Nashik News: काय सांगता! एका रुपयात भात पिकाला 49 हजार रुपयांचं संरक्षण, असा करा पीक विमा अर्ज?
Nashik : केवळ एका रुपयांत पिकांना हजारो रुपयांचे संरक्षण दिले जाणार असल्याने पीक विम्यासाठी (Pik Vima Registration) नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Pik Vima : पीकविमा योजनेंतर्गत नाशिक (Nashik) जिल्ह्यात भात पिकाला प्रतिहेक्टर 49 हजारांचे संरक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर इतरही पिकांना पीक विमा संरक्षण योजनेंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आजच पीक विमा योजनेचा अर्ज करून पिकाला संरक्षण द्याव्यायचे आहे. शिवाय केवळ एका रुपयांत पिकांना हजारो रुपयांचे संरक्षण दिले जाणार असल्याने पीक विम्यासाठी (Pik Vima Registration) नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून (Agri) करण्यात आले आहे.
खरीप हंगामात (Kharip Season) पिकांच्या पेरणीपासून (Sowing) ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. केवळ एक रुपया भरून पीकविम्यासाठी www.pmfby.gov.in पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रूपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तुर, मका ही तृणधान्य व कडधान्य तसेच भुईमूग, कारळा, सोयाबिन ही गळीत धान्य पीके आणि कापूस खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील.
त्यानुसार पिकांच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे आणि हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्यामुळे होणारे नुकसानीचा पिकविम्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे पिकाच्या काढणीनंतर नुकसान झाल्यास देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील असणार आहे. पात्र लाभार्थी कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना ऐच्छिक असली तरी या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
कोणत्या पीक विम्याला संरक्षण
दरम्यान पीक विमा संरक्षण योजनेच्या जनजागृतीसाठी नाशिक जिल्ह्यात दोन प्रचाररथ तयार करण्यात आले असून प्रचाररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या पीक विमा योजनेत पिकनिहाय प्रति. हेक्टर विमा संरक्षित रक्कम लागू असणार आहे. भात 49 हजार 500, ज्वारी 30 हजार, बाजरी 30 हजार, नागली 13 हजार 750, मका - रूपये 35 हजार 598, तूर 36 हजार 800, मुग 20 हजार, उडीद 20 हजार, भुईमूग 42 हजार 900, कापूस 49 हजार 500, कारळे 13 हजार 750, सोयाबिन 49 हजार 500, खरीप कांदा 81 हजार रुपये इतके पीक विमा संरक्षण मिळणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. यासाठी महा ई सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र, राष्ट्रीयकृत बँका येथे पीक विमा काढता येईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
महत्त्वाच्या बातम्या






















