एक्स्प्लोर

महाराष्ट्रात 35 नव्हे तर केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी: राहुल गांधी

महाराष्ट्रात 35 हजार कोटी कर्ज माफ केल्याचं सांगितलं जातंय, पण प्रत्यक्षात 5 हजार कोटींची कर्जमाफी होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

नांदेड: "या देशाला जशी उद्योगपतींची गरज आहे, तशीच शेतकऱ्यांचीही आहे. पण मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत", असा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते नांदेडमध्ये बोलत होते. “गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात 9 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागच्या तीन वर्षात भारतातील शेतकऱ्यांवर आक्रमण झालं आहे. गुजरातमध्ये मोदींनी नॅनो फॅक्ट्रीसाठी एका व्यक्तीला 65 हजार करोड रुपये दिले. पण शेतकऱ्यांना एकही पैसा दिला नाही”, असा घणाघात राहुल गांधींनी केला. काँग्रेसच्या दबावामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात कर्जमाफी  झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. महाराष्ट्रात 35 हजार कोटी कर्ज माफ केल्याचं सांगितलं जातंय, पण प्रत्यक्षात 5 हजार कोटींची कर्जमाफी होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. कर्जमाफीत शेतकऱ्याची जात का विचारली जाते? असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीच्या अपयशाला मोदी जबाबदार पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी करुन सर्वसामान्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली. नोटबंदीच्या अपयशाला मोदीच जबाबदार आहेत. नोटाबंदीमुळे दहशवाद कमी होईल असा दावा करण्यात आला. पण काश्मीरमध्ये तो वाढल्याचंच चित्र आहे. याशिवाय काळ्या पैशाचंही कारण दिलं, पण कुठे आहे काळा पैसा? असा सवाल राहुल गांधींनी केला. मेक इन इंडियाचा उपयोग काय? शेतकरी रक्षण आणि बेरोजगारांना रोजगार या देशातील 2 मुख्य समस्या आहेत. सर्वत्र ‘मेड इन चायना’चे सामान दिसते, आपली स्पर्धा चीन सोबत आहे. मोदी म्हणाले होते 2 कोटी तरुणांना रोजगार देईन, पण प्रत्यक्षात शून्य तरुणांना रोजगार मिळाला. मग ‘मेक इन इंडिया’चा उपयोग काय,  अशी विचारणा राहुल गांधींनी केली. मोदी खोटी स्वप्नं दाखवतात मोदी बुलेट ट्रेनबद्दल बोलतात पण शिक्षण, आरोग्य, रोजगार यासाठी सरकार काहीच करत नाही. केवळ स्वप्न दाखवले जातात. काँग्रेसमध्ये कमतरता आहे, पण ती कमतरता म्हणजे आम्ही खोटे स्वप्न दाखवू शकत नाही. देशातील सर्व राज्यात जातीय द्वेष पसरवला जातोय. गोवा, मणिपूर गुजरात मध्ये भाजप मतदारांना खरेदी करते, असा आरोप राहुल गांधींनी केला. जीएसटी मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहीत करुन मारलं, मग नोटबंदीकरून त्यांना नागवलं. त्यानंतर जीएसटी लागू केली. GST हे काँग्रेसचं धोरण होतं, पण आपल्या गरीब देशात 18 टक्के पेक्षा जास्त कर नको अशी आमची इच्छा होती, शिवाय त्यात वेगवेगळे स्लॅब नकोत असा आमचा GST होता, पण आज 28 टक्के कर आहे आणि 5 स्लॅब आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. या देशाला काँग्रेसने उभं केलंय, पण याच देशात भाजप दंगल घडवून आणत असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget