तावडे नावाच्या व्यक्तीने रात्री 8 वाजून 32 मिनिटांनी फोन केला. फोन केल्यानंतर मनसुख रिक्षाने ठाण्यातील खोपट परिसरातील विकास पाल्मस आंबेडकर रस्त्यावरून गेले. मनसुख यांच्याकडे स्वत:ची कार आणि तीन मोटरसायकल असताना देखील त्यांनी रिक्षाचा वापर केला. त्याच दिवशी मनसुख यांच्या पत्नीने रात्री 11 वाजता फोन केला असता फोन बंद होता. मनसुख यांच्याकडे एक मोबाईल होता. ज्यामध्ये दोन सिमकार्ड होते. एटीएसने त्या दोन्ही क्रमांकाचे सीडीआर काढले तेव्हा त्यामध्ये मनसुख यांना शेवटचा फोन हा 8 वाजून 32 मिनिटांनी आला होता. त्यानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी चार मेसेज आले होते. चारही मेसेज आले तेव्हा त्यांचे लोकेशन वसई येथील मालजीपाडा दाखवत आहे. या सर्व घटनाक्रमानंतर एटीएसला अंदाज आहे की, मनसुख यांचे रात्री 9 च्या सुमारास अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा फोन काढून घेण्यात आला. त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत फेकण्यात आला.
अटक केलेल्यामध्ये आरोपींमध्ये माजी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांचा समावेश आहे. विनायक शिंदे वाझे यांच्याशी बोलण्यासाठी खोटी कागपत्रे सादर करून सिमकार्ड खरेदी केले होते. जे सिमकार्ड शिंदे यांनी क्रिकेट बुकी नरेश गोर याच्याकडून गुजरातहून मागवले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)