एक्स्प्लोर

Maharashtra Mutton Price Hike | बर्ड फ्लूच्या भितीने मटणाचे दर भिडले गगनाला, सामान्यांच्या खिशाला कात्री

राज्यात बर्ड फ्लू (Bird Flu) च्या वाढत्या प्रभावामुळे चिकनच्या मागणीत घट झाली असून मटणाच्या (Matton rate) मागणीत वाढ झाली आहे. परिणामी मटणाचे दर अव्वाच्या सव्वा वाढत असून त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागल्याचं चित्र आहे.

मुंबई: राज्यात बर्ड फ्लू च्या वाढत्या प्रभावाचा परिणाम थेट मटणाच्या महागाईवर झाला असून अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी मटणाच्या भावात वाढ केली आहे. त्यामुळे झणझणीत मटणाचा रस्सा खाणाऱ्या खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे त्याचा परिणाम आता मटणाच्या दारावर झाल्याचे चित्र दिसतंय. बर्ड फ्लू अगोदर अनेकलस ठिकाणी 450 ते 500 रुपये प्रतिकिलो विकले जाणारे मटण आता 650 रुपयांच्या जवळपास विकले जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्याचवेळी चिकनच्या दरात घट होऊन त्याची विक्री प्रतिकिलो 100 रुपयांपर्यंत करण्यात येत आहे. पण त्याला म्हणावी तशी मागणी नाही.

हे पुण्य नव्हे पाप करताय! रंकाळ्यातील मृत बदकांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर

नांदेड शहरात मटणाचा दर जवळपास साडे सहाशे पर्यंत पोहचला आहे. बर्ड फ्लू मुळे मटण दुकानामध्ये खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. बर्डफ्लू संसर्गाचा परिणाम चिकन विक्री वर झाला असून परिणामी चिकनच्या दरात मोठी घट झाली आहे. मटणाची मागणी वाढल्यामुळे मटणाचे दर तेजीत आलेत. त्यामुळे बकऱ्यांची विक्री किंमतीत वाढ झाली असल्याची माहिती दुकानदारानी दिली आहे.

मंगळवेढ्यात मटणाचे दर गगनाला, कोंबडीकडे ग्राहकांची पाठ मंगळवेढा तालुक्यात जंगलगी येथे बर्ड फ्लू सापडला. त्यानंतर मारापुर व भालेवाडी या भागातही कोंबड्या मरु लागल्याने प्रशासनाने या परिसरात कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध आणले. परिणामी जिल्ह्यात सर्वत्र चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता बोकडाच्या मटणाचे दर गगनाला भिडू लागले आहेत . पंढरपूर परिसरात बोकडाचे मटण आता 700 ते 750 रुपये किलोने विक्री केले जात आहे.

कोंबड्यांनंतर शेळ्यांवरही अज्ञात आजाराचं सावट, लातूरमधील शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या दगावल्या

मटणासाठी बोकड मिळणे कमी झाल्याने हे दर अजून वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सध्या बोकडाच्या मटणाची मागणी वाढत असली तरी बोकडाची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम मटणाच्या किंमतीवर झाला आहे. मटण साधारण 700 ते 750 या दराने विकले जात आहे. मटणासाठी बोकड मिळत नसल्याने अनेक मास विक्रीची दुकाने दिवसेदिवस बंद राहत आहेत.

या आधी 300 रुपये किलोने जाणारी गावरान देशी कोंबडी आता 160 रुपयालाही विकली जात नाही . हीच अवस्था बॉयलर कोंबडीची झाली असून आता बॉयलर कोंबड्या 130 ते 150 रुपयाच्या आसपास विकल्या जात आहेत. बर्ड फ्लूचा परिणाम अंडी विक्रीवरही झाला असून 8 रुपयाला विकली जाणारी देशी अंडी आता 3 रुपयालाही कोणी खरेदी करीत नाहीत. बर्ड फ्लू च्या भीतीमुळे ग्रामीण भागातील कोंबड्या मातीमोल भावाने खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांचे अर्थचक्रच बिघडले आहे.

रत्नागिरीतही मटणाचे दर वाढले रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला दिसून येत नाही. असं असलं तरी जिल्हा किंवा रत्नागिरी शहराचा विचार करता चिकनच्या मागणीत तसेच हॉटेलमधून मागविल्या जाणाऱ्या पदार्थांच्या मागणीत 50 टक्के घट झाली आहे. सध्या ग्राहकांनी पाठ फिरवल्यानं चिकनचे दर 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी मटण आणि मटणपासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये मात्र मात्र वाढ होतेय. शिवाय, माशांची मागणी देखील सध्या वाढली आहे. पुढील काही दिवसांत रत्नागिरीतील मटणाचे दर हे 700 रूपये किलोच्या पुढे जातील असा अंदाज सध्या मटण विक्रेते व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात बर्ड फ्लू नसताना देखील सोशल मीडियाच्या फॉरवर्डेड मेसेजमुळे अफवा पसरत असल्याचे सांगत हॉटेल व्यवसायिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू! मुख्यमंत्री म्हणाले, 'अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये'

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget