एक्स्प्लोर

सांगलीत हजारो लोक पुराच्या वेढ्यात, नेतेमंडळी मदतीसाठी कंबरेइतक्या पाण्यात

कृष्णा नदीच्या रुद्रावतारामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने हजारो लोक अडकले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या टीम बरोबरच राजकीय नेतेही पाण्यात उतरले आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातून 43,635 लोकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीने 54 फूट पाणी पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील वाळवा, पलूस, शिराळा या तालुक्यात तर कृष्णा नदीच्या रुद्रावतारामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने हजारो लोक अडकले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या टीम बरोबरच राजकीय नेतेही पाण्यात उतरले आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातून 43,635 लोकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. पूर आलेल्या भागातील स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणी स्वतः पाण्यात उतरुन मदत कार्यास लागल्याने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. जिल्ह्यातील या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आणि जिल्हा पोलिस प्रमुख स्वतः लक्ष ठेवून असून पुराच्या पाण्यात कोणी अडकून पडणार नाही याची खबरदारी संपूर्ण प्रशासन घेताना दिसत आहे.
सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री
सांगलीत हजारो लोक पुराच्या वेढ्यात, नेतेमंडळी मदतीसाठी कंबरेइतक्या पाण्यात
वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने ज्या ठिकाणी लोक अडकले आहेत तिथे बोटीच्या सहाय्याने पोहोचून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कालपासून स्वतः पाण्यात उतरले आहेत. काल त्यांनी वाळवा तालुक्यातील शिगाव येथे पूरपरिस्थितीची पाहणी करत जे लोक अडकले आहेत, त्यांना स्वतः बोटीत बसवून  सुरक्षितस्थळी हलवले. यावेळी एका चिमुरडीला सदाभाऊ खोत यांनी डोक्यावर घेत कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढत बोटीत बसवले. सदाभाऊ खोत आज पहाटेपासून पुन्हा लोकांच्या मदतीसाठी पाण्यात उतरले पाहायला मिळत आहेत.
वाळवा तालुक्यातील नागठाणे गावातील नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. साधारणपणे 400 लोक पाण्यामध्ये रात्रीपासून अडकलेले आहेत. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने खोत या अडकलेल्या लोकांशी संपर्क करुन त्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
आमदार विश्वजित कदम
सांगलीत हजारो लोक पुराच्या वेढ्यात, नेतेमंडळी मदतीसाठी कंबरेइतक्या पाण्यात
पलूस तालुक्यातील नादिकाठच्या गावांना महापुराने वेढले आहे. महापुराचे पाणी पात्राबाहेर दूरवर पसरल्याने गावोगावी जाणारे मार्ग बंद झाले आहेत. नदी ओढ्यांवरील पुलांसह गावांमधील बहुतांशी घरेही पाण्याखाली गेली आहेत. अशा गंभीर पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीला प्रशासकीय यंत्रणेसोबत आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या सर्व यंत्रणेकडून  मदतीचे हात सरसावले आहेत. आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी आज मंगळवारी दुपारी पुराने वेढलेल्या भिलवडी गावात प्रवेश केला आणि महापुरात अडकलेल्या लोकांशी संवाद साधला.  इथल्या पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या.
ज्या नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्यासह कार्यकर्ते तसेच अनेक तरुण प्रशासनाच्या मदतीला पुढे आले. यामुळे बाहेर मुसळधार सरी कोसळत असताना पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत कार्याचा पाऊस सुरु आहे. बाहेर काढलेल्या पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवणाची तसेच वैद्यकीय उपचार अशा सर्व सोयीसुविधा भारती विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. महापुराचे पाणी घराच्या दारात आणि घरात घुसल्यामुळे भयभीत झालेल्या पुरग्रतांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार डॉ. विश्वजित कदम खंबीरपणे उभे राहिले आहेत. दिवसरात्र पूरग्रस्तांसोबत राहून त्यांच्यासोबतच भोजन नाष्टा करीत आहेत. पूरग्रस्तांच्या व्यथा स्वतः त्यांच्या समवेत राहून अनुभवलेल्या आमदारांनी पूरग्रस्तांसाठी चादर आणि ब्लॅंकेट तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे.
