एक्स्प्लोर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात उतरणार का? मोहन भागवत म्हणाले... 

Nagpur News Update : एक नेता, एक संगठन, एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही. परंतु, सामान्य माणूस उभा राहतो तेव्हाच मोठे बदल घडतात, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर : "संघ लोकप्रिय झाला तर लोक संघाकडे ही सत्ता सोपवायला मागे पुढे पाहणार नाहीत. मात्र, संघ तसे करणार नाही, म्हणजेच संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही. कोणत्याही संघटनेला दीर्घकाळ कार्यरत राहायचे असल्यास त्या संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते दोघांनी दक्ष राहून काम करणे गरजेचे असते. "स्टेटस आणि कन्फर्ट" या दोन गोष्टी कोणत्याही संघटनेसाठी आपत्ती ठरते. स्टेटसला प्रेम करणारा नेता आणि कंफर्टला प्राधान्य देणारे कार्यकर्तेच  संघटनेचा बट्ट्याबोळ करतात, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत मोहन भागवत बोलत होते. 

मोहन भागवत म्हणाले, "देशासमोर असलेल्या आव्हानाचा सामना एकाच नेत्याला करायचा नाही. तो नेता किती ही मोठा असला तरी तो एकटा सर्व आव्हानांचा सामना करू शकत नाही. 1857 पासूनच देशाच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी अनेक लोकं उभे राहिले, अनेकांनी बलिदान दिले, अनेकांचे आयुष्य खर्ची गेले. लोकांच्या जीवनाची झालेली बरबादी, लोकांनी केलेले समर्पण हे व्यर्थ गेले नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य भेटले. देश सक्षम झाला पाहिजे हेच संघाचे प्रयत्न राहिले आहेत. याच विचारातून 97 वर्षांपूर्वी संघ सुरू झाला होता. एक नेता, एक संगठन, एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही. परंतु, सामान्य माणूस उभा राहतो तेव्हाच मोठे बदल घडतात. 

"आधी लोक संघाचा द्वेष करायचे, परंतु, आता तो काळ गेला. संघाला बंदी आणि विरोधाचा देखील सामना करावा लागला, तो काळ ही आता जवळपास पूर्ण झाला आहे. आता तर अनुकुलतेचा काळ आहे. तो ही सुखरूप पार करायचा असून आज जे विरोधक आहेत, त्यांना ही भविष्यात संघाच्या जवळ आणायचे आहे. हे आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्ती शाखेतच आला पाहिजे. विचार पटले पाहिजेत. 97 वर्ष संघ चालल्यानंतर वाटते की वैचारिक रित्या आम्ही चूक नव्हतो. अनुभवाच्या कसोटीवर संघाचे विचार सिद्ध झाले आहेत, असे मोहन भागवत म्हणाले, 

मोहन भागवत म्हणाले, "आज खूप मोठा वर्ग संघाशी जोडला गेला असून समाजातील प्रत्येत घटकाचे लोक जोडत आहेत. संघाने चांगले काम केले म्हणून हे घडत आहे.  97 वर्षांच्या काळानंतर पाटी जुनी झाली असली तरी जुनेपण येऊ नये अशी पद्धत संघात आहे. कारण दर 10-15  वर्षांनी आम्ही सिहांवलोकान करतो. कोणतेही संघटन जुने झाले तरी ते म्हतारे होऊ नये. संघाचे स्वयंसेवक 75 वर्षांचे झाले की ते नव्या लोकांसाठी जागा करतात. देश चालवण्याचे काम आपण सरकारवर सोपवतो, देश चालवायला कधी हा ठेकेदार, कधी तो ठेकेदार आपण निवडतो.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'प्रदेश तुमचा आणि मंचही तुमचा, ज्यांना खाज असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे' बागेश्वर बाबांकडून श्याम मानव यांना आव्हान
'प्रदेश तुमचा आणि मंचही तुमचा, ज्यांना खाज असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे' बागेश्वर बाबांकडून श्याम मानव यांना आव्हान
Vidhan Parishad Election 2026 BJP Candidates: भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले संजय भेंडे कोण?
भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले संजय भेंडे कोण?
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
Vidarbha Heat Wave : उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे हालेहाल! पुढील दोन दिवस सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट, पारा 47 अंश सेल्सिअस पार? 'या' जिल्ह्यात दहा वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद
उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे हालेहाल! पुढील दोन दिवस सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट, पारा 47 अंश सेल्सिअस पार? हवामान खात्याचा धोक्याचा इशारा

व्हिडीओ

Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम
Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही पाचपर्यंत बंपर मतदान; सीएम ममतांचा गंभीर आरोप, म्हणाल्या, 'CRPF ने सर्व मतदान केंद्रे बळकावली, सीमा रक्षणाऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत'
Embed widget