एक्स्प्लोर

उस्मानाबादच्या धाराशिव नामांतरामुळे समाजात कोणतीही धार्मिक तेढ नाही, लोकांनी स्वागतच केलं; राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका

धाराशिव नामांतरामुळे समाजात कोणतीही धार्मिक तेढ नाही, लोकांनी स्वागतच केलं 'स्कंद पुराण' आणि साल 1909च्या 'इंपीरियल गॅझेटियर ऑफ इंडिया'मध्येही धाराशिव हाच उल्लेखराज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात भूमिका

Maharashtra News : उस्मानाबादच्या धाराशिव (Dharashiv) नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक तेढ किंवा जातीयद्वेष निर्माण होणार नसल्याचा दावा राज्य सरकारने (Maharashtra Government) हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. याउलट, उस्मानाबादच्या नामकरणामुळे बहुसंख्य लोकांनी आनंद साजरा केल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रातून अधोरेखित करण्यात आलेला आहे. याशिवाय स्कंद पुराण आणि साल 1909 च्या इंपीरियल गॅझेटियर ऑफ इंडियामध्ये उस्मानाबादचं नाव पूर्वी धाराशिव असल्याचंही राज्य सरकारने यात नमूद केलेलं आहे.

संभाजीनगरबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी घ्यावी

तर औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याविरोधातील याचिकेवर स्वतंत्र प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र असल्याने या जनहित याचिकांवर मुंबई खंडपीठाने सुनावणी घेऊ नये, औरंगाबाद खंडपीठानेच त्यावर सुनावणी घ्यावी, असं या प्रतिज्ञापत्रात अधोरेखित करण्यात आलेलं आहे.

जुलै 2022 मध्ये औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' तर उस्मानाबादचं 'धाराशिव' असं नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन व्यक्तींनी मिळून ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (27 मार्च) सुनावणी पार पडली. त्यावेळी या नामकरणासाठी राज्य सरकारने सूचना हरकती मागण्याची प्रक्रिया सुरु केली असून ती पू्र्ण होण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा कालावधी लागेल अशी कबुली देण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 1 लाख सूचना आणि हरकती आल्याची माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हायकोर्टाला दिली. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर सचिव विठ्ठल भास्कर यांनी धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या नामांतराला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांना राज्य सरकारतर्फे उत्तर देत हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.

अशी आहे धारशिवची आख्यायिका!

या प्रतिज्ञापत्रानुसार, एका गावात धरासूर नावाचा एक सैतान होता. ज्याचा देवी सरस्वतीने वध केला, त्यामुळे देवी सरस्वतीला धरासूर मर्दिनी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि त्या गावाचं नाव 'धाराशिव' असं पडल्याचा उल्लेख स्कंद पुराणातील कथेत असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. याशिवाय साल 1909 मध्ये प्रकाशित झालेल्या इंपीरियल गॅझेटियर ऑफ इंडिया आणि भूमी अभिलेख कार्यालयातील विविध नकाशांनुसार, उस्मानाबाद हे 'धाराशिव' म्हणूनच ओळखलं जात होतं. उस्मानाबाद नगरपरिषदेने 24 फेब्रुवारी 2023 रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेचं नाव बदलून धाराशिव नगरपरिषद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर नगरविकास विभागाने 26 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेचं नाव बदलून यापुढे ते धाराशिव नगरपरिषद असेल अशी अधिसूचना जारी केली. तसेच शहराच्या मध्यभागी 15 ऑगस्ट 1957 रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. "शताब्दी मोहत्सव" साजरा करण्यात आला आणि एक स्मारक बांधण्यात आले. स्मारकावर शहराचे नाव धाराशिव असं लिहिल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. शिवाय, उस्मानाबादला धाराशिव म्हणून संबोधणारी लोक ग्रामीण भागात मोठ्या संख्येने असल्याचंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस मुघल साम्राज्याच्या पतनानंतर उस्मानाबाद हे हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारितील प्रदेशाचा एक भाग बनलं. स्वातंत्र्यानंतर साल 1960 मध्ये राज्याच्या निर्मितीनंतर उस्मानाबाद महाराष्ट्राचा एक भाग झाला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget