एक्स्प्लोर

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांचा वारसदार कोण म्हणणार? हिंमत असेल चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या :  संजय राऊत 

Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान असता कामा नये असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.

Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान असता कामा नये असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) राजीनामा घ्यावा असेही संजय राऊत म्हणाले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पलटी मारण्यालाही मर्यादा आहेत असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. 

बाळासाहेबांचा अपमान करणारे आजही तुमच्यासोबत बसत असतील तर तुम्ही लाचार

बाळासाहेब ठाकरेंचा अपमान एका मंत्र्यानं केल्यानंतर सुद्धा, बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार म्हणवून घेणारे, अयोध्येत जाऊन राजकीय उत्सव साजरे करणारे, आमचीच शिवसेना आहे म्हणणारे अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मुख्यमंत्र्यांनी साधा निषेधही केला नाही. ते कसले वारसदार. त्यांना कोण वारसदार म्हणणार असे राऊत म्हणाले. बाळासाहेबांचा अपमान करणारे आजही तुमच्यासोबत बसत असतील तर तुम्ही लाचार आहात हे महाराष्ट्र म्हणतोय त्यात काय चुकलं असे राऊत म्हणाले. त्यामुळं मुख्यमंत्री चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेणार आहेत का? खुलासे करुन चालणार नाही असंही राऊत म्हणाले. बाळासाहेबांचा अपमान तुम्ही सहन करताय. तुम्ही बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे नाव घेऊ नका असा प्रहार राऊतांनी शिवसेना शिंदे गटावर केला. 

हवेतल्या गप्पा नको 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील याप्रकरणावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडसावल्याबद्दल संजय राऊतांना विचारले. यावेळी राऊत म्हणाले की, मला माहित नाही. चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळातून काढले आहे का? या हवेतल्या गप्पा नको आहेत. मुख्यमत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा असे राऊत म्हणाले.  नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे राऊत म्हणाले.  

शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय घडामोडीवर प्रदिर्घ चर्चा

काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर प्रदिर्घ चर्चा झाली. भविष्यातील घडामोडींवरही चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.
दरम्यान काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल राव हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितल्याची माहिती संजय राऊत यांनी आज दिली. 

महत्त्वाच्या बातम्या: 

Sharad Pawar Uddhav Thackeray :  मविआत मतभिन्नता; पवारांच्या भेटीसाठी ठाकरे सिल्वर ओकवर, बंद दाराआड सव्वा तास चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget