एक्स्प्लोर

महाजाॅब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची? : सत्यजीत तांबे

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील कुरबुरी सातत्याने समोर आहेत. त्यातच आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाजॉब्स योजनेवरुन सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील कोणताही तणाव नाही, बिघाड नाही, असा दावा तिन्ही पक्षातील नेते करत असले तरी कुरबुरी सातत्याने समोर येत आहेत. आता युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? असा सवाल सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी फोटो शेअर करुन ट्वीट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'महाजॉब्स' पोर्टलचं 6 जुलै रोजी लोकार्पण झालं. राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे.

महाजॉब्सच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक आणि उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांची छायाचित्रे आहेत. परंतु काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. हाच धागा पकडत सत्यजीत तांबे यांनी प्रश्न विचारला आहे.

ट्वीटमध्ये सत्यजीत तांबे यांनी लिहिलं आहे की, " #महा_जॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे."

येत्या काळात जाहिरातीत दुरुस्ती होईल - राजीव सातव 

दरम्यान काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही महाजॉब्सच्या जाहिरातीवर भाष्य केलं आहे. त्यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. "योजना चांगली आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य आहे. पण लोकांसमोर जाता सरकार आघाडीचं आहे याची काळजी घेऊन जाहिरातीत दुरुस्ती होईल, अशी आशा," असं राजीव सातव यांनी म्हटलं आहे.

महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत : मुख्यमंत्री

महाजॉब्स काय आहे? महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण आणि शहरी युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेसा सर्वोत्तम जॉब मिळवण्याची आणि यशस्वी करिअर घडवण्याची संधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे या युवकांना प्रगतीपासून आणि औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग घेण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. जर त्यांनी त्यांच्या कौशल्याला मेहनतीची जोड दिली तर त्यांच्या प्रगती पुढे आकाश ठेंगणे होणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाणे हेच आमचे स्वप्न आहे औद्योगिक विकासासाठी घेत असलेल्या मेहनतीशिवाय पुढील सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे.

आता महाजॉबच्या रुपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या आणि कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांमधील महादुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे.

महाजॉब्स कसे वापरावे? जॉब शोधण्यासाठी उद्योगासाठी लॉगिनचे दोन पर्याय इथे देण्यात आलेले आहेत. लॉगिन केल्यानंतर कंपन्यांनी आपली नोंदणी करून कंपनीच्या सध्याच्या मनुष्यबळाविषयी आवश्यकता येथे नोंदवावी. कुशल-अकुशल अर्धकुशल अशा जॉबच्या शोधात असलेल्या व्यक्तीने नाव नोंदणीसाठी आपली तपशीलवार वैयक्तिक माहिती भरावी. अशाप्रकारे प्रत्येक खाजगी कंपनीला अपेक्षित मनुष्यबळ व प्रत्येक कामगाराला अपेक्षित जॉबचे असंख्य पर्याय महाजोबच्या मदतीने आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget