एक्स्प्लोर

देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....

Devendra Fadnavis: शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभर जल्लोष केला जात आहे. तर महायुतीसह विरोधी पक्षातील नेतेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहेत.

 CM Oath Ceremony: महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विविध राज्यांचे मुख्यमंत्री व हजारो मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभर जल्लोष केला जात आहे. तर महायुतीसह विरोधी पक्षातील नेतेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  

अमृता फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आनंदात म्हणाल्या, 'आज माझ्या पतीने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ही आनंदाची गोष्ट आहे. पण ही जितकी मोठी बाब आहे तेवढीच मोठी जबाबदारी ही आहे. आता संपूर्ण राज्याला जोर लावून पुढे न्यायचे आहे . पुढे त्या म्हणाल्या, विरोधकांनी अनेक वैयक्तिक हल्ले केले, पण आता कटूता दूर केली नाही तर कसं पुढे जाणार राज्य.. राज्याला पुढे नेण्यासाठी आपल्याला एकत्र पुढे जायचे आहे. लाडक्या बहिणींनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर त्या सोबत  आहेत आणि सोबतच राहतील.' असं अमृता फडणवीस म्हणाल्या. 

 'देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाचे तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. सहा वेळा ते आमदार राहिले आहे. त्यांनी आपला जीवनकाळ लोकसेवेत घालवलाय. मी पुन्हा येईन ही त्यांची हाकही लोकसेवेसाठी रोज येईन.. हेच आहे. त्यामुळे मी पुन्हा येईन रोज व्हायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र नंबर एक वर राहील' असेही त्या म्हणाल्या.  

राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन 

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन केलंय. पुढचे पाच वर्ष सरकारच्या कोणत्याही चांगल्या उपक्रमात माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल असे जाहीर केलाय.  फडणवीसांना 2019 मध्ये ही संधी मिळायला हवी होती असंही ते म्हणाले आहेत. 2022 मध्ये ही फडणवीसांची संधी हुकली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता फडणवीसांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करावा असं ट्विट करत राज ठाकरे यांनी पुढील पाच वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना राज ठाकरेंचा पाठिंबा असेल असं सांगितलं. 

नवनीत राणांनीही दिल्या शुभेच्छा 

ज्या लोकांनी 2019 मध्ये धोका दिला होता, धोका देऊन ज्यांनी 2019 ला शपथ घेतली, आज यावरून हे सिद्ध होतंय की धोकेबाजांना महाराष्ट्राची जनता बाजूला करते. जो सत्याची लढाई लढतो तो मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो. धोकेबाजांना महाराष्ट्राच्या जनतेने चांगला धडा शिकवला.  जे स्वप्न आम्ही पाहत होतो ज्यासाठी लढत होतो. सगळी हिस्ट्री डोळ्यासमोरून गेली.

सुधीर मुनगंटीवारांसह पंकजाताईही म्हणाल्या..

तिघांना खूप शुभेच्छा देणार. देवेंद्रजींना शुभेच्छा, एकनाथ शिंदेंना शुभेच्छा, अजित पवारांना शुभेच्छा आणि महराष्ट्राच्या मतदारांना शुभेच्छा असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तर पंकजा मुंडेंनी पुढील कामासाठी देवेंद्रजींना शुभेच्छा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. 

 

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक विधानपरिषद निवडणूक! गोकुळ गिते माघार घेणार? मुंबईत मंत्री महाजनांसह सामंतांशी सकारात्मक चर्चा
नाशिक विधानपरिषद निवडणूक! गोकुळ गिते माघार घेणार? मुंबईत मंत्री महाजनांसह सामंतांशी सकारात्मक चर्चा
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Pune Congress: पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! अरविंद शिंदेंची प्रदेशाध्यक्षांविरोधात हायकमांडकडे तक्रार, नेमकं काय घडलंय?
Rajya Sabha Election 2026 Meenakshi Natarajan: मध्य प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा, इकडे काँग्रेसने आमदारांना रिसॉर्टवर नेण्याचा प्लॅन आखला, तिकडे एका चुकीमुळे भाजपचा उमेदवार थेट विजयीच झाला
राज्यसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा, काँग्रेसचा आमदारांना रिसॉर्टवर नेण्याचा प्लॅन, पण एका चुकीमुळे भाजपचा उमेदवार थेट विजयीच झाला

व्हिडीओ

Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget