एक्स्प्लोर

राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे. नंदुरबार, यवतमाळ, धुळे, अकोला या जिल्ह्यातील काही भागांत पावासाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

मुंबई : केरळात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नंदुरबार, यवतमाळ, धुळे, अकोला या जिल्ह्यातील काही भागांत पावासाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तर गोंदियातही अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर देवरी तालुक्यातील डोंगरगावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नवापूरमध्ये पावसाचा कहर, पाच जण ठार महाराष्ट्राच्याही अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पावसामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. तर सहाजण बेपत्ता आहेत. सध्या परिसरातील तब्बल 300 च्यावर घरांची पडझड झाली आहे. तसेच 60 जनावरे देखील दगावली आहेत. नवापूर तालुक्यात शुक्रवारी पहाटे 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे विसरवाडी परिसरातील वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला पूर आला आहे. अकोल्या विक्रमी पाऊस गेल्या 48 तासांत अकोला जिल्ह्यात या मोसमातला सर्वाधिक पाऊस झाला आहे. मागच्या 48 तासात जिल्ह्यात सात तालुक्यांत सरासरी 90 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याला अतिवृष्टीनं झोडपलं आहे. अकोला जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णा या नद्यांना पूर आला आहे. बाळापूर तालूक्यातील निंबा, अंदूरा या गावांमध्ये तर मुर्तिजापूर तालूक्यातील काटेपूर्णा नदीकाठावरील शेलू बोंडे, भटोरी, दाताळा, मंगरूळ कांबे या गावांमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे धरणसाठ्यात मात्र काही प्रमाणात वाढ झाली आहे. यवतमाळमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान दिग्रस तालुक्यातील धानोरा येथील बाजीराव डेरे आणि उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील अंकूश साबळे हे दोन तरुण पुरात वाहून गेले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने 937 घरांची पडझड झाली आहे. त्यामध्ये दिग्रस तालुक्यातील 400, महागाव तालुक्यातील 251, उमरखेड तालुक्यातील 100 घरांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पुराच्या पाण्यात 29 जनावरं देखील वाहून गेली आहेत. दिग्रस शहरात काल एकूण 210 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अडाण प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. हवामान विभागाच्यावतीने अनेक गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. चंद्रपुरातही पावसाची जोरदार हजेरी चंद्रपूरमध्ये कोरपना तालुक्यातील अंतरगाव या गावाला पुराच्या पाण्याने विळखा दिला आहे. सध्या अंतरगावकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने लोकांचा देखील संपर्क खंडित झाला आहे. प्रशासनाकडून परिसरातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी गावात आणि शेतात घुसल्याने मोठं नुकसान झालं आहे. धुळ्यात ओढ्यांना, नाल्यांना पूर धुळे जिल्ह्यात शुक्रवारच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे लोंढा नदीला आलेल्या पुरात दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. तर एक बैल गाडी वाहून गेली आहे. सध्या शिरपूर, साक्री तालुक्यातील लहान नदी, ओढ्यांना देखील पूर आला आहे. तर, दुसरीकडे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील जलपातळी वाढली नसल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये तलावात तीन लहान मुले बुडाली, एकाचा मृतदेह काढला बाहेर, दोन जणांचा शोध सुरु
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये तलावात तीन लहान मुले बुडाली, एकाचा मृतदेह काढला बाहेर, दोन जणांचा शोध सुरु
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
 गडचिरोली पोलिसांसमोर 9 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, तीन पुरुष सहा महिलांचा समावेश 
 गडचिरोली पोलिसांसमोर 9 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, तीन पुरुष सहा महिलांचा समावेश 
माढ्यात वाळू माफियांना प्रशासनाचा मोठा दणका, जीलेटीनने उडवल्या बोटी, 4 जणांवर कारवाई 
माढ्यात वाळू माफियांना प्रशासनाचा मोठा दणका, जीलेटीनने उडवल्या बोटी, 4 जणांवर कारवाई 

व्हिडीओ

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Embed widget