एक्स्प्लोर

कोणत्याही कायदेशीर अडचणी नसताना आरक्षण रोखले, नारायण राणेंचा आरोप

मी भाजपच्या विरोधात बोलत नाही, मात्र त्यावेळी काही लोकांनी राजकारण करत आरक्षणाला विरोध केला, काही लोकांना कोर्टात पाठवले. कोर्टात जाणारे कोण आहेत? सर्वांची चौकशी केल्यावर ते दिसून येतील असेही राणे म्हणाले. ज्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यात राजकारण केले त्यांची नावे योग्य वेळ आल्यावर सांगणार असेही ते म्हणाले.

मुंबई : राणे समितीने अहवाल दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर त्यामध्ये राजकारण झाले. नवीन सत्ता आली आणि काही पेच निर्माण करण्यात आले, असा आरोप राणे समितीचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. कोणत्याही कायदेशीर अडचणी नसताना आरक्षण रोखण्यात आले, असेही राणे म्हणाले. मी भाजपच्या विरोधात बोलत नाही, मात्र त्यावेळी काही लोकांनी राजकारण करत आरक्षणाला विरोध केला, काही लोकांना कोर्टात पाठवले. कोर्टात जाणारे कोण आहेत? सर्वांची चौकशी केल्यावर ते दिसून येतील असेही राणे म्हणाले. ज्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यात राजकारण केले त्यांची नावे योग्य वेळ आल्यावर सांगणार असल्याचेही ते म्हणाले. आमच्या समितीचा अहवाल आम्ही कायदेशीर कक्षेत राहूनच दिला. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबींचे सर्वेक्षण करूनच आम्ही अहवाल दिला होता. आम्ही 18 लाख कुटुंबाचा सर्व्हे केला होता, मागासवर्गीय आयोगाने 45 लाख कुटुंबाचा सर्व्हे केला आहे. त्यामुळे यात आणि आमच्या सर्व्हेत वेगळे असे काही नसेल, त्यामुळे आरक्षण देणे शक्य आहे, असेही ते म्हणाले. सरकारवर तीन वर्षांपासून आरक्षण देण्यासाठी दडपण मराठा आणि कुणबी वादावर बोलताना राणे म्हणाले की, या मुद्द्यावर अहवाल आल्यावर बोलणे योग्य राहील. तांत्रिकदृष्टया मराठा व्याख्येत कुणाला बसविले आहे. मराठा आणि कुणबी या दोघांनाही बसविले आहे का? हे पाहावे लागेल. त्यानंतरच या मुद्द्यावर भाष्य करणे उचित ठरेल असे राणे म्हणाले. या अहवालात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिफारस असावी अशी अपेक्षा आहे. सरकारवर तीन वर्षांपासून आरक्षण देण्यासंबंधी दडपण आहे. कुठल्याही क्षणी हा अहवाल येईल. आणि यात मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे वाटते, असेही राणे म्हणाले. कुठल्याही प्रकारे घटनेत व्यत्यय येणार नाही मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले जाईल असे वाटत नाही, आतापर्यंत 52 टक्के आरक्षण दिले गेलेले आहे. 52 टक्केच्या आत आम्हाला आरक्षण द्यावं असं आमच्या अहवालात आम्ही म्हटलेलो नाही. ओबीसींचे आरक्षण कमी करून ते मराठ्यांना द्यावे अशीही आमची मागणी नाही. 52 टक्क्यांच्या वर मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे. ही मागणी आम्ही घटनेच्या 16 आणि 17 कलमाच्या आधारे करत आहोत. 16 आणि 17 कलमाच्या आधारे मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक  बाबी तपासून पाहून आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्याप्रमाणे सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी आम्ही केली होती, आजही तीच मागणी आहे, असे राणे म्हणाले.  सगळ्या घटनात्मक पेचांचा अभ्यास करूनच आरक्षण दिले जाणार आहे. घटनेच्या कलमानुसार मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे घटनेत व्यत्यय येणार नाही, असेही राणे यावेळी म्हणाले. राज्य मागासवर्गीय आयोगाला डावलले नाही आम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला डावलले नाही. आम्ही त्यांच्याकडे अहवाल पाठवला होता. त्यांनी वेळीच प्रतिक्रिया दिली नाही. वेळ लागेल असे सांगितले. त्यानंतर आम्ही वाट पाहून कॅबिनेटमध्ये अहवाल ठेवला, असेही राणे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian Case: मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Nashik Crime News: आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना
आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना
Maharashtra Live blog updates: रिझर्व्ह बँकेकडून थेट सहकार मंत्र्यांवरच नियमभंगाची कारवाई
Maharashtra Live blog updates: रिझर्व्ह बँकेकडून थेट सहकार मंत्र्यांवरच नियमभंगाची कारवाई

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget