एक्स्प्लोर

Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे उच्च न्यायालयात, सिटिझन्स फोरमकडून अंतरीम अर्ज 

Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गाची अक्षरश चाळण झाली असून तीन तासांचा रास्ता पाच तासांवर गेला आहे.

Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik-Mumbai Highway) खड्ड्यांचे साम्राज्य, कसारा घाटातील (Kasara Ghat) खचणारा रस्ता वाहतूक कोंडी यापासून सुटका व्हावी, यासाठी नाशिक सिटीझन फोरम (Nashik Citizen Forum) उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली असून या मार्गावरील टोल वसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई महामार्ग पुन्हा एकदा रडारवर आला आहे. 

एकूणच गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नाशिक-मुंबई महामार्ग चर्चेत आहे. कारण या महामार्गाची अक्षरश चाळण झाली असून तीन तासांचा रास्ता पाच तासांवर गेला आहे. नाशिक मुंबईला जोडणारा महत्वाचा मार्ग असल्याने यंदाच्या दिवसात मात्र या रस्त्याची दुरावस्था बिकट झाली आहे. वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत असून याबाबत नाशिक सिटीजन्स फोरमने आवाज उठविला आहे. नाशिक सिटीजन्स फोरमने या संदर्भात सन 2015 मध्ये केलेली याचिका पुनर्जीवित करण्यासाठी उच्च न्यायालयात अंतिम अर्ज विविध पुराव्यांसह सादर केला आहे. त्यामुळे आता नाशिक-मुंबई महारमार्ग खड्डेमुक्त होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दर पावसाळ्यात हा महामार्ग खड्ड्यांनी व्यापला जातो, कसारा घाटातील रस्ता ही वारंवार खचतो. ठाणे, भिवंडी परिसरात नागरीकरण वाढत आहे, तर दुसरीकडे हा परिसर गोडाऊनची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे आहे. या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रकल्प संबंधित ठेकेदाराने दोन वर्षाच्या कालावधी वाया घालून सोडून दिल्याने समस्या अधिकच चिघळली आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंगीकृत संस्थेने हे काम हाती घेतले आहे. मात्र ते पूर्ण होण्यास दोन वर्षे लागणार आहे. या सर्व बाबींमुळे नाशिक मुंबई प्रवास जिकिरीचा झाला असून टोल वसुली मात्र सुरूच आहे. गोंदे ते वडपे दरम्यानचा महामार्ग पूर्ण दुरुस्त होईपर्यंत टोल वसुली स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

टोल वसुली स्थगिती देण्यात यावी...
नाशिक सिटीझन्स फोरमने जुलैतच महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांचे लक्ष या समस्या कडे वेधले होते. आता उच्च न्यायालयातील याचिका पुनर्जीवित करण्यासाठी अंतरीम अर्ज दाखल केला आहे. या अर्जात महाराष्ट्र शासन भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मुंबई नाशिक एक्सप्रेस वे लिमिटेड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. गोंदे ते वडपे दरम्यानचा महामार्ग पूर्ण दुरुस्त होईपर्यंत टोल वसुली स्थगिती देण्यात यावी. प्राधिकरणाने महामार्गाच्या दुरुस्तीचे नियमित परीक्षण करून न्यायालयाला वेळोवेळी अहवाल सादर करावा. वडपे-ठाणे महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एजन्सी नेमण्यात यावी. त्याचबरोबर वेळोवेळी अहवाल सादर करण्यास सांगावे. आधी मागण्या सिटीझन फोरमने उच्च न्यायालयाकडे केले आहेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget