एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis : नाशिकच्या युवा उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुगली प्रश्न विचारले. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली आहे. 

Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज रविवारी (दि . 23) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर कुशावर्त तीर्थ परिसराची देखील त्यांनी पाहणी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा देखील घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाशिक शहरातील युवा उद्योजकांसोबत चर्चा सत्रात सहभागी झाले. यावेळी युवा उद्योजकांनी देवेंद्र फडणवीस यांना गुगली प्रश्न विचारले. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. 

प्रश्न - तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल आहे? 

उत्तर -  जी खुर्ची मिळते, तिला कम्फर्टेबल बनवून घ्या.  

प्रश्न - कुंभमेळा अनुषंगाने कशी तयारी सुरू आहे?

उत्तर : सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या संस्कृतीबाबत लोकांना महत्त्व पटत आहे.  कुंभमेळा आकर्षित होत आहे. नाशिक मध्ये 2015 च्या कुंभमेळ्यात कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडला नाही. कुंभमेळा हा सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू. हा आस्थेचा महाकुंभ होईल. टेक्निकली महाकुंभ होईल. इथली प्रशासकीय टीम सक्षम आहे. सर्व लोक काम करतात. प्रयागराजचा अनुभव पाहता मी तिथे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पण संवाद साधला. त्या  ठिकाणी 18 तास ते ड्युटी करत होते. कोणी तक्रार करत नव्हतं, ते म्हणत होते आम्हाला कुंभमेळ्याने ताकद दिली. 

प्रश्न - नाशिकचा कुंभमेळा कसे असेल आणि आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मदत करू?

उत्तर - भारत हा एक अशी सभ्यता आहे याचं कारण म्हणजे आमची आस्था आहे. प्रयागराज येथे कोट्यावधी लोक आले, कोणीही कोणाला जात धर्म विचारला नाही. सर्व आस्थेने गेले, स्नान केले हे येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचे आहे. विकासासोबत हे देखील महत्वाचे आहे. कुंभमेळा स्वागताची आणि पर्यटनाची एक संस्कृती आणतो. एका कुंभमेळ्याने उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था बदलली. नाशिक आणि महाराष्ट्राचे युवा या कुंभमेळ्यात जोडले गेले पाहिजे. वेगळ्या पद्धतीने ते जोडले गेले पाहिजे.  

प्रश्न - मी इतिहासाची गोष्ट सांगत आहे. मी आठ वर्ष मागे जात आहे. इतिहासात तुम्ही वादा केला होता नाशिकला मी....? 

उत्तर - हा वादा मला चांगला लक्षात आहे. नाशिकला मी दत्तक घेतले आणि सरकार गेले. जे नाशिकला मिळाले पाहिजे ते मिळत नाही. मुंबईचा फायदा नाशिकला सुरुवातीला होत होता, तसा आता नाही. जेवढी कनेक्टिव्हिटी मुंबईसोबत नाशिकची पाहिजे होती, तेवढी नाही. नाशिकला एक विकासाची संधी मिळेल. समृद्धी हायवेवर मल्टीमेडल कॅरिडोर सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज नाशिकला मिळेल. जेएनपीटी पोर्ट कनेक्टिव्हिटी साडेतीन तासाची होईल. देशाचा सर्वात मोठा पोर्ट वाढवण येथे बनवत आहे. जेएनपीटी पेक्षा तीन पट मोठ पोर्ट बनवत आहोत. जेव्हा ते तयार होईल तेव्हा नाशिकसाठी समृद्धी हायवेवरून एक ग्रीन फिल्ड रोड त्या ठिकाणी नाशिकवरून तयार होईल. त्याचा नाशिकला फायदा होईल. नाशिक आज महाराष्ट्राचे मोठे डेव्हलप शहर आहे. अजून खूप काही बाकी आहे जे मी तेव्हा ठरवलं होतं, ते पूर्ण करण्याचा या पाच वर्षात प्रयत्न करेल.   

प्रश्न - नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? 

उत्तर - आम्ही नाशिकला पालकमंत्री देऊ, जोपर्यंत पालकमंत्री नसतात, त्याचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो. 

प्रश्न - एआय, आयटी टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात कशी असणार? 

उत्तर - आपण जेव्हा एआयची गोष्ट करतो, एआय हे 22 करोड जॉब कमी करेल आणि 24 करोड वाढवले असा सर्वे झाला. नवीन संधी तयार होत आहे. स्मार्टफोन नवीन आले, त्यावेळी लोकांना अडचणी आल्या. मात्र, आता सर्व वापरत आहेत. देशाचे माजी अर्थमंत्र्यांनी विचारले होते की, 8 रुपये 75 पैसे मी डिजिटल करू शकतो का? ते आज होत आहे. पान टपरीवाला, भाजीवाला सगळेच डिजिटल पेमेंट घेत आहेत. एआयच्या माध्यमातून नवीन स्किल डेव्हलप करू. टाटा इन्स्टिट्यूटने दहा हजार महिलांना एआय टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण सुरू केले आहे. एआयचा उपयोग सांगितला पाहिजे, त्याची भीती दूर केली पाहिजे. एआयच्या माध्यमातून आपण नवीन शिखरापर्यंत पोहोचू शकू.  

प्रश्न - ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कसा प्रयत्न कराल?  

उत्तर - नाशिक हे कृषी इकॉनोमी आहे. 14000 करोडचे द्राक्ष इथून एक्स्पोर्ट झाले आहेत. काही मॉडेल नाशिकला तयार केले आहेत. व्हॅल्यू चेंज मॉडल नाशिकला तयार केले आहे. जपानच्या केचप बनवणाऱ्या कंपनीसारख्या कंपनीने नाशिकच्या शेतकऱ्यांनी एग्रीमेंट केलं, त्यांच्यासाठी पीक घेत आहे. कृषीला टेक्नॉलॉजीने जोडून घेतले पाहिजे. स्मार्ट ॲग्री बिजनेस योजना मी राज्यात सुरू केली. सगळ्या गावात क्रेडिट सोसायटी असते. त्यांचं डिजिटल लाईजेशन करून मल्टीपर्पज सोसायटी करून ॲग्री बिझनेस सोसायटीत करू. सध्या दहा हजार गावात काम सुरू आहे. 

प्रश्न - राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था कशी सुधारणार?  

उत्तर - नागपूरची घटना चार तासात आटोक्यात आली. दंगा करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले. 104 लोकांना ताब्यात घेतले आहे. ज्यांनी नुकसान केलं, त्यांच्या मालमत्ता विकून त्यांच्याकडून पैसे वसूल करू. जे दंगे करतील त्यांना भोगावे लागेल.  

आणखी वाचा 

इकडं भाजपच्या संकटमोचकांचा मीडियाशी संवाद, तिकडं खुद्द मुख्यमंत्री ताटकळत राहिले उभे, माहिती मिळताच गिरीशभाऊ अक्षरशः धावत निघाले, VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget