Maharashtra News LIVE Updates : अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्याच तिकिटावर, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Dhule News : होळी, धूलिवंदनाची तयारी; धुळ्यात डोलची क्रेझ..
Dhule News : हिंदू संस्कृतीत महत्त्वाच्या समजल्या जाणार्या सणांपैकी एक होलिकोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीसाठी लागणार्या विविध साहित्याने बाजारपेठ सजू लागली आहे. डोलचीसह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पिचकार्या आणि रंग बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मुखवटेही विक्रीसाठी आले आहेत.
धुळे जिल्हा हा त्याच्या अनोख्या पद्धतीने होळी खेळण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारी डोलची हा चर्चेचा विषय असतो. डोलची म्हणजे पत्र्यापासून तयार केलेलं भांडं असतं. होळी खेळताना यात पाणी भरुन एकमेकांच्या पाठीवर वार करतात. पाण्याचा सपासप वार उघड्या शरीरावर बसल्याने अंगाची लाहीलाही होते. परंतु, खेळणाऱ्यांचा उत्साह मात्र कमी होत नाही, उलट दुप्पट उत्साहाने ते एकमेकांवर डोलचीमध्ये पाणी उडवतात. धुळे जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून होळीला डोलचीचा वापर करुन पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात. पत्र्यापासून तयार करण्यात आलेली ही डोलची तयार करण्याचं काम सध्या कारागिरांकडून मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या डोलचीला असून इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पत्र्याचे भाव वाढल्याने डोलची तयार करणं परवडत नसल्याची प्रतिक्रिया कारागिरांनी व्यक्त केली आहे
राजकीय नेत्यांनी जातीच्या मुद्द्यावर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे दोन दिवसापासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सकाळीच नारायणगड येथे जाऊन नगर नारायणाचे दर्शन घेतलं यावेळी प्रीतम मुंडे देखील त्यांच्यासोबत होत्या.. राजकीय नेत्यांकडून सध्या विकासकेंद्रीत राजकारणाची अपेक्षा आहे गेल्या काही दिवसापासून विकासाचे मुद्दे नाही तर जातीय मुद्द्यावर जास्त चर्चा होत आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.. राजकारणामध्ये सोशल इंजिनिअरिंग महत्त्वाचं असतं आणि याच सोशल इंजिनिअरिंगचा आशीर्वाद मला मुंडे साहेबांनी दिला आहे निवडणुकीमध्ये आम्ही फक्त गप्पा मारणार नाहीत तर विकास करून दाखव असं म्हणत एकाच वेळी रेल्वेसाठी 4 हजार 800 कोटी रुपये मिळवून दिले तर नितीन गडकरी यांनी देखील बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे तयार केले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामाची गती प्रचंड वाढलेली आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत तर प्रीतम मुंडे ने देखील आता पंकजा मुंडे यांच्या विजयाची जबाबदारी घेतली असून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत























