एक्स्प्लोर

गाळात रुतला ‘सूर्या’, कालवे बनले उकिरडे!

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुमारे 100 गावांना सूर्या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. याच कालव्यातून 14 हजार 500 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली आहे. ज्यामुळे येथील शेतकरी दुबार पीक घेतो.

पालघर : डहाणू आणि पालघर तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात शेतीला सूर्या प्रकल्प अंतर्गत कलव्यातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु गेल्या 10 ते 15 वर्षांपासून कालव्यांची डागडुजी, गाळ काढण्याची आणि साफसफाईची कामे केली नसल्याचे पाणी पुरवठा करणारे कालवे सध्या उकिरडे बनले आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुमारे 100 गावांना सूर्या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. याच कालव्यातून 14 हजार 500 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली आहे. ज्यामुळे येथील शेतकरी दुबार पीक घेतो. तर दरवर्षी 15 डिसेंबरपासून कालव्यातून जिल्ह्यातील शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र गाळ साचल्याने, साफसफाई न केल्याने चालू वर्षी 18 तारखेपासून पाणी सोडले खरे, पण अद्यापही काळव्यातून पाणी शेवटी पोहोचलाच नाही. सूर्याचे पाणी उर्से, ऐना, सारणी, दाभोण, साखरे चिंचपाडा, बऱ्हाणपूर, आंबेदा, आकेगव्हान इत्यादी मुख्य कालवे हे डोंगरालगत असल्याने मोठया प्रमाणात माती, दगडाने, पाचोळा, काटेरी झाडे यांनी भरले आहेत. पावसाळ्यात मोठ्या डोंगर भागातून माती, मुरुम, दगड इत्यादी गोष्टी वाहून येत असल्याने कालवे भरले. त्याचप्रमाणे कालव्यांना जोडणारे काही ठिकाणचे लघु कालवे व त्यालगत असणारे उप-कालवे अद्याप माती भरावांचे आहेत. सदर लघु कालव्यातून थेट शेतीला पाणीपुरवठा केला जातो. सदर लघु कालव्यात मोठ्या प्रमाणात गवत झुडपे वाढलेली आहेत. तसेच सतत माती साचून हे कालवे उथळ झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होत असल्याने पाणी मोठया प्रमाणात वाया जाते परिणामी शेवटच्या शेती प्रयत्न पाणी पोहोचत नाही, तर मुख्य कालव्यातून व लघुकालव्यातून शेतीला पाणीपुरवठा करणारे गेटही गाळ साचल्याने भरले आहेत आणि काही तुटून गेले आहेत. त्यांची वेळोवेळी दुरुस्ती झाली नसल्याने पाणी गळती होते. त्यामुळे कालवे असूनही पाणीच मिळत नाही किंवा मिळते ते अपूर्ण यामुळे पिके होरपळून जातात म्हणून काही शेतकऱ्यांनी शेती दोन वर्षापासून ओस टाकली आहे. गाळ, रेती, दगडगोटे, झाडे झुडपे, गवत,यांनी कालवे मोठया प्रमाणात भरल्याने पाण्याचा प्रवाह कमी होतो. काही नाले मोऱ्यांमध्ये हा सर्व गाळ साचल्याने ते बंद होतात. त्यामुळे पाणी पुढे न जाता मध्येच कालवे फुटतात किंवा पाणी ओसंडून वाहून जाते. दरम्यान काही ठिकाणी सतत गाळ साचल्याने कालवे दिसेनासे झालेत तर काही ठिकाणी बुजून गेले आहेत. जलसंपदा विभागाला बिगर सिंचनातून सूर्या प्रकल्पातून साधरण 20 कोटी तर सिंचनातून 2 ते  3 कोटी व वीज प्रकल्प असे साधारण वार्षिक 24 ते 25 कोटी उत्पन्न मिळते. मात्र तरीही कालव्यांची दुरुती केली जात नसल्याने कालव्यांची दयनीय स्थिती झाली आहे. त्यातच यावर्षी एमएमआरडीएने सूर्याचं पाणी आरक्षित केल्याने शेतकाऱ्यासमोर मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे, तर या पुढे फक्त 19 हजार हेक्टर पैकी 8 हजार हेक्टरच भाग सिंचनाखाली ठेवण्यात येईल. मुळात पाणीपट्टीच्या रुपाने 24 ते 25 कोटी रुपये दरवर्षी वसूल होत असतानाही कालव्यांची डागडुजी का होत नाही, असा सवाल शेतकरी संघटनांकडून विचारण्यत येतो आहे. तर 30 ते 35 वर्ष ह्या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा होत आहे. काही वर्षांपासून कालवेदुरुस्तीसाठी शासनाची परवानगीच न मिळाल्याने दुरुस्ती झाली नाही. परंतु आता आम्ही पाणी वापर संस्था स्थापन करुन ह्या कालवयांची जबाबदारी शेतकऱ्यांवर सोपवण्याचा विचार करत आहोत. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण हे सर्वात जास्त पाणी साठवण्याची क्षमता असलेले धरण असून या धरणातून वसई विरार महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्र, तारापूर अणूउर्जा प्रकल्प, डहाणू रिलायन्स, आजूबाजूची सर्व शहर त्याच प्रमाणे उन्हाळ्यात सूर्या उजव्या आणि डाव्या कालव्याअंतर्गत शेतीला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र कालव्याअंतर्गत सोडण्यात आलेले पाणी कालवे नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे चित्र आहे. तर दिवसेंदिवस भाताला भाव कमी मिळत असल्याने नाईलाजास्तव भातशेतीच करावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कवडास धरण पूर्ण भरलं आहे, तर धामणी धरण 100 टक्के पाणीसाठा आहे. चालू वर्षी पुरेसा पाऊस  झाल्याने प्रथमच धामणी धरण ओव्हरफ्लो झालं. कवडास आणि धामणी धरणातील 21% पाणी पिण्यासाठी, 74% शेतीसाठी 5% उद्योग क्षेत्रासाठी वापरण्यात येते. शिवाय, धामणी धरणातून 7 मेगावॅट वीजनिर्मितीही होते. या धरणाच्या पाण्याखाली एकूण 14,696 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते, तर धरणाची पाणी क्षमता 299.09 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण म्हणजे सर्वात जास्त पाण्याची क्षमता असणारे धरण आहे.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aditya Thackeray Nitesh Rane : कट्टर विरोधक आमनेसामने, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हात ठेवून काय म्हटलं? विधिमंडळ परिसरातील 'तो' क्षण चर्चेत!
कट्टर विरोधक आमनेसामने, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हात ठेवून काय म्हटलं? विधिमंडळ परिसरातील 'तो' क्षण चर्चेत!
Mumbai Local Train Crime: फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं
फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं
Ranajagjitsinha Patil on Omraje : ओमराजेंच्या शिवसेनाप्रवेशावर कट्टर विरोधक राणाजगजीतसिंह पाटलांची रोखठोक प्रतिक्रिया; 2029 बाबतच्या निवडणुकीवर म्हणाले...
ओमराजेंच्या शिवसेनाप्रवेशावर कट्टर विरोधक राणाजगजीतसिंह पाटलांची रोखठोक प्रतिक्रिया; 2029 बाबतच्या निवडणुकीवर म्हणाले...
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: चेतन मास्क, हुडी, हेडफोन्स घालून आला, तिकीट न घेताच घुसला; लोहगडावरील सुरक्षारक्षकाने अडवताच म्हणाला, सर...
चेतन मास्क, हुडी, हेडफोन्स घालून आला, तिकीट न घेताच घुसला; लोहगडावरील सुरक्षारक्षकाने अडवताच म्हणाला, सर...

व्हिडीओ

Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा
MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
Mumbai Local Train Crime: फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत चाकूने सपासप वार
फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत चाकूने सपासप वार
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
तिने लग्नास नकार देताच थेट हनिमूनचे डीपफेक फोटो तयार केले, एकाच दिवसात तब्बल 500 ओला, उबर आणि रॅपिडो टॅक्सी तिच्या घरी पाठवल्या अन्
तिने लग्नास नकार देताच थेट हनिमूनचे डीपफेक फोटो तयार केले, एकाच दिवसात तब्बल 500 ओला, उबर आणि रॅपिडो टॅक्सी तिच्या घरी पाठवल्या अन्
Mumbai Rain Ritu Tawde: इकडे महापौर रितू तावडे नालेसफाईचं कौतुक सांगत होत्या अन् मागे BMC चा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला
इकडे महापौर नालेसफाईचं कौतुक सांगत होत्या अन् मागे BMC चा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
पीएम मोदी काल राष्ट्रपतीच्या भेटीला अन् आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा, आप, टीएमसीसह राज्यातील फुटीर खासदारांना मंत्रिपदांची शक्यता
पीएम मोदी काल राष्ट्रपतीच्या भेटीला अन् आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक; मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा, आप, टीएमसीसह राज्यातील फुटीर खासदारांना मंत्रिपदांची शक्यता
Embed widget