एक्स्प्लोर

हवं तर युद्ध करा पण पाकव्याप्त काश्मीर काबीज करा, दहशतवादी हल्ल्यानंतर रामदास आठवले आक्रमक 

भारतात ज्या पाकव्याप्त काश्मिरातून दहशतवादी घुसखोरी करतात, तो भागचं भारताने काबीज करायला हवा असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale ) यांनी केलं.

Ramdas Athawale on Pahalgam Terror Attack :  भारतात ज्या पाकव्याप्त काश्मिरातून दहशतवादी घुसखोरी करतात, तो भागचं भारताने काबीज करायला हवा. यासाठी युद्ध करावं लागलं तरी हरकत नाही, अगदी सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती केली तरी चालेल असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale ) यांनी केलं आहे. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रामदास आठवलेंनी हे पर्याय सुचवले आहेत. पेहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack ) आठवले आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

रामदास आठवले यांनी आज लोणवळ्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार भूमिका घेतली. दहशतवादी हल्ले रोखायचे असतील तर पाकव्याप्त काश्मीर काबीज करणं, हाच एकमेव पर्याय असल्याचा सल्ला आठवलेंनी स्वतःच्या सरकारला दिला आहे. 

दहशतवादी हल्यात 26 जणांचा मृत्यू

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा निर्घृणपणे बळी गेला होता. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शत्रूंना स्पष्ट संदेश दिला आहे की आता दहशतवादाविरोधातील कारवाई कोणत्याही स्तरावर मर्यादित राहणार नाही.

महाराष्ट्रातील 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे की, पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा. महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असे फर्मान सरकारने काढले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रातील 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही, अशी माहिती समोर आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधू जल करारासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

 

महत्वाच्या बातम्या:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदल सतर्क, हालचालींना वेग, अरबी समुद्रात क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रांची चाचणी

 

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat ED probe: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Onion Farmer News : आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनो सावधान! काढणी केलेल्या पिकांची काळाजी घ्या, राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, IMDचा अंदाज काय?
शेतकऱ्यांनो सावधान! काढणी केलेल्या पिकांची काळाजी घ्या, राज्यभरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपीटीचे संकट, हवामान विभागाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat ED probe: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? राजकारण्यांचा काळा पैसा व्याजाने दिल्याचा संशय
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Embed widget