Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा, विदर्भासह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...
LIVE

Background
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प, जालना-खामगाव महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
जिल्ह्यात आज सकाळपासून पावासाने विश्रांती घेतली असली तरी मात्र खडकपूर्णा प्रकल्पातून 1 लाख 10 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू असल्याने खामगाव - जालना महामार्गाच्या खडकपूर्णा नदीच्या पुलावरून 8 ते 10 फूट पाणी असल्याने हा महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ही ठप्प आहे.या महामार्गावर वाहनांच्या जवळपास 10 - 10 किमीच्या रांगा लागलेल्या असून जड वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे , देऊळगाव मही गावातून पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे व मोठ्या वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प, जालना-खामगाव महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
जिल्ह्यात आज सकाळपासून पावासाने विश्रांती घेतली असली तरी मात्र खडकपूर्णा प्रकल्पातून 1 लाख 10 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू असल्याने खामगाव - जालना महामार्गाच्या खडकपूर्णा नदीच्या पुलावरून 8 ते 10 फूट पाणी असल्याने हा महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी ही ठप्प आहे.या महामार्गावर वाहनांच्या जवळपास 10 - 10 किमीच्या रांगा लागलेल्या असून जड वाहनचालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे , देऊळगाव मही गावातून पूर्णपणे वाहतूक ठप्प आहे व मोठ्या वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे 70 टक्के नुकसान, एकूण 2 लाख हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीनचे नुकसान
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे 70 टक्के नुकसान, एकूण 2 लाख हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीनचे नुकसान.
वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने काका पुतण्याचा मृत्यू
Maharashtra Rain LIVE Update : वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने काका पुतण्याचा मृत्यू, यवतमाळमधील पुसद तालुक्यातील ईसापूर धरण परिसरातील घटना
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी रामकुंड परिसरात होणाऱ्या दशक्रिया विधींना फटका
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी किनारी रामकुंड परिसरात होणाऱ्या दशक्रिया विधींना फटका बसलाय, पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे विधी उरकण्याची वेळ भाविकांवर आलीय. त्यामुळे एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे, परिसरातील धर्मशाळा, सभागृह आशा सुरक्षित ठिकाणी विधी करण्याची गरज आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