इथल्या पूरग्रस्त नागरिकांच्या जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. या जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सोनहीरा कारखान्याच्या माध्यमातून चारा पुरवला जात आहे. पुराने वेढलेल्या गावांमध्ये बोटीने स्वतः जाऊन पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. इतकेच नव्हे तर पूर ओसरल्यावर रोगराई पसरु नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची पूर्वतयारीही आमदार डॉ.विश्वजित कदम करत आहेत.
संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष, सांगली
सांगलीत हजारो लोक पुराच्या वेढ्यात, नेतेमंडळी मदतीसाठी कंबरेइतक्या पाण्यात
जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस तालुक्यातील गावामधील पूर स्थितीची पाहणी करण्यास तीन दिवसांपासून सुरुवात केली आहे. कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी काठच्या अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिह देशमुख यांनी पलूस तालुक्यातील पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या गावांना भेटी देत त्याना सुरक्षितस्थळी नेत नागरिकांना दिलासा दिला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी, आमनापूर, धनगाव या गावामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याचं समजताच,  देशमुख यांनी तात्काळ गावांना भेट देऊन एनडीआरएफ टीमच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले. आज पहाटेपासून पुन्हा देशमुख लोकांना मदत करण्यासाठी बाहरे पडले आहेत. संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस तालुक्यातील सूर्यगाव, अंकलखोप, नागठाने, विठ्ठलवाडी या गावातील पूरग्रस्तांना भेट दिली आणि संबंधित गावातील पूरस्थितीचा संपूर्ण आढावा घेत, या लोकांसाठी सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करुन दिल्या.
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी 
सांगलीत हजारो लोक पुराच्या वेढ्यात, नेतेमंडळी मदतीसाठी कंबरेइतक्या पाण्यात
जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील अनेक गावाची पाहणी करत पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहे र काढण्यास मदत केली. बहे भागातील अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकल्याचं समजताच त्या ठिकाणी पोहोचत ट्रॅक्टरच्या सहायाने या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. यावेळी लोकांना नेताना जयंत पाटील यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत सुरक्षित स्थळ गाठलं. एनडीआरएफ टीमच्या मदतीनेही लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यास जयंत पाटील मदत, मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत. वाळवा तालुक्यातील बहे येथील कृष्णा नदीवरील पुलावरुन होणारी वाहतूक शुक्रवारी रात्रीपासूनच बंद करण्यात आली आहे. यामुळे वाळवा तालुक्यातील काही गावांचा आणि कराड तालुक्याचा  इस्लामपूरशी संपर्क चार दिवसांपासून तुटला आहे. तसेच नरसिंहपूर, शिरटे, येडेमच्छिंद्र, कोळे, लवंडमाची या गावांचा तालुक्याशी देखील संपर्क तुटला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या मदतीला स्वतः जयंत पाटील उतरले असल्याचे चित्र आहे.
सुभाष देशमुख, सांगली जिल्हा पालकमंत्री
सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली. भिलवडी, धनगाव, अमणापूरसह सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी तसंच पूरग्रस्त भागात जाऊन तिथल्या परिस्थितीची माहिती घेत नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी देशमुख यांनी बोलताना सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पुराच्या परिस्थितीवर प्रशासनाच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे, योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सांगितले.
सुरेश खाडे, सामाजिक न्यायमंत्री सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे दोन दिवसापासून सांगली, मिरजमधील नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहेत. सांगली, मिरजमधील नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने अनेक परिसर पाण्याखाली गेले आहेत.  मिरजमधील पाणी शिरलेल्या भागात भेट देऊन लोकांना सुरक्षित स्थळी हटवण्यासाठी खाडे यांनी पुढाकार घेतला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget