एक्स्प्लोर

Protest : राज्यातील विकासकामांना खिळ बसणार? 14 हजार कोटींची बिले थकीत, लाखो कंत्राटदार संपावर जाणार

कंत्राटदार संघटनेने काही मागण्या केल्या असून सरकारने यासंदर्भात गंभीर दखल घेतली नाही तर 27 नोव्हेंबर पासून सर्व विकासकामे बंद करून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई: राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील तब्बल 14 हजार कोटींचे बिले थकल्याने कंत्राटदार संघटनानी (Maharashtra Contractors and Engineers Associations) काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या विकासकामाचे जवळपास 14 हजार कोटी रुपयांची देयके शासनाने अद्याप अदा केलेली नाहीत. शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील शासनाने अद्याप निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे 27 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य अभियंता कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा आणि जलसंधारण या विभागातील कोट्यवधी रुपयांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. यामुळे राज्यातील जवळपास 3 लाख शासकीय कंत्राटदारांना दिवाळी साजरी करता आली नाही. मागील एक ते दीड वर्षापासून हे सर्व देयके प्रलंबित आहेत. 

या संदर्भत संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने 27 नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व विकासकामे बंद करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिला आहे.

संघटनेच्या दाव्यानुसार प्रलंबित देयके

1) सार्वजनिक बांधकाम विभाग : 10 हजार 600 कोटी

2) ग्रामविकास विभाग :
- ग्रामीण रस्ते : 650 कोटी
- पर्यटन विभाग : 2000 कोटी

3) जलसंधारण विभाग : 650 कोटी 

4) जलसंपदा विभाग : मागील दोन ते तीन वर्षापासून निधी नाही 

सर्व विभागाचे मिळून जवळपास 14 हजार 600 कोटी रुपयांचे देयके प्रलंबित आहेत. 

इमारत बांधकाम, दुरूस्ती : 1700कोटी
नवीन रस्ते व दुरूस्ती : 6500 कोटी
पूल दुरूस्ती, खड्डे भरणे : 1800 कोटी
गावठाण व ग्रामीण रस्ते : 780 कोटी
कामांना मंजूरी : 40 हजार कोटी
निधीची तरतूद : 4 हजार कोटी
छोटे कंत्राटदारांचा संख्या : 2 लाख आहे.

काय आहेत कंत्राटदार संघटना आणि अभियंता संघटनांच्या मागण्या?

1) राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यांचे 2059.2216,3054,5054,सह सर्व लेखाशिर्षकासह अनेक लेखाशिर्षक व ग्रामविकास, जलसंपदा,जलसंधारण विभागा कडील ही अनेक लेखाशिर्षकास तातडीने कंत्राटदार यांची प्रलंबित देयके देण्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करावा. 
2) राज्यातील सर्व विभागां च्या विकासाची कोणत्याही प्रकारची कामांची निविदा प्रक्रिया काढतानाच सदर कामांच्या अंदाजपत्रकाच्या 50 ते 65 टक्के निधीची व्यवस्था संबधित कामाचे देयके देण्याची तरतूद करावी या शिवाय निविदा प्रक्रियाच काढुच नये. कारण दोन दोन वर्ष सदर केलेल्या कामांचे दैयकेसाठि निधी मिळत नाही, हे सत्य आहे. 
3)  राज्यातील सर्व विभागाकडील विकासांची कामांची निविदा प्रक्रिया मध्ये सदर  कामे ठराविकच कंत्राटदार यांस देण्याचा सुरू असलेला सर्व पक्षीय लोकप्रतिनिंधी  चा प्रंचड राजकीय हस्तक्षेप तातडीने बंद करून सचोट निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
4) निविदा प्रक्रिया मध्ये निविदा उघडण्याचा कालावधी स्पष्ट उल्लेख असताना चार चार महिने संबंधित सर्व विभाग निविदा उघडतच नाही कार्यारंभ आदेश  देत नाही याबाबत सदर निविदा मुदतीत उघडुन कार्यारंभ आदेश देण्याचा निर्णय घ्यावा. 
5) राज्यातील ग्रामविकास कडे छोटे मोठे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची संख्या प्रंचड असताना देखील सगळी कामे* नियम पायदळी तुडवून जिप प्रशासन सरसकट 15लक्ष च्या आतील कामे E online निविदा ऐवजी ग्रामपंचायतीस डायरेक्ट देत आहे हे तातडीने बंद करण्यात यावे.
6) राज्यातील सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता व छोटे कंत्राटदार यांना वरील सर्व विभागांची  १५ लक्षाच्या आतील कामे दरमहा प्रशासनाने लाॅटरी पद्धतीने वाटप करणे बंधनकारक करावे
7)  राज्यातील कंत्राटदार कामे करीत असताना प्रशासन अनेक जाचक अटी जसे की मुदतवाढ दंड,कामाचे बिल वेळेवर लिहुन न देणे, डांबर चलन प्रमाणपत्र, GST चलन, निविदा प्रक्रिया मध्ये चुकीचे ठरवुन अटी घालणे संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या कडून ठराविकच एजन्सीला कामे देणे हे सर्व प्रकार तातडीने बंद करावे. 

 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget