Eknath Shinde Vs Devendra Fadnavis | एका महायुती सरकारमध्ये किती प्रतिसरकार? Special Report
राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा मात्र अनेकदा रंगली. अशातच आता राज्यात दोन वैद्यकीय सहाय्यता कक्ष पाहायला मिळणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सहायता निधी आणि सीएसआर फंड एकत्र करण्याचा निर्णय झाला. पण आता उपमुख्यमंत्री असलेले शिंदे वेगळा वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करणार आहेत. पण यामागचं नेमकं कारण काय? या नेत्यांमध्ये खरंच कोल्ड वॉर सुरु आहे का? पाहूयात हा खास रिपोर्ट...
मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री यांच्यातील सुप्तसंघर्ष काही संपायचं नाव घेत नाहीय..
आधी पालकमंत्रीपदावरुन रुसवे फुगवे
मग महत्वाच्या बैठकांना दांडी
मग एकाच्या वॉर रुमला दुसऱ्याच्या समन्वय कक्षाने उत्तर
हे कमी होतं की काय म्हणून
महाराष्ट्रात आता दोन वैद्यकीय कक्ष असणार आहेत
एक मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्ष आणि दुसरा उपमुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्ष
एक देवेंद्र फडणवीसांचा दुसरा एकनाथ शिंदेंचा
एका सरकारमध्ये प्रति सरकार काम करतंय का असा प्रश्न विरोधक विचारत आहेत
तर सारं काही आलबेल आहे असंच महायुतीकडून सांगण्यात येतंय.
बाईट
अजित पवार- आमच्यात कोल्ड वॉर वगैरे काही नाही.हे धादांत खोटं आहे. R PUNE AJIT PAWAR LIVE 150225
व्हिओ-२
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या विभागाचं नेतृत्व ते करत होते तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना सीएसआर फंडातून रुग्णांना मदत करण्यासाठी कक्ष स्थापन केला होता
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सीएसआर फंडातून मदत कक्ष त्यांनी एक केलाय
त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष मंत्रालयात सुरू करत आहेत
या कक्षातून आरोग्य विभागाच्या योजनांचा पाठपुरावा केला जाणार
आरोग्य खात हे शिवसेनेचे प्रकाश आबीटकर यांच्याकडे आहे
या खात्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजना, चॅरीटी हाॅस्पिटल, रुग्णांना मदत करणा-या सेवाभावी संस्था यांच्या सोबत या कक्षातून पाठपुरावा केला जाणार
बाईट - एकनाथ शिंदे
R WHSUP MUM EKNATH SHINDE 160225
((शिवसेना व वैद्यकिय सेवा हे अतूट नातं आहे
रुग्णवाहिका रुग्ण सेवा हा शिवसेनेचा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे
राज्य सरकारमध्ये आरोग्य विभाग हा आपल्याकडे आहे
मी मुख्यमंत्री असतानाही अनेक योजना राबवल्या
महात्मा ज्योतिबा फुले ही दीड लाखाची योजना आपण ५ लाख केली
मुख्यमंत्री सहायता निधी आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात अडीच कोटीचा निधी दिला
मात्र तुमच्या या एकनाथ शिंदेने ४६० कोटी दिले, १ लाख लोकांना त्याचा फायदा झाला))
व्हिओ-३
हा प्रकार फक्त भाजप आणि शिवसेनेत होतोय असंही नाही. अजित दादा कितीही नाही म्हणत असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुद्धा कोल्ड वॉर सुरुच आहे.भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन अजित पवार यांनी केलं होतं, मात्र त्यात योजनेचं भूमीपुजन एकनाथ शिंदे पुन्हा करणार असल्याची चर्चा आहे.
साऊंड बाईट - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री + सरोज अहिरे नाराजी+ अजित पवार आश्वासन (कालचे बाईट्स R NASHIK AJIT PAWAR PROGRAM 8PM 160225)
व्हिओ-४
सरकारमधील दोन प्रमुख पक्षांच्या प्रमुखांमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. प्रति सरकारच्या आरोपांवर सुधीरभाऊंनी मात्र सरकारची बाजू सावरुन घेतली आहे.
बाईट - जितेंद्र आव्हाड + अंबादास दानवे+ सुधीर मुनगंटीवार (परवाचा बाईट)
((R MUM JITENDRA AWHAD PC LIVE 170225 -
उपमुख्यमंत्र्यांनी मदत कक्ष उभारला महाराष्ट्राचे भलं होईल.. वैद्यकीय मदत व्हायला आता आणखी सोपे जाईल
पैसे सगळ्यांकडे भरपूर आहेत... या सगळ्या पैशाचा वापर करावा
दोन-चार मदतीचे कक्ष उभे करावे पैशांचा पाऊस पडावा
+
Z:1602SNAGARAMBADAS DANVE PC
एकच सरकारमध्ये दोन मुख्यमंत्री सहाय्यता मदत योजना कशा चालतात. एकच योजनेसाठी दोन कक्ष स्थापन होतात.... सरकार कसं चालतंय आता हे स्पष्ट आहे...
Y:1502CHANDRAPURMungantiwar byte
# डबल इंजिन सरकार ज्याप्रमाणे विकासासाठी आवश्यक असते त्याप्रमाणे जर डबल वॉर रूम असेल तर त्याचा उपयोगच होणार))
व्हिओ-५
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रोज नाराजीनाट्य, रुसवे फुगवे सुरुच आहेत पण याचे प्रशासनावर, यंत्रणेवर दीर्घकालीन परिणाम कसे होतील हा प्रश्न आहेच.
बाईट - रविकिरण देशमुख (मुंबईत बाईट टाकला आहे)
व्हिओ क्लोज-
हे सगळं सुरु असताना सरकारने व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि ज्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षितता कमी करण्यात आली. यात भाजप, शिवसेना, सोबतच राष्ट्रवादी कांग्रेसमधील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आलीय मात्र,
सुरक्षा कमी केल्यानं शिवसेना आमदारांनी संताप व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.
अजुन तर नव्या सरकारचा कारभार म्हणावा तसा सुरु सुद्धा झालेला नाही. १०० दिवसांच्या आत तिन्ही पक्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने राजी नाराजी, रुसवे फुगवे सुरुच आहेत. त्याचे दूरगामी परिणाम काय होतात याकडे आपलं लक्ष असेल
ब्युरो रिपोर्ट , एबीपी माझा
All Shows

































