एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : उद्धव साहेब खुर्चीला चिटकून बसले नाहीत, त्यांच्या मनाला जे पटलं ते केलं : आदित्य ठाकरे 

Aaditya Thackeray : उद्धव साहेब खुर्चीला चिटकून बसले नाहीत आणि त्यांनी पहाटेची शपथविधीही घेतली नाही असे वक्तव्य युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं.

Aaditya Thackeray : उद्धव साहेबांनी (Uddhav thackeray) जर राजीनामा दिला नसता तर ते इतर राजकारण्यांसारखे झाले असते. त्यामुळं त्यांच्या मनाला जे पटलं ते त्यांनी केलं असं वक्तव्य युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं. उद्धव साहेब खुर्चीला चिटकून बसले नाहीत आणि त्यांनी पहाटेची शपथविधीही घेतली नाही असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल आपल्या देशात गरजेचे आहेत का?

सुप्रीम कोर्टात दोन्ही निकाल राज्यपाल महोदय यांच्या विरोधात आहेत. लोकशाहीत राज्यपालांचे काम काय? राज्यपाल यांच्यामार्फत आपण हुकूमशाहीकडे चाललो आहे का? राज्यपाल आपल्या देशात गरजेचे आहेत का? असा प्रश्न देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे राज्यपाल यांची वागणूक चुकीची होती. ते एका पक्षाची व्यक्ती म्हणून काम करत होते राज्यपाल म्हणून नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्पीकरची निवडणूक ही देखील चुकीची होती. तसेच व्हीपची झालेली निवड ही देखील चुकीची होती असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे

सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे बघून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे आदित्य ठाकरे म्हणाले. मोठे मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत आणि हे खुर्चीला चिटकून बसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. विधानसभा अध्यक्षांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. घटनेत लिहिलेला आहे तो निकाल अध्यक्ष देतील. विधानसभा अध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे नसतात ते सभागृहाचे अध्यक्ष असतात अस आदित्य ठाकरे म्हणाले. 

विधानसभा अध्यक्षांनी संविधानाचे मित्र व्हावं

सध्या लोकशाहीला आणि संविधानाला धोका आहे. आपल्या देशात लोकशाही राहिली आहे की नाही? हा प्रश्न राहिला आहे. 40 गद्दार हे अपात्र होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. अध्यक्षांनी पक्षपात न करता निपक्षपणे काम केलं तर लवकर निकाल दिसेल असेही ते म्हणाले. एकेकाळी राहुल नार्वेकर हे माझे मित्र होते. पण आता त्यांनी संविधानाचे मित्र व्हावे असेही ते म्हणाले. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा. हुकूमशाही पद्धतीने दिल्ली पुढे महाराष्ट्राला झुकवण्याचं काम झालं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Political Crisis: थँक्यू सुप्रीम कोर्ट! पोपट मेला की नाही एवढंच नार्वेकरांना सांगायचं आहे, असं सुषमा अंधारे का म्हणाल्या?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Embed widget