एक्स्प्लोर

Gram Panchayat Election : अर्ज भरण्यासाठी पालघरमधील उमेदवारांना ठाणे, नाशिककडे घ्यावी लागणार धाव; 50 लाखांची उलाढाल होणार!

Palghar Maharashtra Gram Panchayat Elections :  पालघर जिल्ह्यात 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 342 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी किमान दहा हजार इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरण्याचा अंदाज आहे.

Palghar Maharashtra Gram Panchayat Elections :  पालघर जिल्ह्यात (Palghar News) 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 342 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी किमान दहा हजार इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरण्याचा अंदाज आहे. ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवाराला जिल्ह्यातील शहरी भागात तसेच ठाणे, नाशिक शहरांमध्ये धाव घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत फक्त नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 50 लाख रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात असणाऱ्या 473 ग्रामपंचायतींपैकी 13 ऑक्टोबर रोजी 342 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सुमारे साडेतीन हजार सदस्यांची निवड होणार असून सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार आहे. एकंदर पाहता या निवडणुकीसाठी दहा ते बारा हजार उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे.

21 सप्टेंबरपासून नामनिर्देशन पत्र ऑनलाइन पद्धतीने भरण्यास प्रारंभ होणार असून याकरिता थकबाकी नसल्याचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, शौचालय प्रमाणपत्र, अपत्याचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयाच्या पुरावा तसेच 1 जानेवारी 95 नंतर जन्मलेल्या व्यक्तीकडे सरपंच पदांसाठी उमेदवारी दाखल करताना सातवी इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही सर्व कागदपत्र उपलब्ध करून त्याचे स्कॅनिंग करून संकेतस्थळावर अर्जासोबत भरणे आवश्यक असून याखेरीज उमेदवाराला निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडून पासबुकची झेरॉक्स, अनामत रक्कम भरल्याची पावती, दायित्व घोषणा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म सोबत भरणे आवश्यक आहे. उमेदवारीने ऑनलाईन भरलेला फॉर्मची प्रत काढून त्यावर स्वाक्षऱ्या करणे बंधनकारक असून फोटो अपलोड करणे आणि इतर सर्व कामांसाठी उमेदवारांना ई सेवा केंद्राची मदत घेणे आवश्यक होत आहे.

...म्हणून शहरी भागात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न

सद्यस्थितीत जवळपास प्रत्येक गावामध्ये ई- सेवा केंद्र उभारण्यात आले असले तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तपशील गुपित राहावा म्हणून तालुक्याच्या ठिकाणी किंवा पॅनेल ठरवेल त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकार उमेदवारांचा कल असतो. शिवाय ग्रामीण भागात विजेचा लपंडाव आणि इंटरनेट स्पीडचा अभाव असल्याने शहरी भागात येऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असतो. सध्य स्थिती बहुतांश सायबर कॅफे बंद असल्याने ई- सेवा केंद्रांवर 27 सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान अर्धा तासाचा अवधी लागत असून त्यासाठी उमेदवारांकडून 500 ते एक हजार रुपयांची आकारणी केली जाते. ई- सेवा केंद्रातील या सेवेकरिता शासनाने दर निश्चिती केली नसल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकंदरीत जिल्ह्यातील उमेदवारी अर्जांची संख्या पाहता जव्हार, मोखाडा भागातील उमेदवारांना नाशिक येथे,  वाडा तालुक्यातील उमेदवारांसाठी ठाणे शहारत तर इतर तालुक्यांमध्ये शहरी भागांमध्ये येऊन अर्ज दाखल करावयाचे असून या संपूर्ण प्रक्रियेत किमान 50 लाख रुपयांची उलाढाल होणार आहे.

स्थानीय पातळीवर उमेदवारी भरण्यास सुविधा उपलब्ध करून द्यावी
उमेदवारी अर्ज भरताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नागा नागरिकांचा मागास प्रवर्ग विभागासाठी 100 रुपये अनामत रक्कम असली तरी अर्ज भरण्यासाठी मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील तहसील कार्यालय आणि मंडळ कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुढे येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Gram Panchayat Election : आज राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

Grampanchayat : राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान, थेट सरपंच पदासाठीही निवडणूक होणार

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Palak Muchhal Reaction On Smriti Palash Wedding: स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
Embed widget