एक्स्प्लोर

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी नागपूरच्या आमदार निवासाचा ताबा घेतला!

अनेक वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित आहेत. मात्र सरकारकडून फक्त आश्वासन सोडून काही मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत.

नागपूर : प्रलंबित मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी थेट नागपूरच्या आमदार निवासाचाच ताबा घेतला. प्रकल्पग्रस्तांनी काल (20 ऑक्टोबर) दुपारपासून सुरु केलेलं आमदार निवासातील आंदोलन अजूनही सुरुच आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. संतप्त आंदोलनकांनी काल गच्चीवरुन पाण्याची टाकी खाली टाकली आणि दगडफेकही केली. अनेक वर्षांपासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित आहेत. मात्र सरकारकडून फक्त आश्वासन सोडून काही मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. त्यामुळे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील विस्थापितांनी आपल्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी हा प्रयत्न केला. आमदार निवासाच्या गच्चीवर चढून घोषणाबाजी करत आंदोलकांनी ताबा घेतला. सरकार मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलक आमदार निवासातच राहतील अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी नागपूरच्या आमदार निवासाचा ताबा घेतला! गेल्या 25 वर्षांपासून रखडलेला गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु इथल्या लोकांच्या दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन बच्चू कडूही आंदोलनाच्या भूमिकेत आहे. नागपूरच्या आमदार निवासात काल बैठक बोलावली असता, त्यात मोर्चा काढण्याचं ठरलं. मात्र जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त दोघेही नसल्यामुळे नंतर आमदार निवासच आंदोलनाचं ठिकाण बनलं. जिल्हाधिकारी कार्यालयाचे काही अधिकारी इथे येऊन बच्चू कडू यांच्याशी चर्चा करुन गेले, पण शासनाने सर्व मागण्या मान्य कराव्यात, असं त्यांचं म्हणणं आहं. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमदार निवासातच ठिय्या देण्याची त्यांची भूमिका आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या 1. जमिनी शिल्लक आहेत आणि पुनर्वसन 8 किलोमीटरपेक्षा दूर झाले अशा गावांची कापलेली वीज दोन दिवसांत सुरु करावी. थुटानबोरी, किन्ही खुर्द, किटाळी, जाक भंडारा आणि उर्वरित जमीन राहिलेली आहे ती नवीन कायद्यानुसार संपादित करण्यात यावी. संपादन पूर्ण होईपर्यंत पूर्ण नागरी सुविधा सुरु ठेवावी. 2. जलसाठा वाढवल्यामुळे ज्यांच्या घरात, शेतात पाणी जाऊन पिके नाहीशी झाली आणि पिके आली नाहीत, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. 3. वाढीव कुटुंबाची 1997 ची लग्नाची अट शिथिल करावी आणि 2013 मध्ये वाढीव कुटुंबाची पॅकेज जाहीर केलं, त्यावेळी ज्याचं वय 18 वर्षे होते, त्यांना वाढीव कुटुंबाचे लाभ देण्यात यावे. 4. गावापासून 5 किमी अंतरावर असलेल्या उर्वरित जमिनीत जाण्यासाठी वहिवाट रस्त्याची सोय करण्यात यावी. 5. घराचे ऐच्छिक पुनर्वसन नवीन 2013 च्या कायद्यानुसार करण्यात यावं. 6. दिनांक 23 एप्रिल 2018 रोजी मुख्यमंत्री यांनी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त साठी घेतलेले निर्णय तात्काळ अंमलात आणावेत.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget