एक्स्प्लोर

सरकार ओबीसी, भटक्या विमुक्तांचे आरक्षण घालवू इच्छितेय : हरिभाऊ राठोड

सुनावणीच्या वेळेस सरकारची बाजू मांडणारे वकील व्ही.एम.थोरात यांनी सरकारची बाजू न घेता, याचिकाकर्त्याचीच बाजू घेत होते, असा आरोपही त्यांना केला. त्यांना हा अधिकार कोणी दिला? एकूणच या प्रकरणावरून शासन ओबीसी, भटक्या विमुक्तांचे आरक्षण घालवू इच्छित आहे, असा आरोप आमदार राठोड यांनी केला आहे.

मुंबई :  बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आणि भटक्या-विमुक्तांच्या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र  मुळात ओबीसींना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच अनेक जाती आणि पोट जातींना ओबीसी आणि भटके- विमुक्तांचे आरक्षण दिलेले आहे.  बाळासाहेब सराटेंनी उच्च न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचा आरोप आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. सुनावणीच्या वेळेस सरकारची बाजू मांडणारे वकील व्ही.एम.थोरात यांनी सरकारची बाजू न घेता, याचिकाकर्त्याचीच बाजू घेत होते, असा आरोपही त्यांना केला. त्यांना हा अधिकार कोणी दिला? एकूणच या प्रकरणावरून शासन ओबीसी, भटक्या विमुक्तांचे आरक्षण घालवू इच्छित आहे, असा आरोप आमदार राठोड यांनी केला आहे. संविधानामध्ये कलम 15 (4) व 16 (4 नुसार राज्य सरकारांना जे अधिकार प्राप्त झाला आहे, त्यानुसार 1965 मध्ये हे आरक्षण देण्यात आले. आणि हे आरक्षण देण्यापूर्वी श्री. थाडे कमिटी, अंतरोळीकर कमिटी आणि बी. डी. देशमुख यांच्या शिफारशीनुसारच हे आरक्षण दिले गेले आहे. 1967 मध्ये राज्य सरकारने ओबीसींसाठी नेमलेल्या समितीच्या शिफारसीनुसार सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणा तपासले होते, व त्यांचे सरकारी सेवांमधील प्रतिनिधित्व तपासले, त्यानंतरच ओबीसींना 10 टक्के तर भटक्या-विमुक्तांना 4 टक्के, असे एकूण 14 टक्के आरक्षण 1994 पर्यंत देण्यात आले होते. हे आरक्षण कायदेशीर आणि राज्यघटनेने घालून दिलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच दिले होते. त्यामुळे 1994 पूर्वी दिलेल्या आरक्षणाला घटनाबाह्य ठरविणे चुकीचे असल्याचे मत आमदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले आहे. तसेच सर्वसमावेशक आयोग हवा असे मत न्यायालयाने नोंदविले, मग राज्य मागास आयोग व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांचे कार्य काय? असा सुद्धा प्रश्न येथे उपस्थित होतो, असेही राठोड यांनी म्हटले आहे. 1993  मध्ये देशांमध्ये मंडल आयोग लागू करण्यात आले. मंडल आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहिले. देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात ओबीसींना केंद्र सरकारने जाहीर केलेले 27 टक्के ओबीसीचे आरक्षण लागू करण्याची कार्यवाही राज्य सरकारने केली. त्यानुसार विमुक्त 3 टक्के, भटके 2.5 टक्के, धनगर 3.5 टक्के, वंजारी 2 टक्के आणि ओबीसींना 19 टक्के असे एकूण 30 टक्के आरक्षण देण्यात आले, असे राठोड यांनी म्हटले आहे. हे आरक्षण देताना सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ( इंद्रा साहनी प्रकरणी) दिलेली 50 टक्केच्या मर्यादेचे भान ठेवूनच हे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे बाळासाहेब सराटेंनी न्यायालयाची दिशाभूल करु नये व समाजामध्ये तेढ निर्माण करु नये असे आव्हान  हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.

ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 21 जानेवारीला सुनावणी

ओबीसी वर्गाला दिलेले आरक्षण अवास्तव आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बाळासाहेब सराटे यांच्या वतीने हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. गुरूवारी मुख्य न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर झाली. तेव्हा हायकोर्टाने या याचिकेवर 21 जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाचा मुद्दा हायकोर्टात असताना आता ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या 32 टक्के आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्रात ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण हे कोणतेही सर्वेक्षण अथवा अभ्यासाच्या आधारे देण्यात आलेले नाही. मग ते योग्य कसं? असा सवाल या याचिकेत करण्यात आला आहे. ओबीसींना दिलेल्या आरक्षणाचा सर्वेक्षणामार्फत अभ्यास करून या समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा तपासण्याचे निर्देश राज्य मागास प्रवर्ग आयोगाला देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच 32 ते 34 टक्के लोकसंख्या असलेल्या या समाजाला दिलेले 32 टक्के आरक्षण हे जास्त असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे कोर्टात आता मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सेल्फीच्या नादात गमावला जीव, मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू, एका दिवसात चार जणांचा अंत 
सेल्फीच्या नादात गमावला जीव, मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू, एका दिवसात चार जणांचा अंत 
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू तर 15 प्रवासी जखमी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू तर 15 प्रवासी जखमी
अत्याचार करुन चार वर्षाच्या चिमुकलीला संपवलं, धक्कादायक घटनेनं भोर हादरलं, नराधम पोलिसांच्या ताब्यात 
अत्याचार करुन चार वर्षाच्या चिमुकलीला संपवलं, धक्कादायक घटनेनं भोर हादरलं, नराधम पोलिसांच्या ताब्यात 
भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण
भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण

व्हिडीओ

Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report
Mumbai Pune Expressway Missing Link Traffic : उद्घाटनाचा घाट...का अडवली वाट? Special Report
Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
Embed widget