एक्स्प्लोर

महाविकास आघाडीतील तिनही पक्षात नाराजीनाट्य

महाविकास आघाडीतील 26 आमदारांनी कॅबिनेट तर 10 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, अद्याप खातेवाटप झालेला नाही. अशातच ठाकरे सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये धुसपूस सुरू झाल्याचे पाहायला मिळते.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तापेच सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महूर्त सापडला. महाविकास आघाडीतील 26 आमदारांनी कॅबिनेट तर 10 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, अद्याप खातेवाटप झालेला नाही. अशातच ठाकरे सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये धुसपूस सुरू झाल्याचे पाहायला मिळते. सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यानंतर आता तिनही पक्षांच्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील वृत्त सामनाने दिलं आहे.

तिनही पक्षांकडून मलईदार खात्यांसाठी चढाओढ सुरू असल्याचेही पाहायला मिळत आहे. अशातच खातेवाटपादरम्यान, महसूल खातं हे काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. हे खातं आपल्याला मिळावं यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीकडे कृषी मंत्रीपदही मिळावं अशी मागणी केली आहे. महसूल आणि कृषी अशी दोन खाती मिळाली तर त्यापैकी एक खातं बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवलं जाईल, तर दुसरं खातं अशोक चव्हाणांच्या पदरात पडेल. दरम्यान, महसूल खातं न मिळाल्यास अशोक चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खातं आपल्याकडे हवं असल्याचीही चर्चा आहे. मात्र नितिन राऊतांकडे असलेलं हे खातं आपल्याला मिळावं अशी विजय वडेट्टीवार यांचीही इच्छा असल्याचे बोलंलं जातं आहे.

सध्या कृषी खातं शिवसेनेकडे आहे. थोरात आणि चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस हायकमांड कोणाच्या डोक्यावर हात ठेवणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला आलेलं कृषी खातं काँग्रेसला मिळावं, अशी इच्छा देखील थोरातांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी मंगळवारी दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधींची भेट घेतली होती. काँग्रेसच्या विचारसरणीशी तडजोड होता कामा नये, असा सल्ला सोनिया गांधी यांनी नव्या मंत्र्यांना तसेच आमदारांना दिला होता. दरम्यान आधी गृहखातं शिवसेनेकडे होतं. पण आता ते राष्ट्रावदीच्या पारड्यात पडणार आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादीला गृहखातं मिळणार असेल तर राष्ट्रवादीच्या गोटातील ग्रामविकास किंवा ग्रामिण भागाशी निगडीत खातं काँग्रेसला देण्यात यावं यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

पाहा व्हिडीओ : भाजपच्या षडयंत्रापासून सावध राहा : उद्धव ठाकरे

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही खाते वाटपावरून धुसपूस

शिवसेनेच्या पारड्यात असलेलं गृह खातं आता आता राष्ट्रवादीकडे असणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाव्य खातेवाटप केलं आहे. त्यानुसार, अजित पवारांकडे अर्थ खात जाणार आहे. त्यामुळे निदान गृह खातं आपल्याला मिळावं अशी दिलीप वळसे पाटलांची इच्छा आहे. मात्र आता गृह खातं अनिल देशमुखांकडे जाणार असल्याचं समजत आहे. एवढचं नाहीतर माजी आमदार पंकजा मुंडे यांचा पराभव करून परळी मतदारसंघातून निवडून आलेल्या धनजंय मुंडे यांना सामाजिक न्याय खातं हे मिळणार आहे. पण त्यांना हे खातं नको असून आरोग्य किंवा जलसंपदा खातं पाहिजे आहे. छनग भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार आहे. पण तेदेखील या खात्यामुळे फारसे खूश नसून त्यांना नवाब मल्लिकांना मिळणार असलेलं उत्पादन शुल्क खातं पाहिजे आहे.

शिवसेनेचा खातेवाट

आमदार आदित्य ठाकरेंनी याआधी पर्यावरण विषयी अनेक गोष्टींचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या पारड्यात महत्त्वाचं पर्यावरण खातं जाणार असल्याची चर्चा आहे. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश नसल्याने ते नाराज असल्याचं वृत्त पसरलं होतं. पण मी कडवट शिवसैनिक आहे, नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं सांगत त्यांनी पक्षावर नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच कृषी खातं गुलाबराव पाटील किंवा दादा भुसे यांना सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

पुणे काँग्रेस भवनची तोडफोड करणारे माझे कार्यकर्ते नाहीत : संग्राम थोपटे

Shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत असंतोष, डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget