एक्स्प्लोर

मेट्रो मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करणार; राज ठाकरेंचा इशारा

संपूर्ण मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मेट्रोची कामं सुरु आहेत. मेट्रो प्रकल्पांसाठी काही प्रमाणात स्थानिकांचं (मूळ मुंबईकरांचं) स्थलांतर केले जात आहे.

मुंबई : संपूर्ण मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मेट्रोची कामं सुरु आहेत. मेट्रो प्रकल्पांसाठी काही प्रमाणात स्थानिकांचं (मूळ मुंबईकरांचं) स्थलांतर केले जात आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले, तसेच लोकांना शांत न बसण्याचे आवाहनही केले. यावेळी राज ठाकरे मुंबईकरांना उद्देशून म्हणाले की, मेट्रो मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करणार आहे. माझा विकासाला विरोध नाही, कधीही विरोध नव्हता, परंतु मुंबईतली मेट्रो मराठी माणसाच्या मुळावर उठली आहे. प्रभादेवी येथील मनसेच्या प्रचारसभेत राज बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, शहरातली गर्दी बाहेर जावी अथवा कमी व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ते सोडून इथलं सरकार मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांसाठी मेट्रोसारखे विविध प्रकल्प सुरु करत आहे. त्यासाठी सत्ताधारी भूमिपूत्रांना चिरडण्याचं काम करत आहेत. त्यांना मुंबईबाहेर काढलं जात आहे. राज ठाकरे म्हणाले की, इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्याउलट हे सरकार इथल्या भूमिपुत्रांना, मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईबाहेर काढत आहेत. इथल्या जमिनी बळकावल्या जात आहेत. सत्ताधारी या जमिनी बिल्डरांच्या घशात घालत आहेत. असे असूनही तुम्ही सर्वजण शांत का? सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे मुंबईतल्या मराठी पट्ट्यातल्या तरुणांना मुंबईबाहेर जावं लागत आहे. मराठी पट्ट्यातले मराठी भाषिक मुंबईबाहेर फेकले गेल्याने इथली भाषा बदलू लागली आहे. त्याचं उदाहरण देताना राज म्हणाले की, शिवाजी पार्कच्या आसपास फेरी मारताना मराठी भाषेऐवजी इतर भाषा कानावर पडतात, तेव्हा वाईट वाटतं. राज ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेवरही टीका केली. राज म्हणाले की, मेट्रोसाठी रातोरात आरे कॉलनीमधील तब्बल 2700 झाडं तोडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात की, आम्ही आरेला जंगल घोषित करु. पण तिथे झाडंच नसतील तर जंगल कसं घोषित करणार. पक्षप्रमुख तिथे गवत लावण्यापासून सुरुवात करणार का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget