एक्स्प्लोर

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात कुलगुरू समितीची बैठक, उद्या निर्णय घेणार : उदय सामंत

केंद्र सरकार म्हणतंय शाळा काॅलेज बंद मग परीक्षांचा आग्रह का? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला. मोदींच्या मन की बातमध्ये परीक्षांचा विषय आला पाहिजे होता.युजीसी आणि केंद्र सरकारच्या भूमिकेत फरक का? असा सवालही त्यांनी केला.

मुंबई : विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलुगुरूंशी चर्चा केल्यानंतर आज पुन्हा एकदा कुलगुरू समितीची बैठक सुरु आहे. यामध्ये परीक्षा कधी घेण्यात याव्यात ? त्या कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात ? या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जात असून या बैठकीतील निर्णयाचा अहवाल तयार करून राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय परिक्षेबाबत घेतला जाणार आहे. साधारणपणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय जाहीर करू, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

कालच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. दोन संचालक सुद्धा या समितीमध्ये असतील. आज ही समिती पुन्हा एकदा या परिक्षांबाबत बैठक घेत असून काही महाविद्यालयातील प्राचार्यांशी सुद्धा याबाबत सूचना घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर एक अहवाल ही समिती तयार करणार असून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चाकरून निर्णय घेतला जाईल.

परिक्षेसंदर्भात घेण्यात येणाऱ्या बैठकीत नेमकी कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा होणार ? अंतिम वर्षाच्या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील? 30 सप्टेंबर आधी की 30 सप्टेंबर नंतर या परीक्षा घेतल्या जाव्यात? परीक्षा दोन टप्यात म्हणजेच सुरवातीला 30 सप्टेंबर आधी परदेशात शिक्षण घ्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आणि 30 सप्टेंबरनंतर इतर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाऊ शकते का ? परीक्षा कशा पद्धतीने घेतली जावी ? ऑनलाइन, ऑफलाइन, ओपन बुक ? परीक्षा सरळ साध्या सोप्या पद्धतीने कशी घेतली जाईल ? राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी एकच सूत्र कसे तयार करता येईल ? कमी वेळेत आणि सर्व उपाययोजना करून परीक्षा कशा घेतल्या जाणार ? या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

शिवाय, शिक्षण तज्ज्ञ आणि राज्यातील माजी कुलगुरू यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचना घेऊन या परिक्षांबावत योग्य निर्णय घेतला जाणार आहे. या परिस्थितीत परीक्षा घेण्यासाठी साधारणपणे 40 ते 60 दिवस तयारीला लागत असल्याने तसा विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिला जाणार असून विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नसक्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या अनलाॅक गाईड लाईन्सवर उदय सामंतांचा हल्लाबोल

केंद्र सरकार म्हणतंय शाळा काॅलेज बंद  मग परीक्षांचा आग्रह का? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला. युजीसी आणि केंद्र सरकारच्या भूमिकेत फरक का? असा सवालही त्यांनी केला. मोदींच्या मन की बातमध्ये परीक्षांचा विषय आला पाहिजे होता. युजीसीचे सचिव बोलतात रजनीशजी घरी प्रश्न पत्रिका सोडावायला हरकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आम्ही अमंलबजावणी करतोय. विद्यार्थ्यांना सेंटरवर न आणता परीक्षा घ्याव्या, पण हे कसं शक्य आहे? असंही सामंत म्हणाले.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
RBI : राज्यातील तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांना रिझर्व्ह बँकेकडून विविध कारणांसाठी आर्थिक दंड, मुंबई आणि अहमदाबादमधील सहकारी बँकांना देखील दंड
आरबीआयकडून 5 सहकारी बँकांवर कारवाई, राज्यातील तीन जिल्हा बँकांचा समावेश, आर्थिक दंड ठोठावला
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल, एकाच वेबसाईटवर पासबुकची माहिती उपलब्ध होणार , Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल,Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
RBI : राज्यातील तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांना रिझर्व्ह बँकेकडून विविध कारणांसाठी आर्थिक दंड, मुंबई आणि अहमदाबादमधील सहकारी बँकांना देखील दंड
आरबीआयकडून 5 सहकारी बँकांवर कारवाई, राज्यातील तीन जिल्हा बँकांचा समावेश, आर्थिक दंड ठोठावला
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल, एकाच वेबसाईटवर पासबुकची माहिती उपलब्ध होणार , Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
EPFO कडून UAN च्या मेंबर इंटरफेस पोर्टलमध्ये नवे बदल,Passbook Lite वर कोणत्या सेवा मिळणार
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक,  ई केवायसी कशी पूर्ण करायची? जाणून घ्या प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, ई केवायसी कशी पूर्ण करायची?
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
Embed widget