एक्स्प्लोर

सरकारला खोटं पण रेटून बोलायची सवय, 61 पैकी 45 MOU भारतातील कंपन्यांशीच, रोहित पवारांचा हल्लाबोल   

दावोसमध्ये 98 टक्के गुंतवणूकीचे करार परदेशी कंपन्यांशी केल्याची सरकारी वक्तव्ये बघून आश्चर्य वाटत नाही, कारण सरकारला रेटून खोटं बोलायची सवय असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं.

Rohit Pawar : दावोसमध्ये 98 टक्के गुंतवणूकीचे करार परदेशी कंपन्यांशी केल्याची सरकारी वक्तव्ये बघून आश्चर्य वाटत नाही, कारण सरकारला रेटून खोटं बोलायची सवयच असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. आता तर ही सवय अधिक Pro version मध्ये Develop झालेली दिसत असल्याचे पवार म्हणाले. दावोस दौऱ्याच्या मुद्यावरुन रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

61 MOU पैकी 45 MOU भारतातील कंपन्यांशीच

61 MOU पैकी 45 MOU भारतातील कंपन्यांशीच झाले आहेत. या कंपन्यांनी 11,02040 कोटीचे करार म्हणजेच 74 टक्के गुतंवणूक आपल्या देशातील कंपन्यांनीच केली असल्याचे रोहित पवार म्हणाले. याहून विशेष म्हणजे देशातील कंपन्यांनी केलेल्या 45 MOU पैकी 36 MOU महाराष्ट्रातल्या कंपन्यानीच केली आहे. म्हणजे जवळपास 10,13642 कोटीची म्हणजेच  67 टक्के  गुंतवणुकीचे करार हे राज्यातीलच असल्याचे रोहित पवार म्हणाले. यामध्ये काही कंपन्या तर नरीमन पॉईंट भागातच आहेत. एका कंपनीने तर 3.05 लाख कोटीचा MOU व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केला. म्हणजे कंपनीचे प्रतिनिधी इकडे मुंबईत, मुख्यमंत्री तिकडे दावोसला असा मुंबई-दावोस दरम्यान  व्हिडीओ कॉन्फरन्सने करार केला गेल्याचे रोहित पवार म्हणाले.

 

खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज का पडते ?

सरकार दावोसला जाऊन अपयशी ठरले असे नाही, परंतु खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज का पडते? हा  प्रश्न पडत असल्याचे रोहित पवार म्हणाले. देशातील आणि महाराष्ट्रातील कंपन्यांशीच करार केले जात असतील तर मग दावोस जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच Magnetic Maharashtra सारख्या कार्यक्रमावर भर द्यायला हरकत नसावी असे रोहित पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहीला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. तसेच दावोस मधील इकॉनॉमी फोरममध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले. दावोस मध्ये गुंतवणूकीचे 54 आणि धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकूण 61 सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. महाराष्ट्रासाठी गुंतवणूकीचे असे विक्रमी सामंजस्य करार झाले याचा आनंद आहे. यातून भारताची आणि पर्यायाने महाराष्ट्राची ताकद वाढते आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे देशात होणाऱ्या सामंजस्य करारांचे यश हे चाळीस टक्क्यांपर्यंत असते. पण हेच प्रमाण महाराष्ट्राच्याबाबतीत सुमारे 65 टक्के असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल
देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु' असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मात्र मौन, महागाईवरुन कोल्हेंचा हल्लाबोल
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली

व्हिडीओ

Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; वेगळा देश असता, तर तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती : सीएम देवेंद्र फडणवीस
Embed widget