![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबईत काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे तीन ते चार तास अत्यंत महत्वाचे आहेत. तर पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहेत. काही भागात जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे तीन ते चार तास अत्यंत महत्वाचे आहेत. कारण राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
पुढील 3 ते 4 तासात राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 तासात राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, विविध भागात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पाऊस सुरु असताना बाहेर पडणे टाळावे असंही प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये
राज्यात सध्या काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणीचा निर्णय घेतला होता, त्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 100 मिलीमीटर पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी! आजपासून 'या' जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार, पंजाबराव डखांचा अंदाज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)