एक्स्प्लोर

Maharashtra Live Updates : मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करणार, तोपर्यंत समाजाला सर्व सोई कायम ठेवणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Live Updates :  मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करणार, तोपर्यंत समाजाला सर्व सोई कायम ठेवणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Background

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजपासून शाळांना सुट्टी जाहीर

सध्या राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (State Govt) दक्ष झाले असून, आजपासून (21 एप्रिल) राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण व क्रीडा विभागाकडून असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Temperature : वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या एप्रिल महिन्यातच
दरम्यान, राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. 

विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद

वाढत्या उष्णतेमुळं मुलांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. राज्यातील ज्या शाळांची परीक्षा संपली आहे त्यांना सुट्टी मिळणार आहे. राज्यातील शाळांना आजपासून सुट्टी सुरु होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे.

राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी नागरीक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात वादळी पावसामुळं घरांचं नुकसान 

गुरुवारी (21 एप्रिल) सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं अनेकांच्या घराचं नुकसान झालं आहे. संग्रामपूर येथील अनेक नागरिकांच्या घरावरील छपरे प्रचंड हवेमुळं उडाली आहेत. अनेकांची संसार उघड्यावर पडले आहेत. या परिसरात तीन तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.

17:05 PM (IST)  •  21 Apr 2023

Karnataka Election: राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात 9 जागांवर निवडणूक लढवणार

Karnataka Election: राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात 9 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत घड्याळ हे चिन्ह मिळाले आहे. 

16:55 PM (IST)  •  21 Apr 2023

Maratha Reservation : मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करणार, तोपर्यंत समाजाला सर्व सोई कायम ठेवणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेत ते करणार. पूर्वी आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तोपर्यंत मराठा समाजाला इतर सर्व समाजांना ज्या सोई मिळतात त्या दिल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

16:54 PM (IST)  •  21 Apr 2023

Ratnagiri : एबीपी माझाच्या बातमीची रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने घेतली दखल

Ratnagiri : रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीमधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब एबीपी माझाने समोर आणली होती. त्यानंतर आता रत्नागिरी नगरपरिषद  प्रशासनानं याबाबतची पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. जोवर पाणी गळतीचं काम थांबत नाही तोवर उर्वरित बिलाची रक्कम अदा केली जाणार नाही अशी नोटीस नगरपरिषद प्रशासनाने संबंधित कंत्राटदराला काढली आहे. वर्षभरापूर्वी बांधकाम केलेल्या टाकीच्या बांधकामाची रक्कम 28 लाख इतकी आहे. कंत्राटदाराला आत्तापर्यंत अठरा लाख रुपये बिल अदा करण्यात आला आहे. तर दहा लाख रुपयाचं बिल अद्यापही बाकी आहे. जोपर्यंत टाकीची गळती थांबत नाही. तोवर  शिल्लक दहा लाख रुपयांचा बिल कंत्राटदाराला दिले जाणार नाही. सोमवारपासून या ठिकाणी कामकाजाला सुरुवात होणार आहे.

 

16:50 PM (IST)  •  21 Apr 2023

Chh. Sambhajinagar Election: संभाजीनगर जिह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात 378 उमेदवार

राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 28 एप्रिलला निवडणूक होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात देखील सात बाजार समित्यांसाठी निवडणुका पार पाडणार आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह फुलंब्री, पैठण, लासूर स्टेशन, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड अशा एकूण सात बाजार समित्यांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक  इच्छुकांनी  निवडणुकीतून माघार घेतली. तर या  सातही बाजार समितीत आता 378 उमेदवार रिंगणात उरले आहे. ज्यात सर्वाधिक 86 उमेदवार कन्नड बाजार समितीत आपले नशीब आजमावत आहेत. तर सर्वांत कमी 38 उमेदवार पैठणमध्ये रिंगणात आहेत. सोबतच फुलंब्री 42, लासूरस्टेशन 58, वैजापूर 56, छत्रपती संभाजीनगर 47, आणि गंगापूर बाजार समितीमध्ये 51 उमेदवार रिंगणात आहेत.

 

16:32 PM (IST)  •  21 Apr 2023

Pune: पुणे: जो पक्ष पाणी देईल त्याला मतदान करणार अन्यथा मतदानावर बहिष्कार, पुरंदरमधील नायगावमधील ग्रामस्थांची भूमिका

Pune News:  सध्या बाजार समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करताना दिसतो आहे. परंतु जो पक्ष जनाई शिरसाईचे पाणी गावाला देईल त्या पक्षाला मतदान करणार असल्याची भूमिका पुरंदर तालुक्यातील नायगावच्या मतदारांनी घेतली आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्या अभावी पिके जळून चालली आहेत. जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी सध्या चालू सुरू आहे. परंतु टेलला नायगाव असल्याने त्याचे पाणी नायगावला पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे जो कोणता पक्ष पाणी मिळवून देईल त्यांनाच नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करू अन्यथा पाणी न मिळाल्यास नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावर बहिष्कार राहील असा निर्धार नायगाव गावकऱ्यांनी केला आहे. नायगाव येथील ग्रामपंचायतचे मतदार, सोसायटीचे मतदार असे एकूण ३५ मतदार निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नायगावकराणी असा पवित्रा घेतल्याने पुरंदर तालुक्यातील नेत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासाZero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावाZero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
Embed widget