एक्स्प्लोर

राज्य सरकारने मानधन थकवलं, होमगार्डचा आंदोलनाचा इशारा

राज्यातील होमगार्ड सध्या बिनकामाचे आणि बिनपैशाचे आहेत. कारण राज्य सरकारने होमगार्डचं कोट्यवधी रुपयांचं मानधन थकवलं आहे. त्यामुळे हतबल होमगार्ड्सनी जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

उस्मानाबाद : राज्यातील होमगार्ड अर्थात गृहरक्षक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने होमगार्डचं 208 कोटी रुपयांचं मानधन थकवल्याने होमगार्ड आक्रमक झाले आहेत. तरी, राज्यात एकूण 45 हजार होमगार्ड्स आहेत आणि त्यांना वर्षाला 180 दिवसांचं काम देणं बंधनकारक आहे. मात्र, सरकारकडे होमगार्डचं मानधन द्यायला पैसे नसल्याने त्यांना काम देऊ नका, असं सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे संतापलेल्या आणि हतबल होमगार्डनी जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

होमगार्डची निवड कशी होते? होमगार्ड दलातील स्वयंसेवकांची निवड ही मुख्यतः पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या निवड-निकषांवर आधारित असते. त्यामुळे महिला-होमगार्डची निवड त्या नियमानुसार होते. ही निवड गृहरक्षक दल भरती समितीद्वारा वर्षातून दोनदा करण्यात येते. उमेदवारांची निवड जिल्हा पातळीवर होते. निवड झालेल्या गृहरक्षकांना विशेष प्रतिज्ञा घ्यावी लागते. निवड झालेल्या उमेदवारांना गृहरक्षक म्हणून नेमण्यात येऊन त्यांना स्थानिक स्तरावर विशिष्ट पोलिस ठाण्याशी संलग्न करण्यात येते. संबंधित जिल्ह्याची लोकसंख्या आणि आकारमानानुसार प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार हजार गृहरक्षकांची नेमणूक करण्यात येते. गृहरक्षकांचे निवृत्तीचे वय साधारणतः ५५ वर्षे असते. जे गृहरक्षक-स्वयंसेवक तीन वर्षे गृहरक्षक म्हणून कामगिरी बजावतात, त्यांना पोलिस दल, अग्निशमन दल, राज्य राखीव दल इत्यादी मधील निवडप्रसंगी पाच टक्के आरक्षणाचा नियम असून त्याचा फायदा प्रशिक्षित गृहरक्षक वेळोवेळी घेत असतात. पुरुष आणि महिला गृहरक्षकांना पोलिसांच्या धर्तीवर पोशाख-गणवेश दिले जातात. याशिवाय गृहरक्षकांना ते प्रत्यक्ष कामावर असताना दररोज रु. ४०० एकत्रित भत्ता दिला जातो

होमगार्डची कामं

1. पोलिस दलाला सहाय्यकारी म्हणून काम करणे.

2. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे.

3. नैसर्गिक संकट वा विमानहल्ला इत्यादी आपत्तींच्या प्रसंगी आपत्ती निवारणाच्या कामी मदत करणे.

4. अपघात किंवा तत्सम संकटाच्या वेळी गरजूंना प्रथमोपचार आणि रक्त देणे, रुग्णवाहिकेची सेवा पुरवणे, यांसारखी कामे करणे.

5. संपकाळात किंवा अन्य कारणाने दैनंदिन आणि रोजचे कामकाज बंद पडले असता विविध आवश्यक सेवा चालू ठेवण्याच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रण, दळणवळण-संवाद, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा यांसारख्या अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास मदत करणे.

6. समाजकल्याणविषयक कामांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारला मदत करणे.

7. राज्य शासन अथवा राज्याच्या गृहरक्षक महासमादेशकांकडून गृहरक्षक दलाकडे सोपवलेल्या कामांची अंमलबजावणी करणे.

8. आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला प्रसंगोपात्त मदत करणे इत्यादी.

महत्त्वाच्या बातम्या

Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Chhatrapati Sambhajinagar Crime: शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget