एक्स्प्लोर

Param Bir Singh Case : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, परमबीर सिंह प्रकरण सीबीआयकडे वर्ग

Param Bir Singh Case : परमबीर सिंह  प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होणे गरजेची असून सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे.

मुंबई : परमबीर सिंहावर (Parambir Singh) दाखल असलेली सर्व  प्रकरण आता राज्य सरकारकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. एका आठवड्याच्या आत सर्व माहिती ही सीबीआयला द्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे.

परमबीर सिंह यांच्यावरील आरोपमुळे  महाराष्ट्रातील राजकारण संपूर्ण ढवळून गेले आहे. परमबीर सिंह  प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होणे अपेक्षित असून सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. सध्या परमबीर सिंह यांचे निलंबन कायम राहणार आहे. परमबीर सिंह यांच्या प्रकरणात जर एखादी एफआयआर दाखल झाली तर त्याचा तपास देखील सीबीआय करणार असल्याचे न्यायालयने  म्हटले आहे. जेव्हा गृहमंत्री आणि आयुक्त अशा प्रकारचे आरोप एकमेकांवर करतात तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो. यासाठी सत्य समोर येणे आवश्यक असून त्यासाठी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. 

महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अनेक प्रकरणात सीबीआयची एन्ट्री झाली आहे. आता आणखी एका प्रकरणाता सीबीआयची एन्ट्री झाली असून याचे काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

कोण आहे परमबिर सिंह?

  • महाराष्ट्र पोलीस दलात गेली 32 वर्षे अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले परमबीर सिंह हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
  • पोलीस दलातील एक कार्यक्षम व धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. विविध ठिकाणच्या पोलीस दलाचे प्रमुख म्हणून अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात त्यांना यश आलं. मात्र मनसुख हिरेन हत्याकांड व अँटेलिया स्फोटक प्रकरणात त्यांना आयुक्त पदावरून पाय उतार व्हावं लागलं.
  • यानंतर त्याची बदली डिजी होमगार्ड येथे करण्यात आली. या दरम्यान त्यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती.
  • हे प्रकरण अद्याप न्याय प्रविष्ठेत आहे. चांदिवाल आयोगानेही परमबिर सिंह यांना हजर राहणयाबाबत जामीन वारट जारी केलं आहे. उपस्थितन राहिल्याबद्दल त्यांना दंडही आयोगाने ठोठावला आहे.
  • मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते ठाणे पोलिस आयुक्त होते. ठाण्यात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही त्यांच्या कार्यकाळात अटक करण्यात आली होती
  • गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं ठाणे शहरातील गुन्ह्यांमध्ये 10 टक्क्यांची घट झाली होती. तसंच, गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाणही वाढलं होतं.
  • त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरण, सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या दोन हजार कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डिंग अशा अनेक प्रकरणांचा तपास केला.
  • सिंह यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख तसेच महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे.
  • परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे. महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त ADG म्हणूनही काम पाहिले आहे.
  • परमबीर सिंह हे मुंबई पोलिस आयुक्त असताना त्याच्या कार्यकाळात सुशांत सिंह राजपूत, फेक टीआरपी, दिलिप छाबरिया, फेक फॉलोअर या प्रकणाची चर्चा खूप झाली.
  • मात्र ही सर्व प्रकरण त्यानी सीआययूचे तत्कालिन अधिकारी सचिन वाजे यांच्याकडे सोपवली होती. मात्र वाजेला अटक झाल्यानंतर सर्व मोठे गुन्हे वाझेकडेच का ? दिले गेले यावर प्रश्न उपस्थित केले गेले. तसेच या प्रकरणातून तक्रारदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळ्यासाठीच हे गुन्हे नोंदवले गेले असा आरोप ही करण्यात आला.
  • तसेच मधयतरीच्या काळात 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या परमबिर सिंह यांनी केल्या होत्या. मात्र अवघ्या काही तासात हा निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला, त्यानंतर सरकारकडून काही अधिकार्याची यादीतील नावे बदलून नव्याने बदल्यासंदर्भात नव्याने परिपत्रक काढले होते.
  • याच बदल्यांच्या वेळी मोठा गैरव्यवहार झाल्याची कबूली वाजेने त्याच्या जबाबात दिली. यात वाजे हा थेट परमबिर सिंह यांनाच रिपोर्ट करत असल्याचेहील बोलले जात होते.
  • परमबिर सिंह हे एटीएसला असताना मालेगाव स्फोटक प्रकरणात हात असल्याचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा यांनी परमबिर सिंह यांनी त्यांना चौकशी दरम्यान अमानुष मारहाण केल्याचा आरोप करणयात आला होता.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

CBIकडून पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सहा तास चौकशी, देशमुख प्रकरणात परमबीर सिंहना धमकावल्याचा आरोप

Anil Deshmukh: सीबीआय आता संजीव पालांडे आणि सचिन वाझे यांचा जबाब पुन्हा नोंदवणार; न्यायालयाची मान्यता

अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्येच्या कटात परमबीर सिंहच मास्टरमाईंड; अनिल देशमुखांचा ईडीसमोर जबाब

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget