एक्स्प्लोर

Russia Ukraine War : मोदीजी आम्हाला वाचवा नाहीतर आमचा जीव जाईल, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची आर्त विनवणी

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून देशात परतण्याची मदतची मागणी करणारे संदेश पाठवत आहेत.

 Russia Ukraine Conflict :  युक्रेन-रशियामध्ये (Ukraine-Russia War) युद्ध सुरू आहे,  युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनच्या सुमी शहरात तब्बल 900 भारतीय विद्यार्थी अडकून पडलेत. या शहरात दर तासाला रशियाकडून बॉम्बहल्ले होत असल्यानं विद्यार्थी धास्तावले आहेत. या विद्यार्थ्यांना अन्न तर सोडाच, पण साधं पाणीही  प्यायला नसल्यानं रस्त्यावर पडलेला बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  त्यामुळं हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आले असून मोदीजी आम्हाला वाचवा, अन्यथा आमचा जीव जाईल, अशी आर्त विनवणी  युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे. 

सुमी हे शहर युक्रेनच्या उत्तर पूर्व भागात असून रशियाच्या बॉर्डरपासून अवघ्या 50  किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी गेलेले तब्बल 900 भारतीय विद्यार्थी रशिया युक्रेन युद्धामुळे अडकून पडले आहेत. सुमी शहरात सध्या दर तासाला बॉम्ब हल्ले होत असून त्यामुळं विदयार्थी राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये वीज, अन्न, पाणी याचा पुरवठा बंद झाला आहे.  या सगळ्याबाबत तेथील  एका भारतीय विद्यार्थ्यानं व्हिडीओ तयार करून पाठवला असून त्यात हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आल्याचं पाहायला मिळतंय. 

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी म्हणाले,  आम्ही 900 विद्यार्थी येथे अडकलो असून आम्हाला बाहेर पडण्याचीही सोय नाही. प्रत्येक ठिकाणी स्नायपर्स तैनात असून यापूर्वी बाहेर पडलेल्या काही परदेशी विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. आम्हाला खायला प्यायला काहीच उरलेलं नाही. आम्ही काल दुपारी शेवटचं जेवलो, दुपारचंच उरलेलं थोडंसं अन्न रात्रीही खाल्लं, पण आता आमच्याकडे खायला काहीच नाही, त्यामुळं आम्ही उपाशी आहोत. प्यायला,  सुद्धा पाणी नाहीये, त्यामुळं अक्षरशः रस्त्यावर पडलेला बर्फ जमा करून तो वितळवून पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळं मोदीजी आम्हाला वाचवा, नाहीतर आमचा जीव जाईल, अशी विनवणी हे विद्यार्थ्यांनी दिली आहे. 

सुमी शहरापासून रशियाची बॉर्डर ही अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र भारताचं रेस्क्यू ऑपरेशन हंगेरी, रोमानिया या बाजूनं सुरू असून तिथं आम्ही जाऊच शकत नाही, कारण तिथे जायला किमान 12 तासांचा प्रवास करावा लागणार असून त्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचं हे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळं सुमी शहरात अडकलेल्या या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनं युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

संबंधित बातम्या :

Russia-Ukraine War : भारतीय विद्यार्थ्याने युक्रेन सोडण्यासाठी घातली अट, मग 'असा' पोहोचला भारतात!

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget