एक्स्प्लोर

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या तरुणाच्या कुटुंबाची कोरोनामुळे परवड, पुरस्कार विजेता तरुण करतोय मोलमजुरी

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. अनेक कारखाने,उद्योगधंदे बंद झाले आणि लाखों नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली

नांदेड : 2018 साली राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त एजाजच्या कुटुंबाची कोरोनामुळे परवड सुरू आहे शाळकरी वयात असामान्य धैर्य दाखवून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता नदी प्रवाहात बुडणाऱ्या दोन मुलींना जीवदान देणाऱ्या एजाज नदाफला पोटाची खळगी भरण्यासाठी  मोलमजुरी करावी लागत आहे. 

नांदेड जिल्ह्यातील पारडी येथे 2018 साली शाळकरी वयात असणाऱ्या एजाज नदाफ या दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कपडे धुण्यास गेलेल्या चार मुली नदी प्रवाहात बुडत होत्या एजाजने असामान्य धैर्य दाखवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन मुलींचा प्राण वाचवले व जीवदान दिले.परंतु इतर दोन मुलींचा जीव वाचवताना त्याला दुसऱ्या दोन मुलींचा जीव वाचवता आला नाही याचे दुःख मात्र त्याच्या मनात नेहमीच सलतेय. 

 एजाज नदाफ हा नांदेड जिल्ह्यातील पारडी या गावाचा रहिवाशी असून भूमीहीन शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहे. त्याचे आई वडील,भाऊ मोलमजुरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. 2018 साली एजाजच्या या शौर्याबद्दल त्याला भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला. त्याच प्रमाणे त्याच्या अचाट शौर्याची दखल घेऊन जिल्हा भरातील विविध सामाजिक संघटना,प्राशकीय यंत्रणेकडून त्याचा विविध पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला. एवढेच नाही तर नांदेड जिल्हा परिषदेत विशेष ठराव घेऊन त्याच्या शिक्षणाचा पुढील सर्व खर्च मोफत करण्यात येईल. तसेच त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत ,शासकीय योजनेतून राहण्यासाठी घरकुल व शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासनही देण्यात आले.

एजाजला दहावीत 70 टक्के गुण मिळाले पुढील शिक्षणासाठी नांदेडला जाऊन सायन्स घेऊन शिक्षण घेण्याचा त्याचा मानस होता. परंतु पैशाअभावी त्याला कला शाखेत प्रवेश घ्यावा लागला. कॉलेजात शिक्षण सुरू झाले परंतु बारावीची परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. शौर्य पुरस्कार मिळाल्या नंतर संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलतो म्हणणारी कोणतीही सामाजिक संस्था अथवा प्रशासकीय यंत्रणा एजाजच्या मदतीसाठी धावून आली नाही. शेवटी एजाजने स्वतः मोलमजुरी करून यावर्षी परीक्षा फी  भरली व बारावीत तब्बल 82 टक्के गुण घेतले. परंतु  दिलेली आश्वासने ही फक्त फोटो काढण्या इतपत व वर्तमान पत्रातील बातमी येईपर्यंतच राहिले आणि हवेत विरले.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. अनेक कारखाने,उद्योगधंदे बंद झाले आणि लाखों नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली. या कोरोना महामारीचा फटका एजाजच्या कुटुंबालाही बसला.त्यामुळे आर्थिक हलाखीत असलेल्या एजाज ला आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी मजुरी करण्याची वेळ आलीय. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेता एजाज आज त्याच्या गाव परिसरातील शेतावर केळीची झाडे वाहण्याचे मजुरीवरील काम करतोय.त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या बाल शौर्य पुरस्कार विजेत्या एजाज नदाफला मोलमजुरी करून कुटुंब चालवावे लागत आहे. यापेक्षा दुर्भाग्य नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget