एक्स्प्लोर

MPSC Exam: 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह

MPSC Exam: एकूण गुणसंख्या अधिक असूनही काही उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

MPSC Exam: लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवूनही केवळ मुलाखतीत पात्रतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने अनेक उमेदवारांना अंतिम निवडीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना उमेदवारांमध्ये व्यक्त होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) जाहिरात क्र. 131 अंतर्गत सहायक संचालक (माहिती) पदाच्या भरती प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवूनही केवळ मुलाखतीत पात्रतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने अंतिम निवडीपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. तसेच 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी...असं म्हणत MPSC नियमांवर उमेदवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. जाहिरात क्र. 131 सहायक संचालक (माहिती) भरती प्रक्रियेवर उमेदवारांचा सवाल उपस्थित करुन सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.

उमेदवारांचे म्हणणे आहे की, लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. सध्याच्या पद्धतीत मुलाखतीसाठी निश्चित किमान गुणांची अट असल्यामुळे लेखी परीक्षेत जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांनाही अपात्र ठरवले जाते. जर अंतिम निर्णय मुलाखतीतील पात्रता गुणांवरच अवलंबून असेल, तर लेखी परीक्षा घेण्याचा उद्देश काय? असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत. अनेक उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी महिनोनमहिने मेहनत घेतली, चांगले गुण मिळवले; मात्र मुलाखतीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्यांची संपूर्ण गुणवत्ता दुर्लक्षित झाल्याची भावना आहे. उमेदवारांनी दिलेल्या उदाहरणानुसार, एखाद्या उमेदवाराला लेखी परीक्षेत 96 गुण मिळाले असले तरी मुलाखतीत पात्रतेपेक्षा एक गुण कमी मिळाल्यास तो अपात्र ठरतो. दुसरीकडे, लेखी परीक्षेत 50 गुण आणि मुलाखतीत केवळ पात्रतेचे 21 गुण मिळवणारा उमेदवार पुढील प्रक्रियेस पात्र ठरतो. त्यामुळे एकूण गुणसंख्या अधिक असूनही काही उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. (MPSC Exam)

ज्यांची एकूण गुणसंख्या जास्त, त्यांनाच संधी मिळावी, उमेदवारांच मागणी (MPSC Exam)

उमेदवारांचे म्हणणे आहे की राज्यसेवा परीक्षांमध्ये लेखी आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्याच धर्तीवर एकूण गुणांचा विचार व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. मुलाखतीत एक गुण कमी मिळाला म्हणून अपात्र ठरवणे आणि कमी एकूण गुण असलेले उमेदवार पात्र ठरणे, हा आमच्यावर अन्याय आहे. सरकारने आणि MPSC ने या प्रकरणाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केली आहे. उमेदवारांनी निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच लेखी व मुलाखतीचे एकत्रित गुण विचारात घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. ज्यांची एकूण गुणसंख्या जास्त, त्यांनाच संधी मिळावी. मुलाखतीतील किमान गुणांच्या अटीमुळे गुणवंत उमेदवारांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

MPSC :  एमपीएससीचा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chitrapat Mahamandal Election 2026: चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी जादूटोणा? खुर्चीवर लिंबू-अगरबत्ती दिसताच खळबळ उडाली, नेमकं काय घडलं?
चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी जादूटोणा? खुर्चीवर लिंबू-अगरबत्ती दिसताच खळबळ उडाली, नेमकं काय घडलं?
MPSC Exam: 96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
96 गुणांचा उमेदवार घरी, 44 गुणांचा होणार अधिकारी; MPSC नियमांवर उमेदवारांनी निर्माण केलं प्रश्नचिन्ह
NCP Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत अर्थ खात्याबाबत विचारणा, पावसाळी अधिवेशनापूर्वी...
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत अर्थ खात्याबाबत विचारणा, पावसाळी अधिवेशनापूर्वी...
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Nagpur Crime: नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Embed widget