एक्स्प्लोर

हापूस प्रेमींची पावसामुळे होईल निराशा; पावसाचा असा होतोय हापूसवर परिणाम!

मार्च महिना सुरू झाल्यानंतर हापूसच्या आगमनाची आणि त्याची चव चाखण्याची घाई प्रत्येक हापूस प्रेमीला असते. पण, यंदा मात्र पावसामुळे हापूस प्रेमींची निराशा होऊ शकते.

हापूस! कोकणचा राजा. अनेकांचं आवडीचं फळ. मार्च महिना सुरू झाल्यानंतर हापूसच्या आगमनाची आणि त्याची चव चाखण्याची घाई प्रत्येक हापूस प्रेमीला असते. पण, यंदा मात्र पावसामुळे हापूस प्रेमींची निराशा होऊ शकते. कारण राज्याच्या इतर भागात कोसळत असलेला पाऊस अद्याप देखील कोकणातील बहुतांश भागात धो - धो कोसळत आहे. परिणामी त्याचा परिणाम हापूसच्या मोहोर प्रक्रियेवर होऊन हापूस बाजारात दाखल होण्यावर होऊ शकते. कारण, नोव्हेंबर महिन्यात पडणारी कडाक्याची थंडी हापूससाठी पोषक मानली जाते. पण, आता पाऊस कोसळत असल्यानं सारी गणितं बदलली आहे. त्यामुळे कोकणातील छोट्या - मोठ्या हापूस बागायतदारांना याचा फटका बसणार आहे. हापूसच्या मोहोर प्रक्रियेदरम्यान पाऊस झाल्यानं हापूसचं आगमन देखील लांबण्याची दाट शक्यता आहे. 
 
काय होईल परिणाम? 
दरम्यान, सध्याच्या वातावरणाचा काय परिणाम होईल? याची माहिती घेण्यासाठी 'एबीपी माझा'नं प्रदिप सावंत या आंबा बागायतदारांशी संपर्क केला. प्रदिप सावंत हे मागिल 30 ते 35 वर्षापासून आंबा व्यवसायात असून त्यांची जवळपास 1 हजार हापूस आंब्याची झाडं आहेत. यातून ते दरवर्षी किमान 2500 ते 3000 आंबा पेट्यांचं उत्पादन करतात. यावेळी बोलताना सावंत यांनी सांगितले, 'पावसानं आंबा बागायतदारांची सारी गणितं बिघडवली. काही जणांनी पहिली आणि दुसरी फवारणी झाडांवर केली असून त्यातून काही लाखांचा देखील खर्च केला आहे. कारण माझ्या एक हजार झाडांना फवारणी करण्यासाठी मला 8 ते 10 लाखांचा खर्च येतो. त्यावरून एक किमान तुम्हाला अंदाज येईल. पण, पावसानं केलेल्या साऱ्या फवारण्या मातीमोल केल्या. आता किमान कुठं तरी दिसणारा मोहोर जाणार. झाडांना रोगांचा सामना करावा लागणार. त्यामुळे फवारणीसाठीचा हा खर्च आणखी देखील वाढू शकतो. शिवाय, थंडी देखील न पडल्यास हापूसच्या मोहोर प्रक्रिया लांबल्यास त्याचा परिणाम हा हापूस बाजारात दाखल होण्यावर होणार आहे'  
 
निसर्ग बदलाचा काय होतोय परिणाम?
 सावंत पुढे म्हणाले, 'मी जवळपास 30 ते 35 वर्षापासून आंबा बागायतदार म्हणून व्यवहार करत आहे.पण. 2009 साली कोकण किनारपट्टीवर फयान चक्रीवादळ आलं. त्यानंतर वातावरणात सातत्यानं बदल जाणवू लागले. मागील दोन ते तीन वर्षाचा विचार केल्यास निसर्ग आमच्यावर आणखीच रूसला आहे कि काय? असा प्रश्न पडतो. 'फयान'मुळे झाडं मुळापासून हलली. अगदी हल्लीच आलेल्या 'निसर्ग चक्रीवादळा'नं  देखील मोठा फटका दिला. हे सारं कमी म्हणून कि काय, 'तोक्ते चक्रीवादळ' आलं. त्यानंतर यंदा मे महिन्याच्या मध्यात आलेल्या पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालं. हा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्याप अर्थात नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरू आहे. मी यापूर्वी अगदी हजार झाडांमधून 5 ते 6 हजार आंब्याच्या पेट्या विकत असे. पण, निसर्ग बदलाचा आणि त्याच्या लहरीपणाचा फटका आम्हाला नक्कीच बसत आहे. अशावेळी काय करणार?',अशी प्रतिक्रिया त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. 
 
अर्थकारण बिघडतं
रत्नागिरी जिल्ह्यात किमान 66 हजार हेक्टरवर हापूसची लागवड आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे या संपूर्ण लागवडीवर मात्र नक्कीच परिणाम होतो. वाढता खर्च, त्यानंतर मिळणारं उत्पन्न यांचा ताळमेळ देखील बसत नाही असं आंबा बागायतदार सांगतात. परिणामी निसर्गाची साथ हिच बळीराजासाठी महत्वाची आहे. 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियाला सुरुवात
Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियाला सुरुवात
Rohit Pawar and Dhananjay Munde: महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचंय म्हणून झिरवाळांना पक्षाकडूनच अडचणीत आणलं जातंय; रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
महाराष्ट्राला नको असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद द्यायचंय म्हणून झिरवाळांना पक्षाकडूनच अडचणीत आणलं जातंय; रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
शरद पवार मोठे नेते पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही; ठाकरेंच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं
शरद पवार मोठे नेते पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही; ठाकरेंच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल

व्हिडीओ

Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण
Rohit Pawar on Ajit Pawar Accident : दादांच्या अपघाताच्या चौकशीचा तिढा FIR साठी लढा` Special Report
Sunetra Pawar NCP President : आव्हानांचे डोंगर सुनेत्राताई कशा पेलणार? Special Report
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Sunetra Pawar UNCUT Speech : हुंदका दाटला, निर्धार केला, दादांची स्वप्न पूर्ण करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
शरद पवार मोठे नेते पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही; ठाकरेंच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं
शरद पवार मोठे नेते पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही; ठाकरेंच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं
Gold Silver Rate Update : चांदीच्या दरात 8200 रुपयांची वाढं, सोन्याच्या दरात वाढ सुरुच, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात 8200 रुपयांची वाढं, सोन्याच्या दरात वाढ सुरुच, जाणून घ्या नवे दर
Rohit Pawar: कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
अजितदादांना कंट्रोल करता आलं नाही, पण सुनेत्रा काकींना कंट्रोल करता येईल, या भ्रमात राहू नका; रोहित पवारांचा प्रफुल पटेल, तटकरेंना इशारा
Ladki Bahin Yojana : सतेज पाटलांच्या प्रश्नावर बोलताना गणेश नाईक म्हणाले लाडकी बहीणमुळं इतर खात्यांवर अन्यायाची परिस्थिती, लगेच बाजू सावरत म्हणाले योजना बंद होणार नाही
सतेज पाटलांच्या प्रश्नावर बोलताना गणेश नाईक म्हणाले लाडकी बहीणमुळं इतर खात्यांवर अन्यायाची परिस्थिती मात्र...
Rohit Pawar: 'तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल? या चार नेत्यांनी थोडं सांभाळून राहावं आणि सांभाळून वागावं' रोहित पवारांचा थेट गर्भित इशारा
'तर बाकीच्यांची काय परिस्थिती असेल? या चार नेत्यांनी थोडं सांभाळून राहावं आणि सांभाळून वागावं' रोहित पवारांचा थेट गर्भित इशारा
रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Pune News: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आढळला बेपत्ता मजुराचा मृतदेह, मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्...; नेमकं काय घडलं?
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आढळला बेपत्ता मजुराचा मृतदेह, मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्...; नेमकं काय घडलं?
Embed widget