एक्स्प्लोर

राज्यात मोदींच्या नव्या शिलेदारांच्या नेतृत्वात भाजपच्या 'जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा निघणार आहे. तब्बल 19 हजार 567 किमी प्रवास केंद्रीय मंत्री करणार आहे.

मुंबई : आजपासून भाजपच्या नव्या केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. आज मराठवाड्यात भागवत कराड, ठाणे- कल्याणमधून कपील पाटील तर पालघरमधून भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली आहे.  नारायण राणे 20 ऑगस्टपासून यात्रा सुरू करतील.

मात्र पहिल्याच दिवशी  या जनआशिर्वाद यात्रेला राजकिय दृष्टीनं पाहिलं जातंय, प्रशासनातील अधिका-यांकडून जाणिवपूर्वक या यात्रेतील मंत्र्यांना, नेत्यांना भेटणं, त्यांना माहिती देणं टाळलं जातंय असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केला आहे. 

केंद्रीय मंत्रीमंडळात नव्यानं स्थान मिळालेल्या मंत्र्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला आजपासून सुरु झाली आहे. भारती पवार, कपील पाटील, भागवत कराड, आणि नारायण राणे हे चार मंत्री आता या यात्रेच्या निमीत्तानं महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. केंद्र सरकारच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि महाविकास आघाडीचं अपयश दाखवणं हा या यात्रेचा उद्देश आहे. आगामी महापालिका आणि इतर पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या यात्रा महत्वाच्या मानल्या जात आहेत.
पण यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले गेलेत...

केंद्रीय राज्य आरोग्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच भारती पवार पालघरमध्ये आल्या. आदिवासी समाजाचा चेहरा केंद्रीय मंत्रीमंडळात गेल्यानंतर पालघरमधली आदिवासी वोट बॅंक मजबूत करण्याच्या दृष्टीनं भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र, ग्रामिण भागातही केंद्रानं सगळी मदत पाठवूनही प्रत्यक्षात प्रशासनाकडून मोठ्या कमतरता राहिल्या आहेत असं भारती पवारांनी म्हणटलं आहे. 

भारती पवारांनी यात्रेच्या सुरुवातीपासूनच प्रशासनाला लक्ष्य केलंय. 'केंद्रीय मंत्री तुमच्या भागात येतात मात्र जिल्हाधिकारी फोन स्विच ऑफ ठेवतात. या मागे राजकिय हेतू नाही कशावरुन' असा सवालही त्यांनी केला आहे.

 प्रोटोकॉल नेमकं काय सांगतो?

मंत्र्यांचा दौरा जर शासकीय असेल आणि त्या दौ-याबाबतचे वेळापत्रक अधिकृतरित्या मंत्र्यांकडून प्राप्त झाल्यानंतर या दौ-याला उपस्थित राहणं जिल्हाधिका-यांना बंधनकारक आहे.  सध्याची जनआशीर्वाद यात्रा हा शासकीय दौरा नसून हा दौरा राजकिय आहे. केवळ शिष्ठाचार म्हणून मंत्र्यांना माहिती देण्याकरता बिगरशासकीय दौ-यांना अधिकारी उपस्थित राहु शकतात. भारती पवारांनी प्रशासकिय अधिकारी त्यांच्या दिमतीला गेले नाहीत म्हणून आगपाखड करु नये असं महाविकास आघाडीतील पक्षांनी म्हटले आहे.

राज्यात इथुन पुढे काही दिवस भाजपची ही जनआशीर्वाद यात्रा सुरु असणार आहे. यानिमीत्तानं पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीत कुरघोड्यांचं राजकारण बघायला मिळेल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget