Lok Sabha Election Voting Live Update : देशात तिसऱ्या टप्प्यात अंदाजे 62.27 टक्के मतदान, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती?
Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : देशात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आज. महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू, मतदारराजा आज दिग्गजांचं भवितव्य ठरवणार...

Background
Maharashtra Lok Sabha Election Live Update : देशातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.7 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वा. ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण 62.27 टक्के मतदान पार झाले. कोणत्या राज्यात किती मतदान झाले? जाणून घेऊयात...
आसाम- 76.13
बिहार- 57.27
छत्तीसगड- 68.15
दादरा नगर हवेली- 65.23
गोवा- 74.50
गुजरात- 57.00
कर्नाटक- 69.14
मध्यप्रदेश- 64.82
महाराष्ट्र- 56.37
उत्तरप्रदेश- 57.34
पश्चिम बंगाल- 73.93
राज्यातील खालील मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया
बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, रायगड, सोलापूर, लातूर या मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील या 11 मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत नव्या पक्षांची अग्निपरीक्षा या टप्प्यात होत आहे.
देशात लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा, मतदारराजा दिग्गजांचं भवितव्य ठरवणार
देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज मतदान होणार आहे. गुजरातमधील सर्व 25 जागांवर आज मतदान होईल. सुरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकलीय. महाराष्ट्रात 11 जागांवर, उत्तर प्रदेशात 10 जागांवर, कर्नाटकातल्या उर्वरित 14 जागा, छत्तीसगडमधील 7, मध्य प्रदेशातल्या 8, बिहारमधील 5, आसाममधील 4 तर पश्चिम बंगाल आणि गोव्यातल्या प्रत्येकी दोन जागांवर आज मतदान होईल. याशिवाय दादरा नगर हवेली, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातही आज मतदान होत आहे. तर अनंतनाग राजौरीमधील मतदान सहाव्या टप्प्यात ढकलण्यात आलंय. राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.
राज्यात अंदाजे 62 टक्के मतदान, जाणून कोणत्या मतदारसंघात किती?
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.7 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वा. ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण 62 टक्के मतदान पार झाले. कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले? जाणून घेऊयात...
लातूर- 60.18
सांगली- 60.95
बारामती- 56.07
हातकणंगले - 68
कोल्हापूर- 70.35
माढा- 61.17
उस्मानाबाद- 60.91
रायगड- 58.17
रत्नागिरी- सिंधुदुर्ग - 59.23
सातारा- 63.05
सोलापूर- 57.61
Ratnagiri : चिपळूणमध्ये मतदान केंद्रात लाईट नसल्याने गोंधळ, 400 मतदान ताटकळत
चिपळूणमधील खेड परिसरात मतदान केंद्रात लाईट नसल्याने गोंधळ उडाला आहे. अंधारात मतदान करावे लागत असल्याने अद्यापही चारशेहून अधिक मतदार केंद्राच्या बाहेर मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मतदार आक्रमक झाल्यानंतर प्रशांसन कामाला लागलं असून विजेची व्यवस्था करण्यासाठी व्यवस्थेची धावपळ सुरू आहे.
रांगेतील मतदान संपण्यास रात्रीचे 9 वाजतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदार आक्रमक झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रात अंधार असल्याने प्रक्रियेला अर्धा तासाहून अधिकचा वेळ जात असल्याने रांगेतील मतदार ताटकळले आहेत. आक्रमक मतदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्यामुळे मतदान केंद्रात पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनावश्यक गर्दी हटवत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.























