एक्स्प्लोर

नाशिक-नगरकरांनी सोडला निश्वास! जायकवाडी धरणानं ओलांडली 65 टक्क्यांची पातळी, समन्यायी पाणीवाटपाचा तेढ सुटला

समन्यायी पाणीवाटपाचा गुंता यंदापुरता तरी सुटल्याचं चित्र असून नाशिक नगरकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. जायकवाडी धरणांनं 65 टक्क्यांनी पातळी ओलांडल्यानं मराठवाड्याला दिलासा मिळालाय.

Jayakwadi Dam: राज्यात जोरधारांनी धरणसाठ्यात मोठा फरक पडल्याचं चित्र आहे. मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आतापर्यंत तब्बल 55 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाल्याने जायकवाडी धरणाचा आज गुरुवारी सकाळपर्यंत 69.89 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.  जायकवाडी धरणानं 65 टक्कयांची मर्यादा ओलांडल्याने आता नाशिक नगरच्या धरणांमधून होणारा समन्यायी पाणीवाटपाचा तेढ यंदा सुटला आहे.

समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार, पावसाळा संपेपर्यंत जायकवाडी धरणात 65 टक्के पाणी न भरल्यास गोदावरी खोऱ्यातील नाशिक, नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे लागते. हे पाणी सोडण्यासाठी नाशिक, नगरमधून पाणी सोडण्याासाठी मोठा विरोध होतो. मागील वर्षी जायकवाडीत अपेक्षीत साठा नसल्याने दुष्काळ ओढवला होता. परिणामी समन्यायी पाणीवाटपानुसार नाशिक, नगरच्या धरणांमधून पाणी सोडण्यात आले होते. आता यावेळी जायकवाडी पावसाळ्यात ६९ टक्क्यांनी भरल्यानं पाणीवाटपाचा संघर्ष यावर्षीपुरता तरी थांबणार आहे.

नाशिक नगरच्या पावसामुळे जायकवाडीत मोठा विसर्ग

नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात मोठा पाणीसाठा झाला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये आतापर्यंत 34 हजार सहा दशलक्ष घनफूट पाणीसाठा तर नगरमधील धरणांमधून 21 हजार 600 दलघमी पाणीसाठा जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आला आहे. परिणामी जायकवाडी धरण 65 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. गुरुवारी(29 aug) सकाळी जायकवाडी धरणात 69.89 टक्के पाणीसाठा होता. 

जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढतोय

मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने जायकवाडीचा पाणीसाठा वाढल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे. मागील वर्षी अवघे 33.24 टक्के भरलेले जायकवाडी धरण यंदा 69.89 टक्क्यांनी भरलं आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली असून धरणसाठ्यात समाधानकारक साठा आहे.  काही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असून यंदा पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाची क्षमता 102.72 टीएमसी आहे. अजूनही सुमारे 56 हजार क्यूसेक आवक धरणात सुरू असल्याने साठा मोठ्या प्रमाणात वाढण्याची खात्री निर्माण झाली आहे.

हेही वाचा:

यंदा बैल पोळा पावसात साजरा होणार, बळीराजाच्या स्वागताला वरुणराजा बरसणार, पंजाबराव डखांनी वर्तवला हवामान अंदाज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Government: बिहारी मंत्रीमंडळात घराणेशाहीच्या नावानं चांगभलं! कोणाचा मुलगा, कोणाची बायको, कोणाचे वडिल यांनीच निम्मं मंत्रीमंडळ भरलं
बिहारी मंत्रीमंडळात घराणेशाहीच्या नावानं चांगभलं! कोणाचा मुलगा, कोणाची बायको, कोणाचे वडिल यांनीच निम्मं मंत्रीमंडळ भरलं
कोल्हापुरात आता दोन नगरपालिकेत थेट महाडिकांची ताराराणी आघाडी अन् सतेज पाटलांचा काँग्रेस गट एकत्र; 'हाडा'च्या कार्यकर्त्यांची हाडं गोठायची वेळ आली!
कोल्हापुरात आता दोन नगरपालिकेत थेट महाडिकांची ताराराणी आघाडी अन् सतेज पाटलांचा काँग्रेस गट एकत्र; 'हाडा'च्या कार्यकर्त्यांची हाडं गोठायची वेळ आली!
Saleel Deshmukh : ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा, कारण समोर
निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नागपुरात धक्का, सलील देशमुख यांचा राजीनामा
भाजपचा 'बिनविरोध' पॅटर्न जोरात, मंत्री गिरीश महाजनांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी; शिवसेनेला 'दे धक्का'
भाजपचा 'बिनविरोध' पॅटर्न जोरात, मंत्री गिरीश महाजनांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी; शिवसेनेला 'दे धक्का'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram  Amravati : अमरावतीमधील नेमक्या समस्या काय? नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा?
Palghar Teacher Issue : शिक्षकाच्या मारहाणीला  घाबरून विद्यार्थी लपले थेट जंगलात, प्रकरण काय?
Pune Hit and Run Case : पुण्यात हिट अँड रन, सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, बालेडावाडीतील घटना
Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं?  वडिलांनी सगळं सांगितलं
Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Government: बिहारी मंत्रीमंडळात घराणेशाहीच्या नावानं चांगभलं! कोणाचा मुलगा, कोणाची बायको, कोणाचे वडिल यांनीच निम्मं मंत्रीमंडळ भरलं
बिहारी मंत्रीमंडळात घराणेशाहीच्या नावानं चांगभलं! कोणाचा मुलगा, कोणाची बायको, कोणाचे वडिल यांनीच निम्मं मंत्रीमंडळ भरलं
कोल्हापुरात आता दोन नगरपालिकेत थेट महाडिकांची ताराराणी आघाडी अन् सतेज पाटलांचा काँग्रेस गट एकत्र; 'हाडा'च्या कार्यकर्त्यांची हाडं गोठायची वेळ आली!
कोल्हापुरात आता दोन नगरपालिकेत थेट महाडिकांची ताराराणी आघाडी अन् सतेज पाटलांचा काँग्रेस गट एकत्र; 'हाडा'च्या कार्यकर्त्यांची हाडं गोठायची वेळ आली!
Saleel Deshmukh : ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा, कारण समोर
निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नागपुरात धक्का, सलील देशमुख यांचा राजीनामा
भाजपचा 'बिनविरोध' पॅटर्न जोरात, मंत्री गिरीश महाजनांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी; शिवसेनेला 'दे धक्का'
भाजपचा 'बिनविरोध' पॅटर्न जोरात, मंत्री गिरीश महाजनांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी; शिवसेनेला 'दे धक्का'
Cash Flow Management : स्मार्ट मनी : जास्त मागणीच्या काळात एमएसएमईने कॅश फ्लो कसा टिकवायचा? 5 सोपे उपाय
स्मार्ट मनी : जास्त मागणीच्या काळात एमएसएमईने कॅश फ्लो कसा टिकवायचा? 5 सोपे उपाय
'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
Gold Rate : चांदी  2280 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या सोने अन् चांदीचे नवे दर
Gold Rate : चांदी 2280 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या सोने अन् चांदीचे नवे दर
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू
Embed widget