एक्स्प्लोर

एका तासात एसटी कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन देणार : अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं.

मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बॅंकेकडे कर्ज देखील मागितले आहे, असं परब यांनी सांगितलं. आज एका तासात कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन मिळेल, त्यामुळं त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये, असं आवाहन परब यांनी केलं.

यावेळी परब म्हणाले की, आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू.  दुःखी होऊन असं कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये. कुटुंबाला त्याचा त्रास होतो. कुटुंब रस्त्यावर येतं.  दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल, असं परब म्हणाले.

परब म्हणाले की, पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आम्ही वेतनासाठी बँकेकडे कर्ज पण मागितलं आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होतील. आज 1 तासात 1 पगार आणि सणाचा अनुग्रह मिळेल. आम्ही राज्य शासनाकडे एकरकामी पैसे मागितले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे.  आता एसटी साठी कोणतंही रक्कम थकीत नाही. राज्य शासनाला प्रस्ताव दिलाय की काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे. त्यामुळं पैसे आणण्याची साधनं वाढवण्यास मदत होईल, असं परब यांनी सांगितलं.

एस टी ला राज्यशासनाने मदत केली आहे यापुढेही करेल.  पैशांची तजवीज करायला हवी.  आज सकाळपासून त्याबाबत बैठक सुरू आहे.  1 पगाराचा प्रश्न सुटला आहे आणि 1 पगाराचा प्रश्न दिवाळीपर्यंत सुटेल. अनेक माध्यमातून पैसे एस टी मध्ये येईल याची प्रयत्न सुरू आहेत.  पगार आणि डिझेलमध्ये पैसे खर्च होतात.  एक रकमी पैसे आले तर पुढचं प्लानिंग सोप्पं होईल, असं ते म्हणाले.

एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन

एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं.  कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही.  त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे.

एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक झाली आहे.  2 दिवसात कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर न भूतो न भविष्यती असं आंदोलन दिवाळी नंतर होणार असल्याचा इशारा  इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.  हे सरकार संवेदनशील नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. एसटी खाते मागील पंचवार्षिक पासून शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी खाजगीकरण केल्यानं एस टी वर ही वेळ आल्याचा गंभीर आरोप छाजेड यांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार-  रावसाहेब दानवे दिवाळीत बोनस तर सोडाच पण पगारही नाही ही गंभीर बाब आहे.  केंद्राने जसं पॅकेज दिलं राज्याने तसं पॅकेज दिलं असते तर अशी वेळ आली नसती. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ एसटी कामगारांचं तीन महिन्यांचं थकीत वेतन मिळावं यासाठी जालन्यात कामगारांनी कुटुंबियांसमवेत घरासमोरच आक्रोश आंदोलन केलंय. कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही.  त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे. दरम्यान या दिवाळीपूर्वी शासनानं आम्हाला थकीत वेतन, महागाई भत्ता आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल देण्यात यावी अशी मागणी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, संघटना आक्रमक

जळगावच्या मनोज चौधरींची आत्महत्या, ठाकरे सरकारला धरलं जबाबदार कोरोनाच्या काळा पासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Vidhan Parishad Election 2026: माघार नाट्यावर एका दिवसांत 150 कोटी रुपये खर्च, विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ
माघार नाट्यावर एका दिवसांत 150 कोटी रुपये खर्च, विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ
Jayant Patil : अहिल्यानगरमधील 'हायव्होल्टेज ड्रामा'नंतर प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार, तनपुरेंच्या प्रश्नावर उठून जाणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना जयंत पाटील यांनी सुनावलं, म्हणाले....
अहिल्यानगरमधील 'हायव्होल्टेज ड्रामा'नंतर प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार, तनपुरेंच्या प्रश्नावर उठून जाणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना जयंत पाटील यांनी सुनावलं, म्हणाले....
Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...
ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...

व्हिडीओ

Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Embed widget