![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर, सरकारला इशारा
कोल्हापुरातील आंदोलनाची सरकारला दखल घ्यावीच लागते, असा इतिहास आहे. त्यामुळे याचा शेवट कसा होईल? सरकार सरसकट वीजबिल माफ करणार का? हे पाहावे लागणार आहे.
![लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर, सरकारला इशारा Kolhapur People demanding waiver of electricity bills of lockdown period लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर, सरकारला इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/07160741/WhatsApp-Image-2021-01-07-at-4.09.53-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ व्हावे, या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. या रॅलीमध्ये संघटना आपली वाहनं घेऊन सहभागी झाल्याने या मोर्चाला भव्य रूप मिळालं आहे.
गांधी मैदानपासून सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागातून महामार्गावर पोहचली. त्यानंतर तावडे हॉटेलमार्गे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रॅली निघाली. लॉकडाउनच्या दरम्यान अनेकांचे व्यवसाय बंद पडले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. रिक्षा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे या काळातील वीजबिल माफ करावीत अशा पद्धतीची मागणी कोल्हापुरात जोर धरून आहे.
कोल्हापुरात याआधी देखील वीज बिलांच्या विरोधात अनेक आंदोलने केली. मात्र, सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता या वीजबिलांच्या विरोधात भव्य रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या मोर्चानंतर देखील जर सरकारने वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निषेधाचे फलक लावून दिला होता इशारा कोल्हापूर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आम्ही बिल भरणार नाही, अशा आशयाचे होर्डिंग लागले आहेत. जर कोण विजेचे कनेक्शन तोडण्यासाठी आले तर त्याला कोल्हापुरी हिसका दाखवू असा इशारा या होर्डिंगच्या माध्यमातून दिला आहे. त्याचबरोबर महावितरण कार्यालयासमोर देखील याआधी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्यासंदर्भात निवेदने दिली आहेत.
कोल्हापुरातील आंदोलनाची सरकारला दखल घ्यावीच लागते.. कोल्हापूरकरांनी एखादे आंदोलन हातामध्ये घेतले तर त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय आंदोलन थांबत नाही. अशी अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे सरकारला आपले निर्णय बदलावे लागले आहेत. आता देखील वीजबिल माफ करा या संदर्भातला लढा कोल्हापूरकरांनी हातात घेतला आहे. त्यामुळे याचा शेवट कसा होईल? सरकार सरसकट वीजबिल माफ करणार का? हे पाहावे लागणार आहे.
Kolhapur | कोल्हापुरात वाढीव वीजबिलाविरोधात वाहन मोर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)